शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
3
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
4
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
5
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
6
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
7
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
8
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
9
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
10
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
11
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
12
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
13
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
14
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
15
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
16
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
17
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
18
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
19
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
20
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

विद्यार्थी गणवेशापासून वंचित; महापालिकेच्या उदासीनतेचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 12:28 AM

शैक्षणिक वर्षाचे प्रथम सत्र संपले, तरी नवी मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महापालिकेकडून शालेय गणवेश मिळालेले नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी वापराचे कपडे घालून शाळेत जावे लागत आहे.

- योगेश पिंगळेनवी मुंबई : शैक्षणिक वर्षाचे प्रथम सत्र संपले, तरी नवी मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महापालिकेकडून शालेय गणवेश मिळालेले नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी वापराचे कपडे घालून शाळेत जावे लागत आहे. पालिका प्रशासनाच्या उदासीनतेचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून, विद्यार्थ्यांची सुरक्षितताही धोक्यात आली आहे.नवी मुंबई शहरातील गाव-गावठाण, झोपडपट्टी आणि कॉलनीमध्ये राहणाºया गरीब विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी महापालिकेच्या वतीने अत्याधुनिक शाळांच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. पालिका शाळेत शिकणाºया प्राथमिकमधील विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पाठ्यपुस्तके, बूट, मौजे आणि माध्यमिक विभागात शिकणाºया विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, दप्तर, वह्या, पाठ्यपुस्तके, बूट, रेनकोट, मौजे, पीटी गणवेश, स्काउट गाइड गणवेश, पीटीचे बूट यासारखे शालेय साहित्य पुरविण्यात येते. त्याचप्रमाणे पूरक पोषणआहार, मध्यान्ह भोजन यासारख्या सुविधाही पुरविण्यात येतात. पालिका शाळेतील सुविधा आणि शिक्षणाचा दर्जा यामुळे राज्यातील इतर महापालिका शाळांपेक्षा नवी मुंबई पालिका शाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांचा पटदेखील दरवर्षी वाढत आहे. पालिकेमार्फत देण्यात येणाºया गणवेश आणि शालेय साहित्यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत, शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साली राज्य सरकारने शालेय साहित्य, गणवेश पालकांनी विकत घ्यावेत आणि त्याची बिले सादर केल्यावर त्यांच्या बँक खात्यावर पालिकेमार्फत पैसे टाकावेत, असे डीबीटी धोरण संपूर्ण राज्यात आणले. शासनाने आणलेल्या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने २०१६-१७ साली गणवेश बनविण्याचा ठेका पालिकेने रद्द केला. शासनाने आणलेल्या धोरणांची पालकांना कल्पना नसल्याने, तसेच आर्थिक परिस्थितीमुळे नव्याने प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना आणि प्राथमिकमधून माध्यमिक विभागात गेलेल्या विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित राहावे लागेल. २०१७-१८ साली प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना बाजारात पालिका शाळेचे गणवेश उपलब्ध झाले नाहीत.माध्यमिक शाळांचे गणवेश काहीच ठिकाणी मिळाल्याने अनेक विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले. २०१८-१९ या चालू शैक्षणिक वर्षात राज्य सरकारने शालेय गणवेश पालिकेनेच पुरावावेत, असा नियम केला आहे. महापालिकेच्या उदासीन धोरणामुळे शैक्षणिक वर्षाचे प्रथम सत्र संपले, तरी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश उपलब्ध झालेले नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून पालिकेच्या माध्यमातून गणवेश मिळाले नसल्याने शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांना तसेच या पालिका शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना घरी वापरातील रंगबिरंगी कपडे घालून शाळेत यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे.पैसे न मिळाल्याने साहित्य खरेदीकडे पाठपालिकेमार्फत विद्यर्थ्यांना शैक्षणिक साहित्य न देता, डीबीटी धोरणाची अंमलबजावणी करण्याचे शासनाचे धोरण आहे; परंतु गेल्या वर्षी शालेय साहित्य खरेदी करून शाळेत बिले जमा केल्यावरही अनेक पालकांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले नाहीत, त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य खरेदी केले नसून, एकही बिल महापालिकेकडे जमा झाले नाही. त्यामुळे शासनाच्या या धोरणाकडे पालकांनी पाठ फिरविल्याचे समोर आले आहे.शासन नियमानुसार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश महापालिकेच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव महासभेत मंजूर झाला असून विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप लवकरच करण्यात येईल.- संदीप संगवे,शिक्षणाधिकारी,नवी मुंबई महापालिका

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाEducationशिक्षणNavi Mumbaiनवी मुंबई