शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईनंतरही रिक्षाचालकांची मुजोरी; सातत्याने मोहीम राबवूनही बेशिस्तीला लगाम नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 00:28 IST

आरटीओकडून ६९६ जणांवर कारवाई

नवी मुंबई : रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा वाढत चालल्याचे चित्र सध्या शहरात पहायला मिळत आहे. मागील नऊ महिन्यात आरटीओकडून ६९६ रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर देखील क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक व सिग्नल तोडणे असे प्रकार रिक्षाचालकांमद्ये पहायला मिळत आहेत.

रिक्षांचे परमीट खुले केल्यापासून शहरातील रिक्षांमध्ये मागील दोन वर्षात प्रमाणापेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर सार्वजनिक व खासगी वाहनांपेक्षा रिक्षाच सर्वाधिक धावताना दिसत आहेत. त्यापैकी बहुतांश रिक्षाचालकांकडून वाहतुकीच्या तसेच आरटीओच्या नियमांचे उघडपने उल्लंघन होत आहे. मीटरप्रमाणे मागणी करणारे प्रवासी भाडे नाकारुन शेअर भाडे मिळवले जात आहेत. त्यामध्ये चार किंवा पाच प्रवासी रिक्षात कोंबले जात आहेत. शेअर भाड्याच्या एका फेरीत मीटरच्या भाड्यापेक्षा जास्त नफा असल्याने त्यांच्याकडून हा पर्याय निवडला जात आहे. याकरिता एनएमएमटीचे बस थांबे, महत्वाचे चौक तसेच ठिकाणी अवैध थांबे तयार करण्यात आले आहेत. त्याठिकाणी रस्त्यांवरच रिक्षा थांबवून प्रवासी भरले जात आहेत. याचा फटका महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला बसत असून, अशा ठिकाणी वाहतुकीलाही अडथळा होत आहे. त्यामुळे बेशिस्त रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.

परंतु अनेकदा कारवाई करुन देखील रिक्षाचालकांना शिस्त लागत नसल्याचेही पहायला मिळत आहे. वाढत्या तक्रारीमुळे आरटीओडून गतवर्षात एप्रिल ते डिसेंबर दरम्यान ६९६ रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. तर वाहतुक पोलिसांकडून देखिल सातत्याने कारवाईचा धडाका सुरूच असतो. यानंतरही रिक्षाचालकांना वाहतुकीचे नियम अंगवळणी पडत नसल्याचे दिसून येत आहे. आरटीओ तसेच वाहतुक पोलिसांच्या कारवाईला न जुमता त्यांच्याकडून तिन पेक्षा जास्त प्रवासी रिक्षात भरले जात आहेत. तर अती वेगात रिक्षा पळवत असताना सिग्नलही तोडले जात आहेत. यामध्ये अपघाताचा धोका असून प्रवाशांवर मृत्यूची टांगती तलवार निर्माण होत आहे. त्यामुळे सातत्याने नियमांची पायमल्ली करणारया रिक्षाचालकांचे परवाने कायमचे रद्द करण्याची मागणी नागरीकांकडून होत आहे. परंतु आरटीओकडून ठोस कारवाई होत नसल्याने रिक्षाचालकांची मुजोरी वाढतच चालली आहे. काही संघटना देखील अशा रिक्षाचालकांना पाठीशी घालत असल्याने त्यांच्यापुढे आरटीओ अधिकारयांनीही हात टेकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनावर तसेच प्रवाशांमध्ये संघटनेचा दबदबा वाढवण्यासाठी अशा प्रवृत्तींना थारा दिला जात आहे. त्याचा फायदा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून घेतला जात आहे. त्यांच्याकडून रात्री अपरात्री मद्यपान अथवा इतर नशा करुन रिक्षा चालवल्या जात आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी एकट्या महिलांमध्ये रिक्षातून प्रवास करताना असुरक्षिततेची भावना व्यक्त होत आहे.बेशिस्त रिक्षाचालकांना आळा घालण्यासाठी त्यांचे परवाने कायमचे रद्द केले पाहिजेत. त्याकरिता वाहतूक पोलिसांऐवजी आरटीओकडून कारवाईवर जोर दिला जाणे आवश्यक आहे, परंतु मुजोर रिक्षाचालकांवर ठोस कारवाई होत नसल्याने अप्रत्यक्षरीत्या त्यांना पाठबळ मिळत असल्याचा संशय आहे. - रमजान मुजावर, रहिवाशी, कोपरखैरणेक्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, तसेच इतर कारणांनी गतवर्षात एप्रिल ते डिसेंबर दरम्यान ६९६ रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ७९ बसेसवरदेखील कारवाई केली आहे. यापुढेही अशा स्वरूपाच्या कारवाया सुरू राहणार आहेत, परंतु कारवाईसाठी एकच पथक असल्याने तीव्र स्वरूपाची मोहीम राबविण्यात अडथळा निर्माण होत आहे. - दशरथ वाघुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षा