शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न धोकादायक वळणार, रहिवाशांत संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 03:51 IST

शुक्रवारी महापालिकेने अतिधोकादायक यादीत समावेश असलेल्या वाशीतील ११ इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित केला. ऐन पावसाळ्यात कोणतीही पूर्वसूचना न देता कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली.

नवी मुंबई -  शुक्रवारी महापालिकेने अतिधोकादायक यादीत समावेश असलेल्या वाशीतील ११ इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित केला. ऐन पावसाळ्यात कोणतीही पूर्वसूचना न देता कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. त्यामुळे सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक वर्षी या प्रश्नावर खल केला जातो. आरोप-प्रत्यारोप केले जातात; परंतु सकारात्मक तोडगा काढण्याची कोणतीच भूमिका मांडली जात नाही, त्यामुळे रहिवाशांत सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात खदखद निर्माण झाली आहे. त्यांच्या संभाव्य उद्रेकामुळे पुनर्बांधणीच्या प्रश्नाला धोकादायक वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सिडकोने बांधलेल्या इमारतीची अल्पावधीतच पडझड सुरू झाली आहे. दिवसाआड लहान-मोठे अपघात घडत आहेत. या इमारतीच्या पुनर्बांधणीचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून चर्चिला जात आहे. विशेष म्हणजे, केवळ राजकीय पटलावर या विषयावर चर्चा होत आहे. निवडणुकीतील प्रचाराचा हा प्रमुख मुद्दा बनला आहे. विधानसभेच्या निवडणुका समीप आल्या आहेत. या निवडणुकीतही हाच प्रश्न प्रचाराच्या केंद्रस्थानी असणार आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी याच मुद्द्यावर अनेक निवडणुका लढविल्या आणि जिंकल्याही; परंतु पुनर्बांधणीचा प्रश्न मात्र जैसे थेच राहिला. पुनर्बांधणीच्या मार्गातील तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत; परंतु शहरात संक्रमण शिबिराचे नियोजन नसल्याने पुनर्बांधणीला खो बसला आहे. मागील १५ वर्षांत संक्रमण शिबिर उभारण्यास महापालिकेला अपयश आले आहे. त्यामुळे पुनर्बांधणीची प्रक्रिया रखडली आहे. न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत महापालिकेने शहरातील अतिधोकादायक इमारतीचा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे अशा इमारतीतून राहणाºया रहिवाशांत महापालिका प्रशासनाबरोबरच राजकर्त्यांविषयी खदखद निर्माण झाली आहे. महापालिकेच्या कारवाईला तूर्तास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असली, तरी रहिवाशांत कमालीचा असंतोष पाहावयास मिळत आहे.संक्रमण शिबिराबाबत उदासीनतामहापालिकेने यावर्षी ३७८ धोकादायक इमारती जाहीर केल्या आहेत. यात ५५ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. या इमारती तातडीने रिकाम्या करण्याच्या नोटिसा रहिवाशांना बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, निर्वासित होणाºया या रहिवाशांनी जायचे कुठे, याचे कोणतेही नियोजन महापालिकेने केलेले नाही. आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगी पडणारी संक्रमण शिबिरे उपयुक्त ठरतात; परंतु मागील २५ वर्षांत महापालिकेला त्याचे कधीही स्मरण झाले नाही. महापालिकेच्या या नकारात्मक भूमिकेचा फटका आता रहिवाशांना सहन करावा लागत आहे.शहरातील ५२ हजार रहिवाशांचा जीव टांगणीलाशहरात सिडकोनिर्मित जवळपास आठ हजार इमारती आहेत. यात सुमारे ५२ हजार रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. या इमारती राहण्यास धोकादाक ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांची पुनर्बांधणी करणे आवश्यक ठरले आहे. मात्र, पुनर्बांधणीच्या आड लपलेल्या अर्थकारणामुळे या प्रक्रियेला खीळ बसली आहे. विशेष म्हणजे, प्रश्न मार्गी लावण्याऐवजी राजकीय पक्षात श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू आहे. याचा मनस्ताप येथील रहिवाशांना सहन करावा लागत आहे.शहरातील अनेक इमारती धोकादायक ठरविण्यावरूनही मतभेद आहेत. काही इमारती जाणिवपूर्वक अतिधोकादायकच्या यादीमध्ये टाकल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे. काही ठिकाणी पुनर्बांधणीवरून दोन गट निर्माण झाले आहेत. स्थानिक नगरसेवक, विकासक आणि संबंधित सोसायटीतील काही पदाधिकारी यांच्यातील अर्थपूर्ण समेटामुळे पुनर्बांधणीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होऊ लागला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई