शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

तपासणी न करताच मिळते पीयूसी, आरटीओचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 2:32 AM

प्रदूषणाचा धोका : आरटीओचे दुर्लक्ष; शहरात सुमारे ५ लाख नोंदीत वाहने

योगेश पिंगळे

नवी मुंबई : वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या हानिकारक धुरामुळे वातावरणात जमा होणारा प्रदूषणाचा स्तर तपासण्यासाठी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) चाचणी केली जाते. सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ही चाचणी करून घेणे आवश्यक असताना, नवी मुंबई शहरात अनेक प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्रावर वाहनांची तपासणी न करताच प्रमाणपत्रे दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरटीओच्या दुर्लक्षामुळे शहरात अशा रीतीने प्रमाणपत्रे दिली जात असल्याने शहरात प्रदूषणाचा धोका वाढला आहे.

प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) हे प्रदूषण नियंत्रण अंतर्गत एक प्रमाणपत्र असून, पीयूसी चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर वाहनाला देण्यात येते. वाहनातून बाहेर पडणाºया धुरामुळे होणाºया वायुप्रदूषणासाठी मोटार वाहन नियम, १९८९ अंतर्गत वाहनासाठी पीयूसी प्रमाणपत्र हे एक महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. प्रत्येक आरटीओ कार्यालयांतर्गत त्या ठिकाणच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्रांना परवानगी देण्यात येते. नवी मुंबई परिवहन विभागाने नोंदणी केलेल्या वाहनांची संख्या सुमारे पाच लाख असून मुंबई, ठाणे, पुणे आदी ठिकाणी शहरातील विविध मार्गांवरून लाखो वाहने दररोज ये-जा करतात. नवी मुंबई आरटीओ कार्यालयाने शहरात एकूण ५९ प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्राला मान्यता देण्यात आली आहे. यामधील डिझेलवर चालणाºया वाहनांची तपासणी करणारी पाच, पेट्रोलवर चालणाºया वाहनांची तपासणी करण्यासाठी आठ आणि डिझेल आणि पेट्रोल या दोन्ही इंधनांवर चालणाºया वाहनांची तपासणी करणाºया ४६ केंद्रांना मान्यता दिली आहे. शहरात अनेक ठिकाणच्या महत्त्वाच्या रस्त्यांवर, पदपथावर, पेट्रोल पंप आदी ठिकाणी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देणारी वाहने उभी केली जात असून, यामधील अनेक प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्र बोगस असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनेक प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्रावर वाहने तपासणी न करताच, ५० रुपये शुल्क आकारून वाहन योग्य असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे, त्यामुळे बोगस प्रमाणपत्रांचा सुळसुळाट झाला असून, प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे.मोबाइल पीयूसी केंद्रांमुळे अपघाताचा धोकावाहनांमधून सुरू असलेल्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्राला मोबाइल प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्र म्हटले जाते. शहरातील सायन-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर रस्ता, पामबीच मार्ग, उरण रोड आदी महत्त्वाचे रस्ते आणि पदपथावर मोबाइल केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असल्याने अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे.शहरातील पीयूसी केंद्रांवर अचानक धाडी टाकल्या जाणार आहेत. वाहने तपासणी न करता प्रमाणपत्रे देणे, बेकादेशीर चालणारी केंद्रे, तसेच नियमावली न पाळणाºया केंद्रांचा परवाना रद्द केला जाणार आहे.- दशरथ वाघुले,उपप्रादेशिकपरिवहन अधिकारी 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसNavi Mumbaiनवी मुंबईpollutionप्रदूषण