शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

तपासणी न करताच मिळते पीयूसी, आरटीओचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 02:33 IST

प्रदूषणाचा धोका : आरटीओचे दुर्लक्ष; शहरात सुमारे ५ लाख नोंदीत वाहने

योगेश पिंगळे

नवी मुंबई : वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या हानिकारक धुरामुळे वातावरणात जमा होणारा प्रदूषणाचा स्तर तपासण्यासाठी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) चाचणी केली जाते. सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ही चाचणी करून घेणे आवश्यक असताना, नवी मुंबई शहरात अनेक प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्रावर वाहनांची तपासणी न करताच प्रमाणपत्रे दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरटीओच्या दुर्लक्षामुळे शहरात अशा रीतीने प्रमाणपत्रे दिली जात असल्याने शहरात प्रदूषणाचा धोका वाढला आहे.

प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) हे प्रदूषण नियंत्रण अंतर्गत एक प्रमाणपत्र असून, पीयूसी चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर वाहनाला देण्यात येते. वाहनातून बाहेर पडणाºया धुरामुळे होणाºया वायुप्रदूषणासाठी मोटार वाहन नियम, १९८९ अंतर्गत वाहनासाठी पीयूसी प्रमाणपत्र हे एक महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. प्रत्येक आरटीओ कार्यालयांतर्गत त्या ठिकाणच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्रांना परवानगी देण्यात येते. नवी मुंबई परिवहन विभागाने नोंदणी केलेल्या वाहनांची संख्या सुमारे पाच लाख असून मुंबई, ठाणे, पुणे आदी ठिकाणी शहरातील विविध मार्गांवरून लाखो वाहने दररोज ये-जा करतात. नवी मुंबई आरटीओ कार्यालयाने शहरात एकूण ५९ प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्राला मान्यता देण्यात आली आहे. यामधील डिझेलवर चालणाºया वाहनांची तपासणी करणारी पाच, पेट्रोलवर चालणाºया वाहनांची तपासणी करण्यासाठी आठ आणि डिझेल आणि पेट्रोल या दोन्ही इंधनांवर चालणाºया वाहनांची तपासणी करणाºया ४६ केंद्रांना मान्यता दिली आहे. शहरात अनेक ठिकाणच्या महत्त्वाच्या रस्त्यांवर, पदपथावर, पेट्रोल पंप आदी ठिकाणी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देणारी वाहने उभी केली जात असून, यामधील अनेक प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्र बोगस असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनेक प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्रावर वाहने तपासणी न करताच, ५० रुपये शुल्क आकारून वाहन योग्य असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे, त्यामुळे बोगस प्रमाणपत्रांचा सुळसुळाट झाला असून, प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे.मोबाइल पीयूसी केंद्रांमुळे अपघाताचा धोकावाहनांमधून सुरू असलेल्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्राला मोबाइल प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्र म्हटले जाते. शहरातील सायन-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर रस्ता, पामबीच मार्ग, उरण रोड आदी महत्त्वाचे रस्ते आणि पदपथावर मोबाइल केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असल्याने अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे.शहरातील पीयूसी केंद्रांवर अचानक धाडी टाकल्या जाणार आहेत. वाहने तपासणी न करता प्रमाणपत्रे देणे, बेकादेशीर चालणारी केंद्रे, तसेच नियमावली न पाळणाºया केंद्रांचा परवाना रद्द केला जाणार आहे.- दशरथ वाघुले,उपप्रादेशिकपरिवहन अधिकारी 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसNavi Mumbaiनवी मुंबईpollutionप्रदूषण