शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोर्लई किल्ल्याचे बुरूज ढासळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 02:19 IST

अलिबागजवळील ४०० वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कोर्लई किल्ल्याचे बुरूज ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : अलिबागजवळील ४०० वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कोर्लई किल्ल्याचे बुरूज ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यामध्ये खाडीच्या बाजूची तटबंदी कोसळली आहे. अनावश्यक झुडपे व वृक्ष हटविले नाहीत तर गडाच्या चारही बाजूची तटबंदी व बुरुजांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती इतिहासप्रेमींनी व्यक्त केली आहे.गड-किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव असून, रायगड जिल्ह्यास हे वैभव मोठ्या प्रमाणात लाभले आहे. दुर्गदुर्गेश्वर रायगडसह अनेक महत्त्वाचे गड व जलदुर्ग जिल्ह्यामध्ये असून, त्यामध्ये अलिबागजवळील कोर्लईचा समावेश आहे. अलिबागवरून मुरूड-जंजिऱ्याकडे जातानाच्या डोंगरावर हा किल्ला आहे. जवळपास एक किलोमीटर लांबी व ३० मीटर रुंदीचा किल्ला दुर्गप्रेमींचे आकर्षण ठरत आहे. दुर्गभ्रमंती करणारे तरुण व इतिहासप्रेमी नागरिकांची पावले कोर्लईकडे वळू लागली आहेत.गडावरील मंदिर, चर्च, जुन्या बांधकामाचे अवशेष, प्रत्येक बुरुजावर बसविलेल्या तोफा व गडावरून दिसणारे कुंडलिका खाडीचे सौंदर्य यामुळेही येथे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गडाच्या पायथ्याशी असणा-या बीपीटीच्या लाइट हाउसमधून किल्ल्यावर जाण्यासाठी छोटी पायवाट आहे. बीपीटी व्यवस्थापनाने लाइट हाउसच्या छतावर जाऊन समुद्र व गडाची तटबंदी पाहण्यासाठी परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय इतर दोन बाजूंनी गडावर जाण्यासाठी रस्ता आहे. गडावरील मंदिर व चर्चच्या परिसराची पुरातत्त्व विभागाकडून देखभाल केली जात आहे. कर्मचाºयांची नियुक्तीही नियुक्ती केली आहे. कर्मचाºयांकडून गडाच्या मुख्य भागाची चांगल्या प्रकारे देखभाल होत असली तरी खाडीच्या बाजूच्या भागात वाढलेले गवत अद्याप काढलेले नाही. यामुळे भटकंती करणाºयांना अडथळे येऊ लागले आहेत.गडाच्या बुरूज व तटबंदीची सुरक्षा धोक्यात आली आहे. पावसाळ्यामध्ये एक बाजूच्या तटबंदीचा काही भाग कोसळला आहे. चारही बाजूला बुरुजांसह तटबंदीमध्ये वृक्ष व झुडपे वाढली आहेत. वृक्षांच्या मुळ्यांमुळे तटबंदी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अनावश्यक वाढलेली झुडपे तत्काळ काढणे आवश्यक आहे. ती काढली नाहीत तर भविष्यात गडाचा भाग कोसळण्यास सुरुवात होईल व किल्ल्याचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते. गडावर येणाºया पर्यटकांना माहिती उपलब्ध होईल, असे फलक लावलेले नाहीत. गडाच्या इतिहासाची माहिती देणारे फलक लावण्यात यावेत. राज्यातील सर्वाधिक तोफा असलेल्या गडावर कोर्लईचाही समावेश होतो. काही तोफांसाठी गाडा तयार करण्यात आला आहे. काही अस्ताव्यस्त पडल्या आहेत. तोफांची देखभाल करण्यात यावी, अशी मागणी पर्यटक करीत आहेत.

गडावरील पाण्याचा हौदगडाच्या बालेकिल्ल्यामध्ये बंदिस्त हौद आहे. या हौदामध्ये पिण्यायोग्य पाणी आहे. या पाण्याचा गडावरील वृक्ष व हिरवळ विकसित करण्यासाठी वापर केला जातो. पायथ्याशी असणाºया लाइट हाउसलाही येथून पाणीपुरवठा केला जात आहे. किल्ल्याच्या मुख्य बालेकिल्ल्यामध्ये असलेल्या हौदामधील पाणी पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे.कोर्लईचा इतिहासपोर्तुगिजांचे वर्चस्व असलेल्या प्रमुख ठिकाणांमध्ये रेवदंडाचाही समावेश होते. येथून जवळच चौलजवळील खडकावर १५२१ मध्ये किल्ला बांधण्याची परवानगी पोर्तुगिजांनी निजामाकडे मागितली होती. १५९२ मध्ये येथे तटबंदी बांधण्याचा प्रयत्न झाला; परंतु निजामाने त्यास विरोध करून स्वत:च किल्ला बांधला.दोन वर्षांनंतर पोर्तुगिजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. जवळपास १४७ वर्षे त्यांचे वर्चस्व राहिले. १७३९ मध्ये चिमाजी अप्पांनी सुभानजी माणकर यांच्यावर कोर्लईच्या मोहिमेची जबाबदारी सोपविली व हा किल्ला स्वराज्यात आणला.गडावरील सद्यस्थितीगडाच्या पायथ्याशी बीपीटीचे लाइट हाउस असून, त्यावरून समुद्र व गडाची तटबंदी पाहता येते.गडाच्या प्रत्येक बुरुजावर तोफा ठेवण्यात आल्या आहेत.गडावर चर्च व इतर ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष पाहावयास मिळतात.गडाच्या प्रवेशद्वारावर एक ब्रांझच्या सिंहाचे प्रतीक असून, ‘माझ्याशी लढल्याशिवाय आत प्रवेश नाही’ अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे.गडाच्या बालेकिल्ल्याच्या शिखरावर गरुडाचे चित्र आहे. माझ्या तावडीतून उडणाºया माशांशिवाय कुणाची सुटका नाही, असे वचन कोरले आहे.गडाची तटबंदी एक बाजूला पडली आहे.गडाची तटबंदी व बुरुजांमध्ये वृक्ष व झुडपे वाढली आहेत.

टॅग्स :FortगडRaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई