शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
5
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
6
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
7
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
8
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
9
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
10
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
11
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
12
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
13
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
14
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
15
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
16
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
17
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
18
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
19
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
20
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक

कोर्लई किल्ल्याचे बुरूज ढासळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 02:19 IST

अलिबागजवळील ४०० वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कोर्लई किल्ल्याचे बुरूज ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : अलिबागजवळील ४०० वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कोर्लई किल्ल्याचे बुरूज ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यामध्ये खाडीच्या बाजूची तटबंदी कोसळली आहे. अनावश्यक झुडपे व वृक्ष हटविले नाहीत तर गडाच्या चारही बाजूची तटबंदी व बुरुजांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती इतिहासप्रेमींनी व्यक्त केली आहे.गड-किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव असून, रायगड जिल्ह्यास हे वैभव मोठ्या प्रमाणात लाभले आहे. दुर्गदुर्गेश्वर रायगडसह अनेक महत्त्वाचे गड व जलदुर्ग जिल्ह्यामध्ये असून, त्यामध्ये अलिबागजवळील कोर्लईचा समावेश आहे. अलिबागवरून मुरूड-जंजिऱ्याकडे जातानाच्या डोंगरावर हा किल्ला आहे. जवळपास एक किलोमीटर लांबी व ३० मीटर रुंदीचा किल्ला दुर्गप्रेमींचे आकर्षण ठरत आहे. दुर्गभ्रमंती करणारे तरुण व इतिहासप्रेमी नागरिकांची पावले कोर्लईकडे वळू लागली आहेत.गडावरील मंदिर, चर्च, जुन्या बांधकामाचे अवशेष, प्रत्येक बुरुजावर बसविलेल्या तोफा व गडावरून दिसणारे कुंडलिका खाडीचे सौंदर्य यामुळेही येथे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गडाच्या पायथ्याशी असणा-या बीपीटीच्या लाइट हाउसमधून किल्ल्यावर जाण्यासाठी छोटी पायवाट आहे. बीपीटी व्यवस्थापनाने लाइट हाउसच्या छतावर जाऊन समुद्र व गडाची तटबंदी पाहण्यासाठी परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय इतर दोन बाजूंनी गडावर जाण्यासाठी रस्ता आहे. गडावरील मंदिर व चर्चच्या परिसराची पुरातत्त्व विभागाकडून देखभाल केली जात आहे. कर्मचाºयांची नियुक्तीही नियुक्ती केली आहे. कर्मचाºयांकडून गडाच्या मुख्य भागाची चांगल्या प्रकारे देखभाल होत असली तरी खाडीच्या बाजूच्या भागात वाढलेले गवत अद्याप काढलेले नाही. यामुळे भटकंती करणाºयांना अडथळे येऊ लागले आहेत.गडाच्या बुरूज व तटबंदीची सुरक्षा धोक्यात आली आहे. पावसाळ्यामध्ये एक बाजूच्या तटबंदीचा काही भाग कोसळला आहे. चारही बाजूला बुरुजांसह तटबंदीमध्ये वृक्ष व झुडपे वाढली आहेत. वृक्षांच्या मुळ्यांमुळे तटबंदी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अनावश्यक वाढलेली झुडपे तत्काळ काढणे आवश्यक आहे. ती काढली नाहीत तर भविष्यात गडाचा भाग कोसळण्यास सुरुवात होईल व किल्ल्याचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते. गडावर येणाºया पर्यटकांना माहिती उपलब्ध होईल, असे फलक लावलेले नाहीत. गडाच्या इतिहासाची माहिती देणारे फलक लावण्यात यावेत. राज्यातील सर्वाधिक तोफा असलेल्या गडावर कोर्लईचाही समावेश होतो. काही तोफांसाठी गाडा तयार करण्यात आला आहे. काही अस्ताव्यस्त पडल्या आहेत. तोफांची देखभाल करण्यात यावी, अशी मागणी पर्यटक करीत आहेत.

गडावरील पाण्याचा हौदगडाच्या बालेकिल्ल्यामध्ये बंदिस्त हौद आहे. या हौदामध्ये पिण्यायोग्य पाणी आहे. या पाण्याचा गडावरील वृक्ष व हिरवळ विकसित करण्यासाठी वापर केला जातो. पायथ्याशी असणाºया लाइट हाउसलाही येथून पाणीपुरवठा केला जात आहे. किल्ल्याच्या मुख्य बालेकिल्ल्यामध्ये असलेल्या हौदामधील पाणी पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे.कोर्लईचा इतिहासपोर्तुगिजांचे वर्चस्व असलेल्या प्रमुख ठिकाणांमध्ये रेवदंडाचाही समावेश होते. येथून जवळच चौलजवळील खडकावर १५२१ मध्ये किल्ला बांधण्याची परवानगी पोर्तुगिजांनी निजामाकडे मागितली होती. १५९२ मध्ये येथे तटबंदी बांधण्याचा प्रयत्न झाला; परंतु निजामाने त्यास विरोध करून स्वत:च किल्ला बांधला.दोन वर्षांनंतर पोर्तुगिजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. जवळपास १४७ वर्षे त्यांचे वर्चस्व राहिले. १७३९ मध्ये चिमाजी अप्पांनी सुभानजी माणकर यांच्यावर कोर्लईच्या मोहिमेची जबाबदारी सोपविली व हा किल्ला स्वराज्यात आणला.गडावरील सद्यस्थितीगडाच्या पायथ्याशी बीपीटीचे लाइट हाउस असून, त्यावरून समुद्र व गडाची तटबंदी पाहता येते.गडाच्या प्रत्येक बुरुजावर तोफा ठेवण्यात आल्या आहेत.गडावर चर्च व इतर ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष पाहावयास मिळतात.गडाच्या प्रवेशद्वारावर एक ब्रांझच्या सिंहाचे प्रतीक असून, ‘माझ्याशी लढल्याशिवाय आत प्रवेश नाही’ अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे.गडाच्या बालेकिल्ल्याच्या शिखरावर गरुडाचे चित्र आहे. माझ्या तावडीतून उडणाºया माशांशिवाय कुणाची सुटका नाही, असे वचन कोरले आहे.गडाची तटबंदी एक बाजूला पडली आहे.गडाची तटबंदी व बुरुजांमध्ये वृक्ष व झुडपे वाढली आहेत.

टॅग्स :FortगडRaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई