शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा अपव्यय टाळण्याचा पनवेल पॅटर्न

By admin | Updated: March 11, 2016 02:55 IST

पाणीटंचाई सुरू होताच पनवेल नगरपालिकेने बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर थांबविला आहे. मलनि:सारण केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यास सुरवात केली आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबईपाणीटंचाई सुरू होताच पनवेल नगरपालिकेने बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर थांबविला आहे. मलनि:सारण केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यास सुरवात केली आहे. परंतु नवी मुंबई महापालिका मात्र मलनि:सारण केंद्रातील १८० एमएलडी पाणी ८ वर्षांपासून रोज गटारामध्ये सोडून देत आहे. राज्यात सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. पनवेलमध्येही जवळपास दोन महिन्यापासून पाणीटंचाई जाणवू लागली आहे. जुलैपर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरवावा लागणार आहे. यामुळे शहरातील लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाने पाणी परिषद घेवून नागरिकांना वास्तव स्थिती समजावून सांगितली. नागरिकांचे मन वळवून एक दिवसाआड पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये राजकीय पक्षांनीही समंजसपणाचे दर्शन घडवून कोणतेही राजकारण केले नाही. नगराध्यक्षा चारूशीला घरत, पालिकेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे व सर्वांनीच पिण्याचे पाणी जपून वापरण्यासाठी जनजागृती सुरू केली. उद्यान, बांधकाम व इतर कारणांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जावू नये, असे आवाहन केले. नगरपालिकेने बंदर रोड परिसरात नदीच्या काठावर १४ एमएलडी क्षमतेचे मलनि:सारण केंद्र बांधले आहे. या केंद्रामध्ये प्रक्रिया केलेले पाणी बांधकाम व्यावसायिकांना ६०० रूपये टँकर व गृहनिर्माण सोसायटीमधील उद्यानांसाठी १०० रूपये टँकर दराने पाणी देण्यास सुरवात केली. ही योजना सुरू केल्यापासून ९ मार्चपर्यंत १०९ टँकरचे वितरण करण्यात आले आहे. बांधकाम व्यावसायिकांना पाणी पुरविणाऱ्या सर्व ठेकेदारांनाही पत्र पाठवून मलनि:सारण केंद्रातील पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे. पालिकेचा हा उपक्रम राज्यातील इतर नगरपालिका व महानगरपालिकांसाठी आदर्श ठरला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनेही शहरात अनेक अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली आहेत. नेरूळ, वाशी व कोपरखैरणे केंद्रांसाठी २०० कोटी रूपये खर्च केला आहे. सद्यस्थितीमध्ये शहरात ७ मलनि:सारण केंद्रे आहेत. यामधून रोज १८० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. शुद्ध केलेले पाणी विकून महापालिकेला करोडो रूपये मिळतील असे स्वप्न सदर प्रकल्प उभारताना प्रशासनाने दाखविले होते. परंतु २१ जून २००९ ला तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यापासून आतापर्यंत रोज शुद्ध केलेले पाणी गटारामध्ये सोडून दिले जात आहे. या केंद्रांची देखभाल करण्यासाठी वर्षाला करोडो रूपये खर्च केले जात आहेत. याशिवाय शहरात मलनि:सारण वाहिन्या टाकण्यासाठीही करोडो रूपये खर्च केला आहे. या वाहिन्या टाकण्यासाठी खोदलेले रस्ते दुरूस्त करण्यासाठी २०० कोटी रूपये खर्च झाला आहे. एवढा प्रचंड खर्च करून शहरात पाणीटंचाई सुरू असताना पिण्याच्या पाण्याएवढे शुद्ध असलेले प्रक्रियायुक्त पाणी गटारात जात असल्यामुळे दक्ष नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प २ हजार कोटी रूपयांचा आहे. महापालिकेकडे एकूण सात मलनि:सारण केंद्रे असून त्यांची क्षमता ४४१ एमएलडी क्षमतेची आहे. दुसरीकडे पनवेल महापालिकेचा अर्थसंकल्प फक्त १५४ कोटी रूपयांचा असून त्यांच्याकडे फक्त १४ एमएलडी क्षमतेचे मलनि:सारण केंद्र आहे. परंतु यानंतरही पनवेल नगरपालिकेने या केंद्रातील पाणी बांधकाम व्यावसायिकांना देण्यास सुरवात केली आहे. दुसरीकडे नवी मुंबई महापालिका मलनि:सारण केंद्रातील पाणी खाडीत सोडत आहे. महापालिकेने पनवेल नगरपालिकेचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. ६०० व १०० रूपयांत टँकरपनवेल नगरपालिकेने बांधकामांसाठी ६०० रूपये व गृहनिर्माण सोसायट्यांसाठी १०० रूपये दराने एक टँकर पाणी देण्यास सुरवात केली आहे. यामध्ये पैसे कमविण्याचा उद्देश नसून पिण्याचे पाणी वाचविण्याची भूमिका आहे. परंतु दुसरीकडे महापालिका मात्र शहरवासीयांना पिण्यासाठी पाणी मिळत नसताना बांधकाम, उद्यान व इतर कामांसाठी पिण्याचे पाणी वापरत आहे. गृहनिर्माण सोसायट्यांचेही स्वागत पनवेलमधील नागरिकांकडूनही पाणीबचत करण्यात येत आहे. नील सिद्धी, निलेरा गार्डन व गुरूशरण्य या सोसायट्यांमध्ये उद्यानांसाठी मलनि:सारण केंद्रातील शुद्ध केलेले पाणी वापरले जाते. पाणी बचतीच्या मोहिमेला सहकार्य करणाऱ्या सोसायट्यांचे पालिका प्रशासनाने स्वागत केले असून सर्व बांधकामासाठीही प्रक्रिया केलेले पाणी वापर करण्याचे आवाहन केले आहे.