शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पाच्या तेल गळतीमुळे किनारा काळवंडला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 18:44 IST

लाखो लिटर्स क्रूड ऑइल मागणीदेवीच्या नाल्यातून थेट समुद्रात पोहचल्याने मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण झाले आहे.

मधुकर ठाकूर -

उरण : येथील ओएनजीसी प्रकल्पातील क्रूड ऑइल साठवणीच्या नादुरुस्त व्हाल्वमुळे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर गळती लागली.यामुळे लाखो लिटर्स क्रूड ऑइल मागणीदेवीच्या नाल्यातून थेट समुद्रात पोहचल्याने मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण झाले आहे.पीरवाडी समुद्र किनाऱ्यावरील परिसरात तेलाचे जाड थर निर्माण झाल्याने समुद्र काळवंडला आहे.परिसरातील मासेमारीही धोक्यात आली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान ओएनजीसी प्रशासनाने किनाऱ्यावरील जमा झालेले ऑईलचे थर मशिन, कामगारांच्या साहाय्याने ड्रममध्ये भरुन गोळा करण्याचे काम पहाटेपासूनच युध्दपातळीवर सुरू केले आहे.

येथील ओएनजीसी प्रकल्पातील क्रूड ऑइलच्या साठवण टाकीला शुक्रवारी (८) पहाटे गळती लागली. मोठ्या प्रमाणावर लागलेल्या गळतीमुळे क्रूड ऑइलचे थर संरक्षक भिंती जवळ असलेल्या मागणीदेवीच्या नाल्यातुन थेट पीरवाडी परिसरातील किनाऱ्यावर पोहचले.ओएनजीसी व्यवस्थापनाला गळतीची माहिती मिळाल्यानंतर पहाटेपासूनच किनाऱ्यावर जमा झालेले ऑईलचे जाड थर कामगार लाऊन ड्रम, बादली, सक्शन पंपने गोळा केले जात आहेत.मात्र नाल्यातुन वाहत गेलेले क्रूड ऑइल थेट समुद्रात पोहचल्याने पाण्यावर तेलतवंग दिसु लागले आहेत.यामुळे मोठ्या प्रमाणावर सागरी प्रदुषण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जलप्रदुषणामुळे परिसरातील स्थानिक मासेमारीही धोक्यात आली असल्याची भीती मच्छीमारांकडून व्यक्त केली जात आहे.परिसरातील शेतीलाही धोका निर्माण झाला असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. ओएनजीसीत वारंवार घडणाऱ्या तेल गळतीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे विकार होऊ लागले आहेत.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्याशिवाय वारंवार तेल गळतीच्या प्रकारामुळे परिसरातील हजारो नागरिकांची सुरक्षाही धोक्यात आली आहे.याआधीच तेल गळतीमुळे लागलेल्या भीषण आगीत अधिकारी, अग्निशमन दलाच्या जवानांसह पाच जण मृत्यू पावले आहेत.उरण ओएनजीसी प्रकल्पात जुने जाणकार आणि अनुभवी कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. नव्याने भरती झालेले अधिकारी आणि कामगार यांना प्रकल्पाची फारसी माहिती नसल्यामुळेच प्रकल्पात वारंवार तेल गळतीचे प्रकार घडत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक कामगारांकडून केला जात आहे.याप्रकरणी अधिक माहितीसाठी ओएनजीसी प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती उरण तहसीलदार डॉ.उध्दव कदम यांनी दिली.

प्रकल्पातील साठवण टाकीच्या व्हाल्वच्या लिकेजमुळे क्रूड ऑइल नाल्यातुन थेट समुद्र किनाऱ्यावर पोहोचले आहे.गळतीमुळे किनाऱ्यावर जमा झालेले तेल जमा करण्याचे पहाटेपासूनच युध्दपातळीवर सुरू करण्यात आले आहे.समुद्रात पोहचण्याआधीच तेल जमा करण्यात येत असल्याने परिसरातील मासेमारी,शेती  आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे मुख्य प्रकल्प अधिकारी सुभोजीत बोस यांनी सांगितले. 

 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणWaterपाणी