शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पाच्या तेल गळतीमुळे किनारा काळवंडला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 18:44 IST

लाखो लिटर्स क्रूड ऑइल मागणीदेवीच्या नाल्यातून थेट समुद्रात पोहचल्याने मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण झाले आहे.

मधुकर ठाकूर -

उरण : येथील ओएनजीसी प्रकल्पातील क्रूड ऑइल साठवणीच्या नादुरुस्त व्हाल्वमुळे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर गळती लागली.यामुळे लाखो लिटर्स क्रूड ऑइल मागणीदेवीच्या नाल्यातून थेट समुद्रात पोहचल्याने मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण झाले आहे.पीरवाडी समुद्र किनाऱ्यावरील परिसरात तेलाचे जाड थर निर्माण झाल्याने समुद्र काळवंडला आहे.परिसरातील मासेमारीही धोक्यात आली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान ओएनजीसी प्रशासनाने किनाऱ्यावरील जमा झालेले ऑईलचे थर मशिन, कामगारांच्या साहाय्याने ड्रममध्ये भरुन गोळा करण्याचे काम पहाटेपासूनच युध्दपातळीवर सुरू केले आहे.

येथील ओएनजीसी प्रकल्पातील क्रूड ऑइलच्या साठवण टाकीला शुक्रवारी (८) पहाटे गळती लागली. मोठ्या प्रमाणावर लागलेल्या गळतीमुळे क्रूड ऑइलचे थर संरक्षक भिंती जवळ असलेल्या मागणीदेवीच्या नाल्यातुन थेट पीरवाडी परिसरातील किनाऱ्यावर पोहचले.ओएनजीसी व्यवस्थापनाला गळतीची माहिती मिळाल्यानंतर पहाटेपासूनच किनाऱ्यावर जमा झालेले ऑईलचे जाड थर कामगार लाऊन ड्रम, बादली, सक्शन पंपने गोळा केले जात आहेत.मात्र नाल्यातुन वाहत गेलेले क्रूड ऑइल थेट समुद्रात पोहचल्याने पाण्यावर तेलतवंग दिसु लागले आहेत.यामुळे मोठ्या प्रमाणावर सागरी प्रदुषण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जलप्रदुषणामुळे परिसरातील स्थानिक मासेमारीही धोक्यात आली असल्याची भीती मच्छीमारांकडून व्यक्त केली जात आहे.परिसरातील शेतीलाही धोका निर्माण झाला असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. ओएनजीसीत वारंवार घडणाऱ्या तेल गळतीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे विकार होऊ लागले आहेत.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्याशिवाय वारंवार तेल गळतीच्या प्रकारामुळे परिसरातील हजारो नागरिकांची सुरक्षाही धोक्यात आली आहे.याआधीच तेल गळतीमुळे लागलेल्या भीषण आगीत अधिकारी, अग्निशमन दलाच्या जवानांसह पाच जण मृत्यू पावले आहेत.उरण ओएनजीसी प्रकल्पात जुने जाणकार आणि अनुभवी कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. नव्याने भरती झालेले अधिकारी आणि कामगार यांना प्रकल्पाची फारसी माहिती नसल्यामुळेच प्रकल्पात वारंवार तेल गळतीचे प्रकार घडत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक कामगारांकडून केला जात आहे.याप्रकरणी अधिक माहितीसाठी ओएनजीसी प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती उरण तहसीलदार डॉ.उध्दव कदम यांनी दिली.

प्रकल्पातील साठवण टाकीच्या व्हाल्वच्या लिकेजमुळे क्रूड ऑइल नाल्यातुन थेट समुद्र किनाऱ्यावर पोहोचले आहे.गळतीमुळे किनाऱ्यावर जमा झालेले तेल जमा करण्याचे पहाटेपासूनच युध्दपातळीवर सुरू करण्यात आले आहे.समुद्रात पोहचण्याआधीच तेल जमा करण्यात येत असल्याने परिसरातील मासेमारी,शेती  आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे मुख्य प्रकल्प अधिकारी सुभोजीत बोस यांनी सांगितले. 

 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणWaterपाणी