शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

भाजी मार्केटसाठी आता नवीन नियमावली!; बाजार समितीमध्ये सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 3:25 AM

बाजार समितीमध्ये सर्वाधिक गर्दी भाजीपाला मार्केटमध्ये होत असते. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता असल्यामुळे व्यापारी महासंघ व बाजार समिती प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे.

नवी मुंबई : मुंबई, नवी मुंबईकरांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा करता यावा, यासाठी बाजार समितीमधील पाचही मार्केट सुरूच राहणार आहेत. भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी मार्केटची वेळ रात्री २ ते सकाळी १० ऐवजी रात्री १० ते सकाळी १० अशी करण्यात आली आहे. मार्केटमधील किरकोळ व्यापार बंद करण्यात आला असून, मोटारसायकल व कारना मार्केटमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे.बाजार समितीमध्ये सर्वाधिक गर्दी भाजीपाला मार्केटमध्ये होत असते. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता असल्यामुळे व्यापारी महासंघ व बाजार समिती प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. मार्केटमध्ये किरकोळ विक्री पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ग्राहकांना पालेभाज्यांची किमान एक गोण खरेदी करावी लागणार आहे. फळभाज्या किमान १० किलोपेक्षा जास्त खरेदी कराव्या लागणार आहेत. मार्केटमध्ये सायंकाळी सहा ते पहाटे पाचपर्यंत कृषी मालाची आवक सुरू राहणार आहे. रात्री १० ते सकाळी दहापर्यंत व्यापार करता येणार आहे. मार्केटमध्ये आलेली वाहने तीन तासात बाहेर गेली पाहिजेत. मोटारसायकल, कार या खासगी वाहनांना मार्केटमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. अडते, व्यापारी यांनी त्यांच्या गाळ्यामध्ये सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे.मार्केटमधील किरकोळ व्यापार बंद करण्यात आला असून, मोटारसायकल व कारना मार्केटमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे. बाजार समितीमध्ये ४५ वर्षांवरील सर्वांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ हजार रूपये दंड आकारण्यात येणार आहे.  मार्केटमध्ये एकावेळी २००पेक्षा जास्त ग्राहकांना सोडले जाणार नाही. मार्केटमध्ये चार गेटच सुरू ठेवले जाणार असून, इतर बंद केली जाणार आहेत. मार्केटमध्ये प्रत्येक गाळ्यात व्यापारी व एक मदतनीस यांनाच थांबता येणार आहे. रोजंदारीवर काम करणारांचीही अँटिजेन चाचणी करण्यास सुरुवात केली आहे.बाजार समितीमध्ये आवक वाढलीलॉकडाऊनच्या शक्यतेमुळे भाजीपाला मार्केटमध्ये शनिवारी तब्बल ६९१ वाहनांची आवक झाली होती. सोमवारीही ६६१ वाहनांची आवक झाली आहे. आवक वाढल्यामुळे भाजीपाल्याचे दर १५ टक्केे कमी झाले आहेत. मंगळवारपासून नियंत्रित आवक सुरू राहील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार सुरळीत सुरू राहील. याकडे लक्ष देण्यात आले आहे. प्रत्येक मार्केटमध्ये सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असून, भाजी मार्केटसाठी विशेष नियमावली लागू केली आहे.     - संदीप देशमुख, प्रभारी सचिव, एपीएमसीभाजी मार्केटसाठी नवीन नियमावली तयार केली असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत असून, मुंबई, नवी मुंबईकरांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा करण्यात येणार आहे.     - शंकर पिंगळे, संचालक, भाजी मार्केट

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती