शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी भागाला प्रवाहात आणण्याची गरज

By admin | Updated: May 6, 2017 06:22 IST

भविष्यात सुरू होणारे मेट्रो रेल्वेचे शेवटचे स्थानक, तळोजा कारागृह, सीआरपीएफ बटालियन केंद्र, सिडकोचा स्वप्नपूर्ती प्रकल्प

वैभव गायकर/ लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : भविष्यात सुरू होणारे मेट्रो रेल्वेचे शेवटचे स्थानक, तळोजा कारागृह, सीआरपीएफ बटालियन केंद्र, सिडकोचा स्वप्नपूर्ती प्रकल्प अशा बहुउद्देशीय प्रकल्पांचा समावेश असलेला खारघर व तळोजा शहराला जोडणारा असा प्रभाग क्र मांक तीन आहे. धामोळे आदिवासी पाडा, ओवा कॅम्प, तळोजा पाचनंद यामुळे गावांचा या प्रभागात समावेश आहे. मात्र सिडकोने या ठिकाणचा विकास करताना गावठाण, आदिवासी पाडे आणि शहरी भाग असा भेदभाव केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. हा भेदभाव पुसून सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न पनवेल महापालिकेला करावा लागणार आहे. खारघर नोडचा विस्तार सेक्टर ३५ पर्यंत झाल्यामुळे अत्याधुनिक शहर म्हणून हा भाग ओळखला जावू लागला आहे. तसेच तळोजा पाचनंद गावाच्या विरुध्द दिशेला पनवेल-दिवा महामार्गाशेजारी तळोजा पाचनंद म्हणजेच तळोजा फेज २ चा विकास झाला आहे. तसेच फेज ३ मध्ये विकसित झालेल्या वसाहतींमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. वसाहतीच्या दोन ते तीन किमी परिसरात पोलीस चौकी नसल्यामुळे थेट तळोजा एमआयडीसीत जावून पोलीस ठाणे गाठावे लागते. याशिवाय सिडकोच्या या वसाहतींमधील पाणीप्रश्न देखील गंभीर आहे. सिडकोने कबूल केल्याप्रमाणे मुबलक पाणि आजतागायत दिलेले नाही. कमी दाबाने पाणी येत असल्याने पुरेसे पाणी उपलब्ध नसते. महापालिका पाण्याची ही गंभीर समस्या सोडवेल अशी आशा इथले नागरिक व्यक्त करीत आहेत. तसेच तळोजा पाचनंद येथील नागरिक नवी मुंबई, मुंबईकडे जाण्यासाठी खारघर रेल्वेस्थानकाकडे जातात. पनवेल-दिवा लोहमार्ग ओलांडण्यासाठी उड्डाणपूल नसल्यामुळे इथल्या प्रवाशांची गैरसोय होते आहे. तसेच सार्वजनिक बसवाहतुकीच्या फेऱ्या वाढवून खारघर रेल्वे स्थानकाच्या रेल्वेच्या वेळेनुसार सुरू करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. ओवेकॅम्प, धामोळे आदिवासी पाड्यात भीषण पाणीटंचाई आहे. तळोजा हा भाग मुख्यत्वेकरून मुस्लीमबहुल भाग म्हणून ओळखला जातो. या परिसरात असलेल्या भोईरपाडा, पेठार्ली या गावांत देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. या मूलभूत प्रश्नांसह गावांतील तत्कालीन जिल्हापरिषदेच्या शाळांच्या इमारतींची अवस्था वाईट झाली आहे. महापालिकेने विद्यार्थ्यांना उत्साही वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी शाळांच्या इमारतींचा विकास करणे आवश्यक आहे.