शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

आदिवासी भागाला प्रवाहात आणण्याची गरज

By admin | Updated: May 6, 2017 06:22 IST

भविष्यात सुरू होणारे मेट्रो रेल्वेचे शेवटचे स्थानक, तळोजा कारागृह, सीआरपीएफ बटालियन केंद्र, सिडकोचा स्वप्नपूर्ती प्रकल्प

वैभव गायकर/ लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : भविष्यात सुरू होणारे मेट्रो रेल्वेचे शेवटचे स्थानक, तळोजा कारागृह, सीआरपीएफ बटालियन केंद्र, सिडकोचा स्वप्नपूर्ती प्रकल्प अशा बहुउद्देशीय प्रकल्पांचा समावेश असलेला खारघर व तळोजा शहराला जोडणारा असा प्रभाग क्र मांक तीन आहे. धामोळे आदिवासी पाडा, ओवा कॅम्प, तळोजा पाचनंद यामुळे गावांचा या प्रभागात समावेश आहे. मात्र सिडकोने या ठिकाणचा विकास करताना गावठाण, आदिवासी पाडे आणि शहरी भाग असा भेदभाव केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. हा भेदभाव पुसून सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न पनवेल महापालिकेला करावा लागणार आहे. खारघर नोडचा विस्तार सेक्टर ३५ पर्यंत झाल्यामुळे अत्याधुनिक शहर म्हणून हा भाग ओळखला जावू लागला आहे. तसेच तळोजा पाचनंद गावाच्या विरुध्द दिशेला पनवेल-दिवा महामार्गाशेजारी तळोजा पाचनंद म्हणजेच तळोजा फेज २ चा विकास झाला आहे. तसेच फेज ३ मध्ये विकसित झालेल्या वसाहतींमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. वसाहतीच्या दोन ते तीन किमी परिसरात पोलीस चौकी नसल्यामुळे थेट तळोजा एमआयडीसीत जावून पोलीस ठाणे गाठावे लागते. याशिवाय सिडकोच्या या वसाहतींमधील पाणीप्रश्न देखील गंभीर आहे. सिडकोने कबूल केल्याप्रमाणे मुबलक पाणि आजतागायत दिलेले नाही. कमी दाबाने पाणी येत असल्याने पुरेसे पाणी उपलब्ध नसते. महापालिका पाण्याची ही गंभीर समस्या सोडवेल अशी आशा इथले नागरिक व्यक्त करीत आहेत. तसेच तळोजा पाचनंद येथील नागरिक नवी मुंबई, मुंबईकडे जाण्यासाठी खारघर रेल्वेस्थानकाकडे जातात. पनवेल-दिवा लोहमार्ग ओलांडण्यासाठी उड्डाणपूल नसल्यामुळे इथल्या प्रवाशांची गैरसोय होते आहे. तसेच सार्वजनिक बसवाहतुकीच्या फेऱ्या वाढवून खारघर रेल्वे स्थानकाच्या रेल्वेच्या वेळेनुसार सुरू करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. ओवेकॅम्प, धामोळे आदिवासी पाड्यात भीषण पाणीटंचाई आहे. तळोजा हा भाग मुख्यत्वेकरून मुस्लीमबहुल भाग म्हणून ओळखला जातो. या परिसरात असलेल्या भोईरपाडा, पेठार्ली या गावांत देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. या मूलभूत प्रश्नांसह गावांतील तत्कालीन जिल्हापरिषदेच्या शाळांच्या इमारतींची अवस्था वाईट झाली आहे. महापालिकेने विद्यार्थ्यांना उत्साही वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी शाळांच्या इमारतींचा विकास करणे आवश्यक आहे.