शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

परांजपेंसाठी नवी मुंबई ठरू शकते फायद्याची, विचारेंना ठाणे, कोपरी प्लस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 11:30 PM

कसे असणार मतांचे गणित : नवी मुंबई, मीरा-भाईंदर राष्ट्रवादीला निर्णायक

- अजित मांडके ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे मतदारसंघात इतर उमेदवार असले, तरी खरी लढत ही शिवसेना विरुद्ध राष्टÑवादी अशीच होणार आहे.मागील लोकसभेपाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादीच्या हातातील तीन विधानसभा मतदारसंघ निसटले, तर शिवसेना आणि भाजपाच्या वाट्याला आता पाच मतदारसंघ आले आहेत; परंतु आता मोदीलाट ओसरली असल्याने राष्टÑवादीने ओवळा-माजिवडा, ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघांवर आपली मदार ठेवली आहे. तर, मीरा-भार्इंदरमध्ये फिफ्टी-फिफ्टी मतांचा जोगवा मिळण्याची शक्यता आहे. ठाणे, कोपरी, पाचपाखाडी हा मतदारसंघ निवडणुकीचा निकाल लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

२५ ठाणे लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीसह इतर काही छोटे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले, तरी खरी लढत ही राष्टÑवादी आणि शिवसेनेतच होणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, मीरा-भार्इंदर, ओवळा-माजिवडा, ऐरोली, बेलापूर या सर्वच विधानसभा मतदारसंघांतून राष्टÑवादीची पीछेहाट झाली होती. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीतही दिसून आला. राष्टÑवादीचा तीन विधानसभा मतदारसंघांत पराभव झाला. केवळ, ऐरोली मतदारसंघच त्यांना आपल्या ताब्यात ठेवण्यात यश आले. शिवाय, महापालिका निवडणुकांमध्येसुद्धा नवी मुंबई वगळता, ठाणे आणि मीरा-भार्इंदरमध्ये शिवसेना, भाजपचे नगरसेवक वाढलेले आहेत. परंतु, आता नवी मुंबई महापालिकेत राष्टÑवादीची सत्ता असल्याने या ठिकाणी शिवसेनेच्या मतांचा टक्का घटेल, असे बोलले जात आहे. तर, याच दोन मतदारसंघांतील मते राष्टÑवादीसाठी निर्णायक आणि निकालाला कलाटणी देणारी ठरू शकणार आहेत. शिवाय, मीरा-भार्इंदरमध्ये काँग्रेसने राष्टÑवादीला मदत केली, तर काहीअंशी मते वाढण्याची शक्यता आहे. तर, शिवसेनेसाठी कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, ओवळा-माजिवडा हे तीन मतदारसंघ निर्णायक ठरणार असून तेच टर्निंग पॉइंट ठरूशकणार आहेत.दोन उमेदवारांचे होल्ड असलेले हे आहेत प्रमुख विभागऐरोली आणि बेलापूरमध्ये सध्या नाईक फॅमिलीचे वर्चस्व आहे; परंतु मागील महापालिका निवडणुकीत या ठिकाणी शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये वाढ झालेली आहे, असे असले तरी हा पट्टा राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्यासाठी निर्णायक ठरूशकणार आहे.ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रांतील मतपेट्या या शिवसेनेसाठी नेहमीच निर्णायक ठरल्या आहेत. या दोनही मतदारसंघांत शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांचा ९९ टक्के भरणा आहे. त्यामुळे नवी मुंबईत राष्टÑवादीने लीड घेतले, तरी तो हा पट्टा मोडू शकतो.मागील निवडणुकीत शिवसेनेला ऐरोली २५ हजार, बेलापूर २० हजार, ठाणे ६० हजार, कोपरी-पाचपाखाडी ६८ हजार, ओवळा-माजिवडा ५८ हजार आणि मीरा-भार्इंदरमध्ये ४२ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे ते तोडण्याचे आव्हान राष्टÑवादीसमोर असणार आहे.2009ऐरोली, बेलापूर, ओवळा -माजिवडा येथे नाईक यांना जास्तीची मते मिळाल्यामुळे निकालाची दिशा बदलली होती.2014या ठिकाणाहून विचारे यांना ठाणे, कोपरी-पाचपाखाडी येथून एकगठ्ठा मते मिळाली होती.

टॅग्स :thane-pcठाणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक