शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
3
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
4
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
5
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
6
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
7
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
8
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
9
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
10
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
11
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
12
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
14
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
15
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
16
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
17
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
18
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
19
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
20
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

नाला व्हिजनच्या मार्गात खारफुटीचा अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 12:00 AM

नवी मुंबई शहर हे खाडीवर वसलेले शहर आहे. डोंगराळ भागातील पाण्याचा निचरा होणाऱ्या नैसर्गिक नाल्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे.

- योगेश पिंगळेनवी मुंबई : नवी मुंबई शहर हे खाडीवर वसलेले शहर आहे. डोंगराळ भागातील पाण्याचा निचरा होणाऱ्या नैसर्गिक नाल्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. नाले आणि होल्डिंग पॉण्डमध्ये वाढलेली खारफुटी ही गाळ काढण्याच्या कामात मोठी अडचण ठरत आहे. खारफुटीसारख्या विविध कारणांमुळे शहरातील या नाल्यांच्या प्रवाहामधील गाळ गेल्या अनेक वर्षांपासून काढण्यात आलेला नाही. यामुळे नाल्यामधून पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली असून शहरात पाणी शिरण्याचा धोका वाढला आहे.नवी मुंबई शहराची रचना ही साधारण एका बाजूला खाडी आणि दुसºया बाजूला डोंगर अशी आहे. डोंगराळ भागाला लागून एमआयडीसी क्षेत्र आहे, तर खाडी भागाच्या नजीक नागरी वसाहती आहेत. डोंगराळ भागातील पावसाळी पाण्याचा निचरा होणारे सुमारे ७४ नैसर्गिक नाले असून, समुद्राला येणाºया भरती काळात शहरात पाणी शिरू नये यासाठी शहरात होल्डिंग पॉण्ड बनविण्यात आले आहेत.शहरातील या नाल्यांमध्ये प्रामुख्याने नेरु ळ मधील वंडर्स पार्क, हार्डेलिया, जुईनगर रेल्वेस्थानक, अरेंजा कॉर्नर वाशी, सेक्टर ११ कोपरखैरणे, सेक्टर ६ व ७ घणसोली, घणसोली गाव, ऐरोली, यादवनगर, ऐरोली एमआयडीसी, दिघा, आंबेडकरनगर रेल्वेलाइन जवळील नाला, असे एकूण १७ नाले होल्डिंग पॉण्डला मिळालेले असून हे नाले म्हणजे शहराची लाइफलाइन म्हणून समजले जातात. यामधील काही नाल्यांची लांबी ४०० मीटर तर काही नाल्यांची लांबी सात किलोमीटर एवढी आहे. सर्व महत्त्वाच्या नाल्यांची एकूण लांबी साधारण ७८ किलोमीटर इतकी आहे.नाल्यांमधून डोंगराळ भागातील पावसाळी पाण्याबरोबर एमआयडीसी भागातील कंपन्यांचे सांडपाणी वाहून नेले जाते. नाल्यांमधून पाण्याच्या प्रवाहाबरोबर होल्डिंग पॉण्डमध्ये गाळ येत असून भरतीच्या वेळीही खाडीमधून होल्डिंग पॉण्डमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ येतो, तसेच होल्डिंग पॉण्डमध्ये खारफुटी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेक नाल्यांचे काँक्र ीटीकरण झाले नसल्याने नाल्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपेही वाढली आहेत.अनेक ठिकाणी नाल्यांशेजारी डेब्रिजमाफियांनी डेब्रिजचा भराव टाकल्याने नाल्यांचा आकार कमी झाला असून, पावसाळ्यात नाल्यांच्या शेजारी असलेल्या झोपड्यांमध्ये पाणी शिरून जीवितहानी होण्याच्या घटना घडल्या आहेत. मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामात महापालिकेच्या माध्यमातून या नाल्यांमधून वाहणाºया पाण्यातील काही प्रमाणावर अडथळे दूर केले जातात; परंतु खारफुटीमुळे नाल्यांच्या प्रवाहातील गाळ काढला जात नाही, त्यामुळे नाल्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली असून भविष्यात शहरात पाणी शिरण्याचा धोका वाढला आहे.>स्वच्छता विभागाकडून नाल्यांची स्वच्छताखाडीवर वसलेल्या शहरातील नाले, होल्डिंग पॉण्ड, खारफुटी आदीच्या कामासाठी महापालिकेकडे पर्यावरण अभियांत्रिकी अधिकारी असणे गरजेचे आहे; परंतु महापालिकेत या दर्जाचा अधिकारी नाही. मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामात शहरातील अंतर्गत गटारे स्वच्छ करणाºया स्वच्छता विभागाकडेच शहरातील प्रमुख नाल्यांच्या स्वच्छतेचे काम देण्यात येते. यामध्ये नाल्यांचा संपूर्ण प्रवाह स्वच्छ न करता फक्त ठरावीक ठिकाणचे अडथळे दूर करण्यात येतात.>संरक्षक भिंत बांधण्याची मागणीसुरक्षेच्या दृष्टीने दिघा, ऐरोली, इंदिरानगर व इतर ठिकाणच्या नाल्यांना संरक्षक भिंत बांधण्याची मागणी नगरसेवकांनी सभागृहात केली आहे; परंतु केंद्र शासनाकडून नाला व्हिजन राबविण्याचे आश्वासन प्रशासनाकडून वारंवार देण्यात आले आहे.>खारफुटीचा प्रभाव होल्डिंग पॉण्डवर मोठ्या प्रमाणावर आहे. याबाबतचे प्रकरण न्यायालयात असून गाळ काढण्यासाठी परवानगी मागणार आहोत. इतर नाल्यांमध्ये किती प्रमाणावर खारफुटी आहे, ते पाहावे लागेल. काही अडथळा नसल्यास त्या टप्प्याटप्प्यातील नाल्यांचे काँक्र ीटीकरण करण्यात येत आहे. खारफुटीमुळे सर्व नाल्यांचे काँक्र ीटीकरण झाले नाही आणि सर्व नाले एकत्रित काँक्र ीटीकरण करणेही मोठे खर्चिक आहे. जेएनयूआरएम असताना याबाबत बजेट काढण्यात आले होते ते सुमारे ६०० कोटी रु पयांच्यावर होते. आर्थिक आणि इतर अडचणी पाहूनच या बाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.- डॉ. रामास्वामी एन., महापालिका आयुक्त