शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

माथाडी संघटना सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाला, विरोधात राहिल्यास अस्तित्व संपण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 02:09 IST

पाच दशके काँग्रेस व नंतर राष्ट्रवादीसोबत असलेल्या बहुतांश माथाडी संघटना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाला गेल्या आहेत.

- नामदेव मोरेनवी मुंबई - पाच दशके काँग्रेस व नंतर राष्ट्रवादीसोबत असलेल्या बहुतांश माथाडी संघटना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाला गेल्या आहेत. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे; परंतु प्रत्यक्षात विरोधात राहून अस्तित्व संपण्याची भीती वाटल्याने सत्ताधारी पक्षाशी जवळीक साधली असल्याचे बोलले जात आहे. सत्ताधाºयांच्या जवळीकतेमुळे आतातरी प्रलंबित सर्व प्रश्न सुटणार का? याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.महाराष्ट्रातील कामगार चळवळीमध्ये माथाडी संघटनेला महत्त्वाचे स्थान आहे. विविध माथाडी मंडळांमध्ये तब्बल ४२ हजार ९०६ नोंदीत कामगार आहेत. कामगार क्षेत्रामध्ये माथाडी संघटनांची ताकद आहेच शिवाय राजकारणामध्येही संघटनांचा दबदबा आहे. सातारा जिल्ह्यातील छोट्याशा खेड्यातून मुंबईत नोकरीसाठी आलेल्या अण्णासाहेब पाटील यांनी ५० वर्षांपूर्वी असंघटित माथाडी कामगारांना संघटित करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनची स्थापना करून कामगारांच्या हक्कासाठी लढा सुरू केला. या लढ्याला यश येऊन महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९६९ हा कायदा अस्तित्वात आला.कामगारांच्या हक्काचे संरक्षण झाले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व राज्यातील काँगे्रसच्या अनेक नेत्यांनी संघटनेला बळकटी देण्याचे काम केले. १९९० पर्यंत महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन ही एकमेव संघटना होती. ४ मार्च १९९० मध्ये नेतृत्वाच्या मुद्द्यावरून संघटनेमध्ये निवडणूक झाली व नंतर फूट पडून विविध संघटना स्थापन होण्यास सुरुवात झाली. सद्यस्थितीमध्ये मूळ संघटनेबरोबर ३० ते ३५ माथाडी संघटना राज्यात कार्यरत आहेत.राज्यातील प्रमुख चार माथाडी संघटनांपैकी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन ही संघटना सुरुवातीला काँगे्रस व नंतर राष्ट्रवादी काँगे्रस सोबत होती. राष्ट्रवादी काँगे्रसच्या स्थापनेचा मुंबईतील मेळावाही कामगारांनी यशस्वी करून दाखविला होता. विधानसभा व लोकसभेच्या यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ माथाडी मेळाव्यात फुटला होता. संघटनेचे कार्याध्यक्ष शशिकांत शिंदे राष्ट्रवादीच्या तिकिटावर चार वेळा आमदार झाले आहेत. सरचिटणीस नरेंद्र पाटील हेही राष्ट्रवादीमधून विधानपरिषद सदस्य झाले होते; परंतु सद्यस्थितीमध्ये ते भाजपमध्ये व लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेत गेले.कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरची भांडीही घासेन हे त्यांनी यापूर्वीच्या मेळाव्यात स्पष्ट केले होते. पक्षीय राजकारणापेक्षा कामगारांचे प्रश्न महत्त्वाचे असेही त्यांनी स्पष्ट केले होते. नुकत्याच झालेल्या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देऊन सत्ताधाºयांबरोबर कामगार राहतील असे स्पष्ट केले आहे. त्यांच्यासह इतर तीन संघटनांचे नेतेही भाजपमध्ये गेले आहेत. सत्ताधाºयांशी जवळीकता साधल्यानंतर तरी कामगारांचे प्रश्न सुटणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.भाजपबरोबर जवळीकमाथाडीनेते शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यांना वगळता इतर प्रमुख माथाडीनेत्यांनी भाजपबरोबर जवळीक साधली आहे. यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचाही समावेश आहे.अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अविनाश रामिष्टे, अखिल महाराष्ट्र माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे दिनकर पाटील, महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे बळवंत पवार यांनीही काँगे्रसची साथ सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.कामगारांची फरफट सुरूमाथाडी संघटना वर्षानुवर्षे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सोबत होत्या, यामुळे कामगारही नवी मुंबईसह सातारा, सांगली, पुणे व इतर जिल्ह्यांमध्ये काँगे्रस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करू लागले होते. अनेक माथाडी कामगार दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य आहेत; परंतु आता नेत्यांनीच पक्षांतर केल्यामुळे अनेक कामगार व पदाधिकाºयांची फरफट होऊ लागली आहे. संघटनेमधील नेत्यांचे ऐकायचे की गावाकडील नेतृत्वाचे, असा प्रश्न पडला आहे.संघटनांमध्ये राजकारण नकोप्रमुख माथाडी कामगार संघटना आतापर्यंत राष्ट्रवादी व काँगे्रससोबत होत्या; परंतु पाच वर्षांमध्ये कामगारांचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी अनेक संघटनांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. माथाडी संघटनांमध्ये राजकारण येऊ नये. नेत्यांनीही संघटना एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन कामगार करू लागले आहेत. नेत्यांनीही संघटनेमध्ये राजकारण आणणार नाही, असे स्पष्ट करून कामगारहिताला प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट केले आहे. प्रत्यक्षात काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.कामगारांचे प्रश्न व मागण्या पुढीलप्रमाणे१माथाडी कायद्याला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत, हा कायदा राज्यातील सर्व कंपन्या व इतर राज्यांमध्येही लागू केला जावा. माथाडी मंडळांमध्ये पूर्ण वेळ चेअरमन व सेक्रेटरीची नेमणूक करणे.२राज्यांमधील कारखान्यांमधून माथाडी कायदा वगळू नये.३विविध माथाडी बोर्डामध्ये कर्मचारी भरती करताना माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य दिले जावे.४माथाडी मंडळांची पुनर्रचना करणे व पुनर्रचित माथाडी मंडळावर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांची नेमणूक करणे.५नाशिक जिल्हातील बाजार समितींमधील माथाडी, मापाडी कामगारांच्या लेव्हीचा प्रश्न सोडवावा.६नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, लातूर जिल्ह्यांमध्ये माथाडी कामगारांना सिडको, म्हाडा अथवा इतर प्राधिकरणामार्फत घरे अथवा घरकुलासाठी जमीन मिळवून द्यावी.७माथाडी कायद्यामधील त्रुटी सुधारून तो अधिक सक्षम करण्यात यावा, कायद्याचे अस्तित्व संपणार नाही याची काळजी घ्यावी.

टॅग्स :PoliticsराजकारणNavi Mumbaiनवी मुंबईMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019