शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

तीन वर्षांत १७०० वाहनांची चोरी, गतवर्षात ३५६ वाहनांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 3:15 AM

गतवर्षी शहरातून ३५६ वाहने चोरीला गेली असून त्यामध्ये २१७ दुचाकींचा समावेश आहे. गतवर्षी वाहनचोरीच्या घटना कमी असल्या तरीही गुन्ह्यांची समाधानकारक उकल करण्यात मात्र पोलिसांना अपेक्षित यश आलेले नाही. बहुतांश वाहने वाहनचालक अथवा मालकांच्या निष्काळजीमुळे चोरीला गेलेली आहेत.

नवी मुंबई : गतवर्षी शहरातून ३५६ वाहने चोरीला गेली असून त्यामध्ये २१७ दुचाकींचा समावेश आहे. गतवर्षी वाहनचोरीच्या घटना कमी असल्या तरीही गुन्ह्यांची समाधानकारक उकल करण्यात मात्र पोलिसांना अपेक्षित यश आलेले नाही. बहुतांश वाहने वाहनचालक अथवा मालकांच्या निष्काळजीमुळे चोरीला गेलेली आहेत.पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातून मागील तीन वर्षात १७०० हून अधिक वाहने चोरीला गेली आहेत. २०१५ मध्ये ५९४ तर २०१६ मध्ये ६७६ वाहन चोरीचे गुन्हे घडले आहेत. त्यापैकी सुमारे पाचशे गुन्हे तीन वर्षात उघड झाले आहेत. वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण इतर गुन्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. अनेकदा चोरीची वाहने राज्याबाहेर नेली जात असल्याने त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना अपेक्षित यश येत नाही. मागील दोन वर्षात पोलिसांनी दुचाकीचोरांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. त्यामुळे गतवर्षात वाहनचोरीच्या गुन्ह्यांना काही प्रमाणात आळा बसलेला आहे. त्यानुसार वर्षभरात परिमंडळ एकमध्ये ३५६ गुन्हे घडले असून २०१६ साली ४८० गुन्हे घडले होते. चोरीला गेलेल्या वाहनांमध्ये ट्रक, टेंपो, कार यासह दुचाकींचा समावेश आहे. इतर वाहनांच्या तुलनेत दुचाकीची चोरी सहज शक्य असते. यामुळे परिमंडळ एकमध्ये गतवर्षी झालेल्या गुन्ह्यांमध्ये २१७ गुन्हे दुचाकी चोरीचे आहेत.शहरात नियोजनबध्द वाहन पार्किंग नसल्याने रस्त्यालगत, मोकळ्या जागेवर वाहने उभी केली जातात. त्यात दुचाकी म्हणजे वाटेल तिथे उभे करण्याचे वाहन असा काहींचा समज आहे. यामुळे नो पार्किंगमधून अथवा रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकीचोरीचे प्रमाण अधिक आहे. वाहन चालकांकडून योग्यती खबरदारी घेतली जात नसल्याने असे प्रकार घडत आहेत. त्याची पोलिसांना देखील डोकेदुखी होत आहे. गतवर्षात उघड झालेल्या काही गुन्ह्यांमध्ये बालगुन्हेगारांचाही समावेश असल्याचे समोर आलेले आहे. मौज म्हणून चोरलेली दुचाकी वापरून आडोशाच्या ठिकाणी टाकली जाते, अथवा विकली जाते. त्यामुळे चोरीला गेलेले वाहन परत मिळेल याची शाश्वती कमी झालेली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई