शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

किरकोळ वादातून वाढल्या हत्या, वाढता तणाव जातोय विकोपाला; पोलिसांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 1:07 AM

गतवर्षात हत्येच्या २४ घटना घडल्या असून, त्यामागे किरकोळ वादाचे कारण असल्याचे तपासात समोर आलेले आहे.

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : गतवर्षात हत्येच्या २४ घटना घडल्या असून, त्यामागे किरकोळ वादाचे कारण असल्याचे तपासात समोर आलेले आहे. यावरून वाढता मानसिक तणाव विकोपाला जाऊन, हत्या घडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा घटनांना आवर घालण्याचे नवे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे.नवी मुंबईत (परिमंडळ एक) तीन वर्षांत एकूण ११५ हत्या झाल्या आहेत. २०१५मध्ये ४९, २०१६मध्ये ४२, तर २०१७मध्ये २४ हत्या झाल्या आहेत. मागील दोन वर्षांपेक्षा २०१७मध्ये हत्येच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. तर घडलेल्या गुन्ह्यांपैकी सर्वाधिक हत्या आपसातील किरकोळ वादातून घडल्या आहेत. गतवर्षात घडलेल्या २४ हत्यांपैकी २३ गुन्ह्यांची उकल पोलिसांनी अत्यंत शिताफीने केली आहे; परंतु उकल झालेल्या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीतून घडलेल्या गुन्ह्यांऐवजी किरकोळ वादातून घडलेले गुन्हेच सर्वाधिक असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. यामुळे किरकोळ भांडणांचा वाढता तणाव विकोपाला जाऊन गुन्हे घडत असल्याचे दिसून येत आहे. कोणताही पूर्वनियोजित कट न रचता, रागाच्या भरात त्याचक्षणी हे गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये पती- पत्नीचे भांडण, व्यवसायातून झालेले किरकोळ वाद, अथवा पूर्ववैमनस्य अशा प्रमुख कारणांचा अधिक समावेश आहे. त्यापैकी पती-पत्नीतील वादाला, चारित्र्य संशयाचे कारण गंभीर ठरत आहे. पत्नीची एखाद्या पुरुषासोबत असलेली जवळीक, पतीच्या मनात निर्माण झालेला संशय वेळीच दूर न झाल्यास त्यांच्यात वाद होत आहेत, अशी काही प्रकरणे टोकाला जाण्यापूर्वी पोलिसांनी त्यांच्यातले गैरसमज दूर करण्याचीही भूमिकाही बजावलेली आहे; परंतु चर्चेतून प्रश्न मिटवण्याऐवजी संशय डोक्यातच ठेवल्याने वाद विकोपाला जात आहेत. अशाच प्रकारातून पतीने पाच महिन्यांच्या गरोदर पत्नीची हत्या केल्याचा गुन्हा २०१७च्या अखेरीस घडला होता. तर प्रेमसंबंधातून लग्नाला भाग पाडल्याने लग्नाच्या चौथ्या दिवशी तिची हत्या करून तुकडे केल्याचा प्रकार मुंबईत घडला होता. या गुन्ह्याची उकल नवी मुंबई पोलिसांनी रबाळे एमआयडीसी हद्दीत सापडलेल्या शिर नसलेल्या धडावरून केली होती. त्याशिवाय घणसोली गावामध्ये मटण विक्रेत्याकडे काम करणाºया तरुणाची हत्या, कोपरखैरणेतील फर्निचर व्यावसायिकाची हत्या, गोठीवली येथे पतीने केली पत्नीची हत्या, असे अनेक हत्येचे गुन्हे किरकोळ वादातून घडले आहेत.गोठीवली येथे घडलेला गुन्हा पती-पत्नीमधील सततच्या वादातून घडला होता. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाचा मनस्ताप असह्य झाल्याने पतीने तिची हत्या करून पळ काढला होता. हल्ली प्रत्येक जण नोकरी, व्यवसायातील स्पर्धेमुळे तणावग्रस्त जीवन जगत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा