शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे संसार उघड्यावर

By admin | Updated: October 7, 2015 00:28 IST

दिघा येथील अनधिकृत इमारतींवर सुरु असलेल्या कारवायांमध्ये तीन दिवसांत १५० कुटुंबे रस्त्यावर आली असून पुढील कारवायांमध्ये हा आकडा शेकडोवर जाणार आहे.

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबईदिघा येथील अनधिकृत इमारतींवर सुरु असलेल्या कारवायांमध्ये तीन दिवसांत १५० कुटुंबे रस्त्यावर आली असून पुढील कारवायांमध्ये हा आकडा शेकडोवर जाणार आहे. भूमाफियांचे बळी ठरलेल्या या कुटुंबांवर छतच राहिले नसून घेतलेले गृहकर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमआयडीसीने दिघा येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाईला सुरवात केली आहे. दोन दिवसात तीन इमारतींवर झालेल्या कारवायांमध्ये सुमारे दीडशे कुटुंबे बेघर झाली आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार परिसरातील ९९ इमारतींवर कारवाई होणार आहे. त्यामुळे येत्या काळात तिथले शेकडो संसार उघड्यावर येणार आहेत. यापैकी बरेच जण नोकरी व्यवसाय निमित्ताने विविध राज्यातून मुंबईला आलेले आहेत. परंतु मुंबईसारख्या महागड्या शहरात घर घेणे शक्य नसल्याने बहुतांश कुटुंबांनी नवी मुंबईत स्वस्तात घरे घेतलेली आहेत. मात्र आयुष्यभराची जमा केलेली पुंजी खर्चून घेतलेल्या घरांवर कारवाई होईल, असा विचारही त्यांनी केलेला नसावा. त्यामुळे आमचा दोष काय, असा प्रश्न बेघर झालेल्या कुटुंबांना पडला आहे. ज्यांनी अनधिकृत इमारती उभारल्या, घरांचे रजिस्ट्रेशन केले, कर्जासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करून दिली, ते कोट्यवधी रुपये फस्त करून मोकाटच आहेत. यामुळे त्यांच्यावर देखील कारवाईची मागणी प्रगती भोईर यांनी केली आहे. एमआयडीसीच्या जागेवर अनधिकृत बांधकामे होत असताना संबंधित अधिकारी व राजकारण्यांनी डोळेझाक करत भूमाफियांना मूकसंमती दिली. त्यांनी वेळीच अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे पाऊल उचलले असते तर शेकडो कुटुंबांची फसवणूक टळली असती अशी भावना मोहन जगतसिंग यांनी व्यक्त केली....यांचीही संपत्ती जप्त कराअनधिकृत बांधकाम करणाऱ्यासह त्याला जबाबदार प्रशासकीय अधिकारी व राजकारणी यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक आहे. त्यामुळे दिघा येथे अनधिकृत इमारती उभारणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची संपत्ती जप्त करण्याची मागणी याचिकाकर्ते राजीव मिश्रा यांनी न्यायालयाकडे केली आहे. या संपत्तीमधून फसवणूक झालेल्या कुटुंबांना त्यांच्या घराच्या रकमेची परतफेड करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे. परंतु अद्याप विकासकांवर कसलीही कारवाई झालेली नसल्याने पोलिसांना तक्रारीची प्रतीक्षा आहे का, असा प्रश्न पडला आहे. वित्तसंस्थांसमोर कर्जवसुलीचा प्रश्नअनधिकृत बांधकामांना अथवा झोपडपट्टी परिसरातील घरांना राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नाहीत. यामुळे जादा व्याजदर आकारून अनेक वित्तसंस्थांकडून त्यांना कर्ज देण्यासाठी पुढे येतात. दिघा येथे कारवाईत तुटलेल्या बहुतांश घरांना अशाच वित्तसंस्थांनी गृहकर्ज दिलेले आहे. परंतु त्यांनी ज्या घरासाठी कर्ज दिले ते घरच राहिलेले नसल्याने बेघर झालेले अनेक जण कर्जाची परतफेड करतील याबाबत शंकाच आहे. त्यामुळे संबंधित वित्तसंस्थांना कर्ज वसुलीचा प्रश्न पडला आहे.बेघर झालेल्या या कुटुंबांना लवकरच बँक व पतपेढीच्या जाचक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. ३० ते ५० लाखांची ही घरे बँक अथवा पतपेढीच्या कर्जावर घेतलेली आहेत. त्यामध्ये सर्वसामान्यांसह शासकीय कर्मचारी, पोलीस व पत्रकार यांच्याही कुटुंबांचा समावेश आहे. परंतु कारवाईत घरच तुटल्याने गृहकर्ज फेडायचे कसे हा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे आहे. आयुष्यभराच्या जमापुंजीतून घेतलेल्या घराचे छतच हरपल्याच्या मनस्तापात काहींचे आयुष्यही उद्ध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.