शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

राज्यात उष्णता लाट कृती आराखड्यास हरताळ; १३ जिल्हे उष्णताप्रवण

By नारायण जाधव | Updated: April 17, 2023 20:40 IST

राज्यातील १३ जिल्हे उष्णताप्रवण : उपाययोजना कागदावरच

नारायण जाधव

नवी मुंबई : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाने २९ मार्च २०२३ रोजी जागतिक तापमान वाढ लक्षात घेऊन राज्याचा उष्णता लाट कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार राज्यातील १५ जिल्हे उष्णताप्रवण असून, त्यात अनेक उपाययोजना सूचविल्या आहेत. यात मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्याचा समावेश नाही. मात्र, तरीही खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला उपस्थित १३ श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याने राज्याचा उष्णता लाट कृती आराखड्याचे काय झाले, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन सचिव आसिम गुप्ता यांनी हा उष्णता लाट कृती आराखडा जाहीर केला आहे. यात उष्णतेपासून बचाव करण्यासाठी ज्या उपायोजना सुचविल्या आहेत, त्यांचे अनेक ठिकाणी पालन होत नसल्याचे खारघरच्या घटनेवरून निदर्शनास आले आहे.

या आहेत उपाययोजना

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दर पंधरा दिवसांनी उष्माघाताच्या रुणांबाबत आढावा घेऊन त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करणे, सर्व शासकीय रुग्णालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या उष्माघाताच्या रुग्णांची स्वतंत्र नोंद ठेवून त्याचा अहवाल सादर करणे, उष्णता प्रवण जिल्ह्यांसह इतर सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांसोबत मार्च ते जून या महिन्यात दर पंधरा दिवसांत बैठक घेऊन उष्णता लाटेचा आढावा घेणे, हेल्पलाइन क्रमांक १०४, १०८,११२, १०७७ विषयी जनजागृती करणे, २४ तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवणे, एफएम वाहिन्यांसह वृत्तपत्रे, दूरदर्शनवर जनजागृती करणे, यात्रेची ठिकाणी, आठवडा बाजार, मोर्चे, निदर्शने, धार्मिक कार्यक्रम यातील गर्दीचे नियोजन करणे, बसस्थानक, रेल्वे स्थानक येथील पंखे सुरू ठेवणे, पाण्याची सोय करणे, शाळा सकाळच्या सत्रातच सुरू ठेवणे, बाजार समिती, शाळा, कॉलेज, सार्वजनिक ठिकाणे, फेरीवाला झोन येथे सावली निर्माण करणे, शहरात ये-जा करणारी लोकसंख्या लक्षात घेऊन नियोजन करणे.

हे आहेत उष्णता प्रवण १३ जिल्हे

नागपूर विभागातील गडचिरोली वगळता सर्व जिल्हे, अमरावती विभागातील अमरावती वगळता सर्व जिल्हे, खान्देशातील धुळे, जळगाव आणि मराठवाड्यातील नांदेड व हिंगोली असे १३ जिल्हे उष्णता प्रवण क्षेत्रातील असल्याचे या आराखड्यात म्हटले आहे.

या आराखड्यात उष्णतेपासून बचावासाठी काय करावे, काय करू नये, याबाबतच्या सूचनांसह उन्हात रोजगार हमीची कामे करू नयेत, शहरातील बाग बगीचे दुपारी सुरू ठेवू नयेत, गर्दीवर नियंत्रण ठेवणे, उन्हात कार्यक्रम घेऊ नये, अशा महत्त्वपूर्ण सूचना आहेत. 

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलSun strokeउष्माघात