शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
2
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
3
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
4
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
5
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
6
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
7
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
8
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
9
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
10
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
11
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
12
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
13
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
14
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
15
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
16
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
17
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
18
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
19
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
20
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, सोपा विधी अन् काही मान्यता!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात उष्णता लाट कृती आराखड्यास हरताळ; १३ जिल्हे उष्णताप्रवण

By नारायण जाधव | Updated: April 17, 2023 20:40 IST

राज्यातील १३ जिल्हे उष्णताप्रवण : उपाययोजना कागदावरच

नारायण जाधव

नवी मुंबई : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाने २९ मार्च २०२३ रोजी जागतिक तापमान वाढ लक्षात घेऊन राज्याचा उष्णता लाट कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार राज्यातील १५ जिल्हे उष्णताप्रवण असून, त्यात अनेक उपाययोजना सूचविल्या आहेत. यात मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्याचा समावेश नाही. मात्र, तरीही खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला उपस्थित १३ श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याने राज्याचा उष्णता लाट कृती आराखड्याचे काय झाले, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन सचिव आसिम गुप्ता यांनी हा उष्णता लाट कृती आराखडा जाहीर केला आहे. यात उष्णतेपासून बचाव करण्यासाठी ज्या उपायोजना सुचविल्या आहेत, त्यांचे अनेक ठिकाणी पालन होत नसल्याचे खारघरच्या घटनेवरून निदर्शनास आले आहे.

या आहेत उपाययोजना

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दर पंधरा दिवसांनी उष्माघाताच्या रुणांबाबत आढावा घेऊन त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करणे, सर्व शासकीय रुग्णालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या उष्माघाताच्या रुग्णांची स्वतंत्र नोंद ठेवून त्याचा अहवाल सादर करणे, उष्णता प्रवण जिल्ह्यांसह इतर सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांसोबत मार्च ते जून या महिन्यात दर पंधरा दिवसांत बैठक घेऊन उष्णता लाटेचा आढावा घेणे, हेल्पलाइन क्रमांक १०४, १०८,११२, १०७७ विषयी जनजागृती करणे, २४ तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवणे, एफएम वाहिन्यांसह वृत्तपत्रे, दूरदर्शनवर जनजागृती करणे, यात्रेची ठिकाणी, आठवडा बाजार, मोर्चे, निदर्शने, धार्मिक कार्यक्रम यातील गर्दीचे नियोजन करणे, बसस्थानक, रेल्वे स्थानक येथील पंखे सुरू ठेवणे, पाण्याची सोय करणे, शाळा सकाळच्या सत्रातच सुरू ठेवणे, बाजार समिती, शाळा, कॉलेज, सार्वजनिक ठिकाणे, फेरीवाला झोन येथे सावली निर्माण करणे, शहरात ये-जा करणारी लोकसंख्या लक्षात घेऊन नियोजन करणे.

हे आहेत उष्णता प्रवण १३ जिल्हे

नागपूर विभागातील गडचिरोली वगळता सर्व जिल्हे, अमरावती विभागातील अमरावती वगळता सर्व जिल्हे, खान्देशातील धुळे, जळगाव आणि मराठवाड्यातील नांदेड व हिंगोली असे १३ जिल्हे उष्णता प्रवण क्षेत्रातील असल्याचे या आराखड्यात म्हटले आहे.

या आराखड्यात उष्णतेपासून बचावासाठी काय करावे, काय करू नये, याबाबतच्या सूचनांसह उन्हात रोजगार हमीची कामे करू नयेत, शहरातील बाग बगीचे दुपारी सुरू ठेवू नयेत, गर्दीवर नियंत्रण ठेवणे, उन्हात कार्यक्रम घेऊ नये, अशा महत्त्वपूर्ण सूचना आहेत. 

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलSun strokeउष्माघात