शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
7
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
8
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
9
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
10
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
11
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
12
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
13
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
14
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
16
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
17
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
18
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
19
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
20
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

महिला सुरक्षेबाबत सरकार असंवेदनशील; चित्रा वाघ यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:49 IST

वाशीतील कोविड केअर सेंटरची केली पाहणी

नवी मुंबई : कोरोना संसर्गाच्या काळात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. मागील दहा दिवसांत राज्याच्या विविध जिल्ह्यांत अशा प्रकारचे अमानुष्य प्रकार घडले आहे. काही ठिकाणी विलगीकरण केंद्रात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित महिलांवरही अत्याचार करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांबाबत राज्य सरकारकडून कोणतेही कारवाई होताना दिसत नाही. यातून महिलांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकार किती संवेदनशील आहे, हे दिसून येते, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे.

कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाºया कोरोनाबाधित महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमधील कोविड केअर सेंटरमध्ये महिला रुग्णांसाठी असलेल्या सोईसुविधा व उपचार पद्धतीचा चित्रा वाघ यांनी सोमवारी आढावा घेतला. त्यानंतर, पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. कोरोनाच्या अगोदर आणि आता कोरोनामध्ये महिलांवरील अत्याचार सुरूच आहेत.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने दिशा कायदा आणण्याचे आश्वासन फेब्रुवारी महिन्यात दिले होते. त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही. मुळात सरकार कोणाचेही असो, महिलांच्या सुरक्षेबाबत तडजोड करता कामा नये, असे स्पष्ट करून महिला सुरक्षिततेच्या प्रश्नांवर कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन यावेळी चित्रा वाघ यांनी केले आहे. कोविड केंद्रात उपचार घेणाºया कोरोनाग्रस्त महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस नियमावली असायला हवी असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी खासदार संजीव नाईक, माजी नगरसेविका नेत्रा शिर्के, तसेच महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अत्याचार करणाºयास कठोर शिक्षा व्हावी
कोविड केंद्रात उपचार घेणाºया कोरोनाग्रस्त महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस नियमावली असायला हवी. कोरोनाग्रस्त महिलेवर अत्याचार करणाºयाला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याचबरोबर, संबंधित उपचार घेत असलेल्या कोविड सेंटरच्या प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी. कारण कोरोनाविरुध्दची लढाई कधी संपेल, हे सांगता येत नाही, परंतु महिलांवर अत्याचार करणारी प्रवृत्ती संपायला हवी, असे मत चित्रा वाघ यांनी व्यक्त
केले आहे.