शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या नादात पर्यावरणाचा विनाश

By admin | Updated: July 2, 2017 06:33 IST

विकासाच्या नादात पर्यावरणाचा विनाश होत असून, उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती ही मानवनिर्मित असल्याची खंत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : विकासाच्या नादात पर्यावरणाचा विनाश होत असून, उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती ही मानवनिर्मित असल्याची खंत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. त्यामुळे पर्यावरणपूरक जीवन जगण्याचा संकल्प करून, तीन वर्षांत ५० कोटी झाडे लावण्याचा निर्धार सरकारने केला असल्याचेही ते म्हणाले. वन विभागामार्फत राबवल्या जात असलेल्या राज्यस्तरीय वृक्ष लागवडीच्या महामोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी ते ऐरोली येथे उपस्थित होते.राज्यासह अनेक ठिकाणी सध्या पूरपरिस्थितीचा प्रसंग उद्भवत आहे; परंतु ही नैसर्गिक आपत्ती नसून मानवनिर्मित आपत्ती असल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. शहरांचा विकास करण्याच्या नादात जल, जंगल व जमीन यांचा विनाश होत चालला असून, नद्यांचे रूपांतर नाल्यात झाले आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन वन विभागामार्फत तीन वर्षांत राज्यात ५० कोटी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. गतवर्षी या मोहिमेला सुरुवात झाली असून, यंदा ४ कोटी झाडे लावली जाणार आहेत. त्याकरिता १ ते ७ जुलै दरम्यान राज्यात वृक्ष लागवडीची महामोहीम राबवली जात आहे. त्याचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी ऐरोली येथील जैव विविधता केंद्रालगत करण्यात आला. या वेळी खाडीकिनारच्या मोकळ्या जागेत सुमारे १८०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. राज्यात तीन वर्षांत एकूण ५० कोटी झाडे लावली जाणार असून, प्रत्येक झाड लावल्यानंतर जिओ टॅगिंगद्वारे त्यावर लक्ष ठेवले जात असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.‘जलयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत पाण्याचे स्रोत पुनरुजीवित करण्याचे काम सुरू असून, गाळमुक्त नदी, शिवार हे नवे धोरण राबवले जाणार असून, पर्यावरणपूरक जीवन जगण्याचा सरकारचा संकल्प असल्याचेही ते म्हणाले. या वेळी ईशा फाउंडेशनचे प्रमुख सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या देशभर सुरू असलेल्या नदीबचाव कार्याची प्रशंसा मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच राज्यात ही मोहीम राबवण्याकरिता सरकार त्यांच्यासोबत असल्याचे आश्वासन दिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आगामी काळात पर्यावरणपूरक इंधनावर चालणाऱ्या वाहनांवर भर दिला जाणार असल्याचे सांगितले. त्याची प्राथमिक सुरुवात नागपूरमध्ये बायो इंधनवर चालणाऱ्या ५५ बस सुरू करून केल्याचेही त्यांनी नमूद केले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात २० टक्केपेक्षा कमी हरित क्षेत्र असून, वृक्षारोपण महामोहिमेतून हे प्रमाण ३३ टक्क््यांपर्यंत करणार असल्याचा निर्धार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास राज्यमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम, पालकमंत्री एकनाथ शिंदे, सद्गुरू जग्गी वासुदेव, महापौर सुधाकर सोनवणे, आमदार मंदा म्हात्रे आदी उपस्थित होते.संत तुकाराम वनग्राम पुरस्काराचे प्रदानवन संरक्षणाला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने राज्यात संत तुकाराम वनग्राम पुरस्कार दिला जातो. यानुसार २०१५चा हा पुरस्कार नागपूरमधील सोनापूर गावातील संयुक्त वन समितीला प्रदान करण्यात आला. दहा लाख रुपयांचा धनादेश व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. त्याशिवाय चंद्रपूरमधील पवनपार, लातूरमधील लांबोटा, नांदेडमधील बेंभरगाव, गोंदियामधील नवाटोळा व हिंगोलीमधील अंजनवाडा या गावांनाही द्वितीय व तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.वन्यजीव सुरक्षा वाहनजंगलातील पशू-पक्ष्यांवर उपचार करता यावेत, त्यांना सुरक्षा मिळावी, याकरिता वन विभागातर्फे वन्यजीव सुरक्षा वाहन तयार करण्यात आले आहे. अशाप्रकारचे वाहन राज्यात प्रथमच वापरले जाणार असून, त्याद्वारे जखमी वन्यजीवांना वेळीच उपचार मिळणार आहेत. सद्यस्थितीला हे वाहन बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असणार आहे. मोटारसायकल रॅलीवृक्षारोपणाचा संदेश देण्यासाठी मोटारसायकल रॅली काढण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. वृक्षारोपण सप्ताहाच्या सात दिवसांच्या कालावधीत ते ऐरोली ते नाशिक, अमरावती, बीड, अहमदनगर, पुणे व ठाणे असा सुमारे दोन हजार किलो मीटरचा प्रवास करणार आहेत.