शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
2
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
3
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
4
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
5
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
6
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
7
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
8
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
9
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
10
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
11
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
12
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
13
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
14
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात नो एन्ट्री, केवळ बहुपक्षीय स्पर्धांसाठीच परवानगी; भारत सरकारकडून भूमिका स्पष्ट
15
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
16
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
17
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
18
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
19
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
20
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
Daily Top 2Weekly Top 5

‘जैत रे जैत’ चे भयाण वास्तव

By admin | Updated: October 7, 2016 05:45 IST

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये मैलाचा दगड ठरलेल्या ‘जैत रे जैत’ चित्रपटाची कथा रानसई व परिसरातील आदिवासींच्या जीवनावर आधारित आहे. चार दशकांनंतरही चित्रपट व त्यामधील

नामदेव मोरे / नवी मुंबई
मराठी चित्रपट सृष्टीमध्ये मैलाचा दगड ठरलेल्या ‘जैत रे जैत’ चित्रपटाची कथा रानसई व परिसरातील आदिवासींच्या जीवनावर आधारित आहे. चार दशकांनंतरही चित्रपट व त्यामधील गाण्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार सर्वांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली पण ज्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट बनविण्यात आला ते आदिवासी मात्र अद्याप दारिद्र्याशीच झुंज देत आहेत.
रानसई व कर्नाळा परिसरामध्ये वास्तव्य करणाऱ्या आदिवासी ठाकर समाजाकडे सर्वप्रथम लक्ष वेधले ते प्रसिद्ध कादंबरीकार गो. नी. दांडेकर यांनी. १९६५मध्ये त्यांची ‘जैत रे जैत’ कादंबरी प्रसिद्ध झाली. या कादंबरीला मराठी वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. आदिवासी ठाकर समाजाचे जीवन सर्वांसमोर आले. कादंबरीचा नायक नाग्या ठाकूर व चिंधीही लोकप्रिय झाली. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी डॉ. जब्बार पटेल यांना या कादंबरीमध्ये संगीतमय चित्रपटासाठीचा दमदार मसाला असल्याचे सांगितले. जब्बार पटेल यांनी कादंबरी वाचली व नाग्या व चिंधीच्या प्रेमकथेने त्यांच्या मनावरही गारूड केले आणि ‘जैत रे जैत’ चित्रपट तयार झाला. १९७७ मध्ये चित्रपट प्रसिद्ध झाला व त्याने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये नवा विक्रम केला. या चित्रपटाने स्मिता पाटील,डॉ. मोहन आगाशे, निळू फुले, सुलभा देशपांडे यांच्या अभिनयाला वेगळी उंची प्राप्त करून दिली. निसर्गकवी ना. धों. महानोर यांनी प्रथमच चित्रपटासाठी गीतलेखन केले. त्यांनी शब्दबद्ध केलेली जांभूळ पिकल्या झाडाखाली, मी रात टाकली, आम्ही ठाकर ठाकर, नभं उतरू आलं, डोंगर काठाडी ठाकरवाडी ही गीते अजरामर झाली. मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासामध्ये ‘जैत रे जैत’ चा उल्लेख सुवर्णाक्षरांनी झाला. चित्रपट प्रसिद्ध होवून ४० वर्षे झाली तरी त्याची व त्यामधील गीतांची लोकप्रियता कमी झालेली नाही. या चित्रपटासाठी स्मिता पाटील यांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
‘जैत रे जैत’च्या निर्मितीमध्ये सहभाग असलेले कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार सर्वांना फायदा झाला परंतु ज्या आदिवासींच्या जीवनावर हा चित्रपट बनविण्यात आला त्या आदिवासी ठाकर समाजबांधवांची परिस्थिती अद्याप जैसे थे आहे. ४० वर्षांपूर्वीही आदिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल होते व आताही ते दारिद्र्याशीच झुंज देत आहेत. तेव्हाही आदिवासी वाड्यांवर जाण्यासाठी रस्ता नव्हता. शिक्षण, वैद्यकीय सुविधा, पाणी, उदरनिर्वाहाचे साधन काहीही नव्हते. आताही तीच स्थिती आहे. पावसाळ्यात भाजीपाला पिकवायचा. उन्हाळ्यात मध गोळा करायचा.
रानमेवा विकून उदरनिर्वाह करायचा हे सर्व तसेच्या तसेच आहे. ‘जैत रे जैत’ चित्रपटाचा विसर कधीच कोणाला पडणार नाही. पण बिचाऱ्या ठाकर समाजाच्या समस्या सोडविण्याचा विसर मात्र सर्वांनाच पडला आहे. चित्रपटाचा नायक जिंकूनही हरतो, तसेच आदिवासीही परिस्थितीपुढे हरले आहेत.


50 वर्षांत काहीच बदल नाही-
गो. नी. दांडेकर यांनी १९६५ मध्ये ‘जैत रे जैत’ कादंबरी लिहिली. डॉ. जब्बार पटेल यांनी १९७८ मध्ये चित्रपट प्रसिद्ध केला. कादंबरी लिहून ५० व चित्रपट प्रसिद्ध होवून ४० वर्षे झाली. या कालावधीमध्ये देशभर प्रचंड राजकीय, सामाजिक,आर्थिक बदल झाले. पण आदिवासींच्या जीवनामध्ये मात्र काहीच बदल झालेले नाहीत. त्यांच्या समस्या तेव्हा होत्या त्यापेक्षा वाढल्या आहेत. आजही ते गरीबच असून त्यांचे जीवन चित्रपटाच्या नायकाप्रमाणे एक जिवंत शोकांतिका बनले आहे.


चित्रपट सृष्टीलाही विसर-
च्‘जैत रे जैत’ च्या चित्रीकरणासाठी मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीमधील दिग्गज कलाकार जवळपास तीन महिने कर्नाळा परिसरात होते. चित्रपटातील एक गीत रानसई गावामध्ये चित्रित करण्यात आले.
च्पायथ्याला असलेल्या कल्ले गावासह कर्नाळा किल्ला व परिसरात सर्व चित्रीकरण झाले. प्रचंड यश मिळाल्यानंतर चित्रपट सृष्टी येथील आदिवासींना विसरून गेली. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणी काहीच प्रयत्न केले नाहीत.