शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

नैनाच्या आराखड्यातील त्रुटी दूर करण्याची मागणी

By admin | Updated: December 6, 2015 01:01 IST

सिडकोने नैना क्षेत्राच्या पहिल्या टप्प्याचा तयार केलेला विकास आराखडा सदोष आहे. त्यामुळे या क्षेत्राच्या विकासाला खीळ बसण्याची शक्यता असून, त्यातील त्रुटी दूर करण्याची मागणी नैना

नवी मुंबई : सिडकोने नैना क्षेत्राच्या पहिल्या टप्प्याचा तयार केलेला विकास आराखडा सदोष आहे. त्यामुळे या क्षेत्राच्या विकासाला खीळ बसण्याची शक्यता असून, त्यातील त्रुटी दूर करण्याची मागणी नैना क्षेत्रातील विकासकांनी केली आहे. नैना बिल्डर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात एक निवेदन देण्यात आले आहे.सिडकोने साऊथ नवी मुंबई या स्मार्ट सिटीची घोषणा केली आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. जवळपास ५३ हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प पुढील पाच-सहा वर्षांत पूर्णत्वास येण्याचा आशावाद सिडकोने व्यक्त केला आहे. या स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत नैना क्षेत्राचाही समावेश करण्यात आला आहे. नैनाच्या पायलट प्रोजेक्टसाठी ४,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. असे असले तरी विकास आराखड्याअभावी मागील तीन वर्षांपासून नैनाचा विकास रखडला आहे. सिडकोने २३ गावांच्या विकासाचा पायलट प्रोजेक्ट तयार करून तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला आहे. यातील अनेक मुद्दे विकासाला मारक असल्याचे विकासकांचे म्हणणे आहे. प्रारूप आराखड्यावर जवळपास चार हजार आक्षेप नोंदविण्यात आले. त्याची कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही किंवा ते नाकारल्याचेही संबंधितांना कळविण्यात आलेले नाही. इमारतीच्या उंचीवर बंधने घालण्यात आल्याने चटईक्षेत्र वापरता येत नाही. नियोजित रस्त्यालगतच्या जमिनीच्या विकासाबाबत संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. या जमिनीवर सिडकोच्या माध्यमातून विकास करणे किंवा सिडकोला हस्तांतरित करणे हे दोनच पर्याय ठेवण्यात आले आहेत. एकूणच विकास आराखड्यात अनेक त्रुटी असल्याने त्यामुळे नैना क्षेत्राचा विकास रखडण्याची शक्यता असल्याचे नैना बिल्डर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश बाविस्कर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)विकास आराखडा तयार करण्यात विलंब लागल्याने या परिसराचा विकास खुंटला आहे. गेल्या तीन वर्षांत फक्त २२ प्रकल्पांनाच मंजुरी मिळाली आहे. जमिनीच्या मूल्यापेक्षा विकास शुल्क अधिक आकारण्यात येत आहे. तसेच रहिवासी क्षेत्रातील ९0 टक्के जमिनींना रस्ता, वीज, पाणी व सांडपाण्याचे नियोजन करण्यात आलेले नाही.