शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

एपीएमसीत पाचही मार्केटमधील गर्दी नियंत्रणात; भाजीमार्केटमधील किरकोळ विक्री बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 1:00 AM

आवक नियंत्रणात आल्याने व्यवहार सुरळीत

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आवक नियंत्रणात आल्यामुळे पाचही मार्केट सोमवारी सुरळीत सुरू होती. भाजी मार्केटमधील किरकोळ विक्री बंद केल्यामुळे गर्दी आटोक्यात आली असून ग्राहकांनी शिस्तबद्धपणे रांग लावून खरेदी केली.

बाजार समितीमध्ये शनिवारी तब्बल ३० हजार नागरिकांनी गर्दी केल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यामुळे शासन व बाजार समिती प्रशासनाने तत्काळ बैठका घेऊन गर्दी नियंत्रणासाठी सुधारीत नियमावली तयार केली. परिणामी सोमवारी गर्दी कमी करण्यात यश आले.

भाजी मार्केटमध्ये ५३ वाहनांचीच आवक झाली. प्रशासनाने किरकोळ विक्री पूर्णपणे बंद केल्यामुळे अनावश्यक गर्दी थांबली. मुंबई व नवी मुंबईमधील किरकोळ विक्रेत्यांनी ही शिस्तबद्ध पणे रांग लावून भाजी खरेदी केली. सोशल डिस्टटिंगचे काटेकोर पालन होत असल्याचे सोमवारी पहावयास मिळाले. त्यापुढेही अशाचप्रकारे मार्केट सुरू ठेवण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.

धान्य मार्केटमध्ये बाहेरून आलेला माल न घेता फक्त मार्केटमधील मालाची विक्री केली जात होती. यामुळे तेथील व्यवहारही सुरळीत सुरू होते. मसाला मार्केटमध्ये आवक कमी असून ग्राहक नसल्याने शुकशुकाट होता. फळ व कांदा मार्केट मध्ये आवक चांगली झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

भाजीपालाची घाऊक विक्री

शनिवारी भाजी मार्केटमध्ये जवळपास एक हजार वाहनांची आवक झाली. किरकोळ मार्केट ही सुरू असल्याने ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती. पुन्हा तशी गर्दी होऊ नये यासाठी किरकोळ विक्री पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. यापुढे एपीएमसीच्या भाजी मार्केटमध्ये फक्त घाऊक विक्रीच सुरू राहणार आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील गर्दी कमी करण्यासाठी सुधारीत नियमावली तयार केली आहे. काटेकोर अंमलबजावणीमुळे सोमवारी गर्दी नियंत्रणात आणणे शक्य झाले. यापुढेही मार्केट सुरळीत सुरू राहतील.- अनिल चव्हाण, सचिव, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई