शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
6
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
7
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
9
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
10
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
11
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
12
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
13
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
14
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
15
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
16
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
17
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
18
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
19
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
20
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी

coronavirus: कुटुंब व्यवस्थेत ‘कहीं खुशी, कहीं गम’; अनेकांना भविष्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 3:00 AM

नवी मुंबई हे कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. नोकरी-व्यवसायासाठी हे शहर सोयीचे असल्याने येथे विविध प्रांतातील लोक वास्तव्यास आहेत. भाषा, प्रांत वेगवेगळे असले तरी सर्वांची कुटुंब रचना सारखीच आहे.

- कमलाकर कांबळेनवी मुंबई : लॉकडाउनमुळे जगण्याचे परिमाण बदलले आहेत. आई, बाबा, मुले आणि कुटुंबातील इतर सदस्य दोन महिन्यांपासून घरात बंद आहेत. लॉकडाउन ही संधी समजून काही जण कुटुंबातील सैल झालेल्या नात्यांची वीण घट्ट करण्यात मग्न आहेत. तर काही जण परस्परांतील हरवलेला संवाद पुन:स्थापित करण्याच्या प्रयत्नात आहेत; परंतु काही कुटुंबात अस्वस्थता आहे. सर्वच जण घरात बंद असल्याने उत्पनाचे मार्ग ठप्प झाले आहेत. उदरनिर्वाहाचा प्रश्न, भविष्याची चिंता सतावते आहे. परिणामी, कुटुंबात कलह वाढले आहेत. एकूणच कुटुंब संस्थेत ‘कही खुशी, कही गम’ असेच काहीसे वातावरण अनुभवयास मिळत आहे.नवी मुंबई हे कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. नोकरी-व्यवसायासाठी हे शहर सोयीचे असल्याने येथे विविध प्रांतातील लोक वास्तव्यास आहेत. भाषा, प्रांत वेगवेगळे असले तरी सर्वांची कुटुंब रचना सारखीच आहे. त्यामुळे लॉकडाउनमुळे निर्माण झालेले प्रश्न कमी-अधिक प्रमाणात सारखेच आहेत. नोकरी-व्यवसाय सोडून कुटुंबातील सर्व सदस्यांना अनपेक्षितपणे एकत्र राहवे लागत आहे. सुरुवातीचे काही दिवस बरे वाटले. सुट्टी समजून एकत्रित धम्माल केली. परस्परात संवाद वाढला आहे. दुरावलेली नाती जवळ येत आहेत. मात्र, त्यानंतर काय? लॉकडाउन वाढतच असल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्य अस्वस्थ आहे. अनेकांना नैराश्य आले आहे. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते हे परिणाम कुटुंबनिहाय वेगवेगळे आहेत.कुटुंबाची आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक अशा तीन प्रकारात वर्गवारी करण्यात येते. अभ्यासकांच्या मते, या तिन्ही प्रकारच्या कुटुंबावर लॉकडाउनचे विभिन्न परिणाम दिसून येत आहेत. हातावर पोट असलेल्या कुटुंबाच्या व्यथा वेगळ्या आहेत. घरात राहणे त्यांना परवडणारे नाही. त्यामुळे सहाजिकच कलह निर्माण होत आहेत. आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी असलेल्या आणि शैक्षणिक दर्जा उत्तम असलेल्या कुटुंबासाठी लॉकडाउन संधी वाटते आहे. टीव्ही, मोबाइल, गेमिंग, व्हॉटसअ‍ॅप, टिष्ट्वटर, फेसबुक आदीसह मनोरंजनाची विपुल साधने उपलब्ध असल्याने अशा कुटुंबात मौजमस्तीचे वातावरण पाहावयास मिळते; परंतु मानवी मनाचा विचार करता ही प्रक्रियाही मर्यादित स्वरूपाची त्यामुळे कधी लॉकडाउन संपते, अशी नैराश्यपूर्ण प्रतिक्रिया त्यांच्यातून उमटत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबाचेही फारसे वेगळे नाही. आठ-पंधरा दिवस ठीक आहेत; परंतु दीड-दोन महिन्यांच्या कोंडीने कुटुंब संस्थेच्या मूल्यांनाच हादरे बसताना दिसत आहेत.एकमेकांची काळजी घेण्याची प्रवृत्ती वाढलीलॉकडाउनमुळे दारू, सिगारेट आणि तंबाखूचे व्यसन सुटले, ही बाब समाधानाची असली तरी त्यामुळे अनेक कुटुंबात हिंसाचार वाढला आहे.तर काही कुटुंबात दुरावलेली नाती जवळ आली आहेत. परस्पराची काळजी घेण्याची प्रवृत्ती वाढली आहे. संवादातील अडथळे दूर झाले आहेत.एरवी किचनकडे न फिरकणारी पुरुषमंडळी वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करून कुटुंबीयांना खाऊ घालत आहेत.

टॅग्स :FamilyपरिवारSocialसामाजिक