शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

coronavirus: कोरोनामुक्त रुग्णांमध्ये प्रकृतीच्या समस्या, उपचारांबाबत संभ्रमावस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 00:43 IST

कोरोनावर मात करून आल्यानंतरही रुग्णांना रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत, परंतु कोरोना होऊन गेलेला असल्याने अशा रुग्णांना हाताळण्यात खासगी डॉक्टर संभ्रमावस्थेत आहेत.

- सुर्यकांत वाघमारेनवी मुंबई : कोविड रुग्णांवर उपचारानंतर प्रकृतीच्या इतर समस्या समोर येत आहेत. त्यामध्ये दीर्घकाळ अशक्तपणा, मानसिक तणाव यासह उच्च रक्तदाबाच्या समस्या समोर येत आहेत, परंतु कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमधील अशा समस्यांवर उपचारांबाबत मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने अनेकांपुढे अडचणी निर्माण होत आहेत.कोरोनाची लक्षणे समोर येताच खासगी रुग्णालयात अथवा पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन आल्यानंतर, पुढील पाच ते दहा दिवसांत त्यांच्यातही लक्षणे आढळून येत आहेत. ज्यांना यापूर्वी प्रकृतीच्या समस्या नव्हत्या, त्यांनाही अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. त्यात भीती वाटणे, अपचन व मानसिक तणाव या समस्या प्रामुख्याने आढळून येत आहेत. यामुळे कोरोनावर मात करून आल्यानंतरही त्यांना रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत, परंतु कोरोना होऊन गेलेला असल्याने अशा रुग्णांना हाताळण्यात खासगी डॉक्टर संभ्रमावस्थेत आहेत. समोर येत असलेली लक्षणे कोरोनाचीच आहे की सामान्य, याचा उलगडा सहज करणे डॉक्टरांना शक्य नाही. त्यामुळे अशा कोरोनमुक्त झालेल्या रुग्णांमध्ये दिसणाºया लक्षणांवर उपचार काय करायचे, असाही प्रश्न त्यांना भेडसावत आहेत. एखाद्या रुग्णाला दाखल करून घ्यायचे झाल्यास, त्याकडे संशयित कोरोना रुग्ण म्हणूनच पाहून स्वतंत्र उपचार यंत्रणा उभारावी लागत आहे. परिणामी, कोरोनातून मुक्त झाल्यानंतरही अनेक जण इतर दुखण्यांमुळे खासगी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत आहेत.सद्यस्थितीला पालिकेचे साधारण रुग्णालय बंद असून, केवळ कोविड सेंटर चालविण्यावर जोर देण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी कोरोना रुग्णावर उपचारासाठी वापरल्या जात असलेल्या गोळ्यांनी अनेकांमध्ये प्रचंड अशक्तपणा निर्माण होत आहे. तर दहा दिवसांनी सदर रुग्णाला घरी सोडताना पुढील काही दिवस अशक्तपणा राहणार असून, भीती वाटल्यासारखे होईल, याचीही कल्पना दिली जात आहे, परंतु उपचारासाठी वापरल्या जाणाºया गोळ्यांनी पचनप्रक्रिया बिघडत असल्याने अशक्तपणा वाढत आहे. अशातच श्वास अडकणे, हृदयात धडकी भरणे अशी समस्या समोर येऊ लागल्याने भयभीत होणाºया कोरोनामुक्त रुग्णांना नाइलाजास्तव पुन्हा खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत.कोरोनावरील उपचारानंतर त्यांना भेडसावणाºया समस्या कोरोनामुळे की उपचारामुळे निर्माण होत आहेत, याबाबत डॉक्टरांमध्ये संभ्रम अवस्था आहे. इतर आजारांमध्ये उपचारानंतरही पुढील काही दिवस त्यांची चौकशी केली जाते. मात्र, कोरोनाच्या बाबतीत एकदा उपचार केल्यानंतर पुन्हा फॉलोअप घेतला जात नसल्याची खंत व्यक्त होत आहे. सध्या पालिकेच्या कोविड सेंटरमधून उपचार घेऊन आलेल्या रुग्णाला दहा दिवसांनी फोन करून केवळ चौकशी करण्याचे काम होत आहे. कोरोनानंतर समोर येणाºया इतर समस्यांवरही उपचारासाठी प्रशासनाने यंत्रणा उभी करण्याची मागणी होऊ लागली आहे.कोरोनातून मुक्त झालेले अनेक जण आरोग्याच्या विविध समस्या घेऊन येत आहेत. इतर आजारांवर ज्याप्रकारे उपचारात फॉलोअप घेतला जातो, तसा कोरोना रुग्णांवर घेतला जाणे आवश्यक आहे. याबाबत दोन महिन्यांपूर्वीच तत्कालीन आयुक्तांना कळवण्यात आले होते. विद्यमान आयुक्तांनाही संघटनेमार्फत तसे कळवले जाणार आहे.- डॉ. प्रतीक तांबे,हिम्पाम, महाराष्ट्र सहसचिव तथा,नवी मुंबईचे अध्यक्षकोरोनाबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज असल्याने भीती आहे. अशातच उपचारानंतर येणार अशक्तपणा व उद्भवणाºया इतर समस्या याचा परिणाम मानसिकतेवर उमटत आहे. यामुळे सतत भीती वाटणे, मानसिक संतुलन हरपणे अशा समस्यांचे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. त्यांना उपचारासह धीर देण्याची गरज आहे.- डॉ.अंजली पाटील,मानसोपचारतज्ज्ञ.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई