शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

coronavirus: कोरोनामुक्त रुग्णांमध्ये प्रकृतीच्या समस्या, उपचारांबाबत संभ्रमावस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 00:43 IST

कोरोनावर मात करून आल्यानंतरही रुग्णांना रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत, परंतु कोरोना होऊन गेलेला असल्याने अशा रुग्णांना हाताळण्यात खासगी डॉक्टर संभ्रमावस्थेत आहेत.

- सुर्यकांत वाघमारेनवी मुंबई : कोविड रुग्णांवर उपचारानंतर प्रकृतीच्या इतर समस्या समोर येत आहेत. त्यामध्ये दीर्घकाळ अशक्तपणा, मानसिक तणाव यासह उच्च रक्तदाबाच्या समस्या समोर येत आहेत, परंतु कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमधील अशा समस्यांवर उपचारांबाबत मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने अनेकांपुढे अडचणी निर्माण होत आहेत.कोरोनाची लक्षणे समोर येताच खासगी रुग्णालयात अथवा पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन आल्यानंतर, पुढील पाच ते दहा दिवसांत त्यांच्यातही लक्षणे आढळून येत आहेत. ज्यांना यापूर्वी प्रकृतीच्या समस्या नव्हत्या, त्यांनाही अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. त्यात भीती वाटणे, अपचन व मानसिक तणाव या समस्या प्रामुख्याने आढळून येत आहेत. यामुळे कोरोनावर मात करून आल्यानंतरही त्यांना रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत, परंतु कोरोना होऊन गेलेला असल्याने अशा रुग्णांना हाताळण्यात खासगी डॉक्टर संभ्रमावस्थेत आहेत. समोर येत असलेली लक्षणे कोरोनाचीच आहे की सामान्य, याचा उलगडा सहज करणे डॉक्टरांना शक्य नाही. त्यामुळे अशा कोरोनमुक्त झालेल्या रुग्णांमध्ये दिसणाºया लक्षणांवर उपचार काय करायचे, असाही प्रश्न त्यांना भेडसावत आहेत. एखाद्या रुग्णाला दाखल करून घ्यायचे झाल्यास, त्याकडे संशयित कोरोना रुग्ण म्हणूनच पाहून स्वतंत्र उपचार यंत्रणा उभारावी लागत आहे. परिणामी, कोरोनातून मुक्त झाल्यानंतरही अनेक जण इतर दुखण्यांमुळे खासगी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत आहेत.सद्यस्थितीला पालिकेचे साधारण रुग्णालय बंद असून, केवळ कोविड सेंटर चालविण्यावर जोर देण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी कोरोना रुग्णावर उपचारासाठी वापरल्या जात असलेल्या गोळ्यांनी अनेकांमध्ये प्रचंड अशक्तपणा निर्माण होत आहे. तर दहा दिवसांनी सदर रुग्णाला घरी सोडताना पुढील काही दिवस अशक्तपणा राहणार असून, भीती वाटल्यासारखे होईल, याचीही कल्पना दिली जात आहे, परंतु उपचारासाठी वापरल्या जाणाºया गोळ्यांनी पचनप्रक्रिया बिघडत असल्याने अशक्तपणा वाढत आहे. अशातच श्वास अडकणे, हृदयात धडकी भरणे अशी समस्या समोर येऊ लागल्याने भयभीत होणाºया कोरोनामुक्त रुग्णांना नाइलाजास्तव पुन्हा खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत.कोरोनावरील उपचारानंतर त्यांना भेडसावणाºया समस्या कोरोनामुळे की उपचारामुळे निर्माण होत आहेत, याबाबत डॉक्टरांमध्ये संभ्रम अवस्था आहे. इतर आजारांमध्ये उपचारानंतरही पुढील काही दिवस त्यांची चौकशी केली जाते. मात्र, कोरोनाच्या बाबतीत एकदा उपचार केल्यानंतर पुन्हा फॉलोअप घेतला जात नसल्याची खंत व्यक्त होत आहे. सध्या पालिकेच्या कोविड सेंटरमधून उपचार घेऊन आलेल्या रुग्णाला दहा दिवसांनी फोन करून केवळ चौकशी करण्याचे काम होत आहे. कोरोनानंतर समोर येणाºया इतर समस्यांवरही उपचारासाठी प्रशासनाने यंत्रणा उभी करण्याची मागणी होऊ लागली आहे.कोरोनातून मुक्त झालेले अनेक जण आरोग्याच्या विविध समस्या घेऊन येत आहेत. इतर आजारांवर ज्याप्रकारे उपचारात फॉलोअप घेतला जातो, तसा कोरोना रुग्णांवर घेतला जाणे आवश्यक आहे. याबाबत दोन महिन्यांपूर्वीच तत्कालीन आयुक्तांना कळवण्यात आले होते. विद्यमान आयुक्तांनाही संघटनेमार्फत तसे कळवले जाणार आहे.- डॉ. प्रतीक तांबे,हिम्पाम, महाराष्ट्र सहसचिव तथा,नवी मुंबईचे अध्यक्षकोरोनाबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज असल्याने भीती आहे. अशातच उपचारानंतर येणार अशक्तपणा व उद्भवणाºया इतर समस्या याचा परिणाम मानसिकतेवर उमटत आहे. यामुळे सतत भीती वाटणे, मानसिक संतुलन हरपणे अशा समस्यांचे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. त्यांना उपचारासह धीर देण्याची गरज आहे.- डॉ.अंजली पाटील,मानसोपचारतज्ज्ञ.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई