शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

Coronavirus: एपीएमसीत ११ ते १७ मेपर्यंत सर्व व्यवहार बंद; ७५ रुग्ण सापडल्याने शासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2020 4:03 AM

पाच मार्केटचे निर्जंतुकीकरण करणार

नवी मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ११ ते १७ मे पर्यंत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुंबईकरांना पुरेसा अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी रविवारपर्यंत मार्केट सुरू ठेवले जाणार आहेत. बाजार समितीमधील धान्य, भाजीपाला, कांदा, फळ व मसाला मार्केटमधील सर्व गाळे, इमारती, प्रसाधनगृह, रस्ते यांची विशेष साफसफाई, निर्जंतुकीकरण केले जाणार असून त्यानंतरच मार्केट पुर्ववत सुरू होणार आहे.

एपीएमसी मार्केटमध्ये गुरुवार, ७ मे पर्यंतजवळपास ७५ रुग्ण सापडले असून एपीएमसीशी संबंधित रुग्ण संख्या १२६ झाली आहे. यामुळे नवी मुंबईमधील नागरिक, लोकप्रतिनिधी, व्यापारी व कामगार संघटनांनी मार्केट बंद करण्याची मागणी केली होती. शुक्रवारी कृषी पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एपीएमसीमध्ये महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. यावेळी ११ ते १७ मे पर्यंत पाचही मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईमधील नागरिकांना पुढील दहा दिवस जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी १० मे पर्यंत मार्केट सुरू आहेत. रविवारी ही बाजार समिती सुरू राहणार आहे. सर्व उपाययोजना व इतर नियोजन व तपासणीचे काम करण्यासाठी सहकार व पणन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची समन्वयक व सनियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे पाचही बाजार ११ ते १७ मे बंद असणार आहेत. यावेळी पाचही मार्केटचे विशेष निर्जंंतुकीकरण केले जाणार आहे. बाजार समितीचे कामगार, माथाडी व सर्व घटकांची स्क्रिनिंग व आरोग्य तपासणी शासनातर्फे होणार आहे. व्यापारी त्यांच्या कर्मचाऱ्यांची स्वत: तपासणी करून घेणार आहेत. मार्केट बंद असले तरी लोकांनी घाबरू नये. मुंबई व ठाणे परिसरात १५ दिवस पुरेल एवढा अन्नधान्य व इतर माल आहे. विविध व्यापारी भाजीपाला, कांदे, बटाटे मुंबई व परिसरात पुरवित आहेत. आॅनलाईन यंत्रणेद्वारेही माल पुरवठा सुरू आहे. - अनुप कुमार, प्रधान सचिव, कृषी पणन विभागकोकण आयुक्त घेणार आढावामुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती व महानगरपालिकेवर १७ मे पर्यंत विशेष जबाबदारी दिली आहे. एपीएमसीमधील सर्व समस्या सोडविण्यासाठी कोणी काय करायचे हे निश्चित केले आहे. कोकण आयुक्त शिवाजी दौंड या दोन्ही संस्थांमध्ये समन्वय साधून सर्व उपाययोजनांचा नियमीत आढावा घेणार आहेत.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस