शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

साळाव खाडी पुलावरून अवजड वाहनांना बंदी

By admin | Updated: October 6, 2016 03:33 IST

महाड सावित्री नदीवरील पुलाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुरुड, रोहा आणि अलिबाग या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या साळाव खाडी पुलावरून अवजड वाहनांना वाहतुकीस

बोर्ली-मांडला : महाड सावित्री नदीवरील पुलाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुरुड, रोहा आणि अलिबाग या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या साळाव खाडी पुलावरून अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलीस उपअधीक्षक ( गृह ) राजेंद्र दंडाळे यांनी दिले आहेत. त्यामुळे येथून वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना रोहा-कोलाडमार्गे वडखळ या मार्गाचा वापर करावा लागणार आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामहामार्गावरील सावित्री नदीवर असणारा ब्रिटिशकालीन पूल मधोमध पडल्याने अनेक निष्पाप जीव मृत्युमुखी पडले होते, तसेच दोन एसटी बससहित इतर छोटी वाहने त्या नदीच्या प्रवाहात वाहून गेली होती. त्याची पुनरावृत्ती परत मुरु ड, रोहा आणि अलिबाग या तीन तालुक्यांना एकत्रित जोडणाऱ्या साळाव खाडी पुलाची होऊ नये या उद्देशाने त्या पुलावरील वाहनांची होणारी वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी अनेक नागरिकांनी या पूर्वी सुद्धा शासनाच्या विविध कार्यालयाकडे तसेच शांतता समितीच्या बैठकीत केली होती. साळाव-रेवदंडा खाडी पुलाला तीन दशकांहून अधिक काळ उलटून गेला आहे. या पुलाला सानेगाव येथे असणाऱ्या इंडो एनर्जी या जेट्टीवर दगडी कोळशाच्या बार्जने दोन तीन वेळा धडक दिली आहे, तसेच रेवदंडा खाडीकिनारी असणाऱ्या आलं मुर्तुझा यारिकाम्या बार्जने सुद्धा धडक मारली होती. यामुळे या पुलाच्या काही भागाचा स्लॅब पडला आहे. या खाडीपुलावरून जाणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असली तरी साळाव येथे असणाऱ्या जेएसडब्लू या कंपनीत माल घेऊन जाणारी अवजड वाहने या पुलाचा वापर करीत असतात. पोलीस उपअधीक्षक ( गृह ) तथा अलिबाग-मुरुडचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र दंडाळे रात्रीची गस्त घालत असताना साळाव पुलावरून जेएसडब्लू या कंपनीतून माल घेऊन जाणारे ट्रक दिसले असता त्यांनी ते अडवून साळाव तपासणी नाक्यावर उभे केले आहेत. (वार्ताहर)