शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

बेस्ट कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात, प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 4:31 AM

बेस्ट कामगारांचे प्रलंबित प्रश्न सुटले नाहीत, तर सहकुटुंब आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कामगारांच्या प्रश्नांवर चर्चेसाठी जुईनगर येथे आयोजित बैठकीत ही घोषणा करण्यात आली.

नवी मुंबई -  बेस्ट कामगारांचे प्रलंबित प्रश्न सुटले नाहीत, तर सहकुटुंब आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कामगारांच्या प्रश्नांवर चर्चेसाठी जुईनगर येथे आयोजित बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या वेळी महापौर जयवंत सुतार यांनीही बेस्टच्या कामगारांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले.जुईनगर येथील गणेश मंदिर सभागृहात रविवारी बेस्ट कामगारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या वतीने ही बैठक घेण्यात आली. या वेळी समितीचे प्रमुख कामगारनेते शशांक राव, उदय भट, अरविंद कागीनकर, विजय कुलकर्णी यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले, तर नवी मुंबई महापालिकेचे महापौर जयवंत सुतार यांनीही या बैठकीला उपस्थित राहून बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले. तसेच परिवहन ही महापालिकेचीच जबाबदारी असून, नवी मुंबईप्रमाणे मुंबई महापालिकेनेही ती स्वीकारावी, असा सल्लाही त्यांनी दिला.राव यांनी बेस्टच्या कामगारांची आर-पारच्या लढ्याची वेळ आल्याचे सांगितले; परंतु कामगारांचे प्रश्न सुटण्याऐवजी ते सरकार दरबारी लाल फितीच्या कारभारात अडकून पडत असल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली. यामुळे जर शासनाने बेस्टच्या कामगारांच्या प्रश्नांकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर सहकुटुंब मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना घेरू, असा इशारा शशांक राव यांनी दिला आहे. या बैठकीला शहरातले रहिवासी असलेले बेस्टचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :BESTबेस्टEmployeeकर्मचारीnewsबातम्या