शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नागरीकरणामुळे रायगड जिल्ह्यातील शेतीला कात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 00:24 IST

रायगड जिल्ह्यामधील पनवेल व उरण तालुका भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध होता.

- नामदेव मोरेनवी मुंबई : राज्यातील ‘भाताचे कोठार’ अशी ओळख असलेल्या कृषिप्रधान रायगड जिल्ह्यातील नागरीकरण वाढू लागले आहे. शेतीसाठीचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. सिडकोसाठी यापूर्वीच दोन जिल्ह्यांतील १५९ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर शहराची उभारणी झाली आहे. आता विमानतळ प्रभावी क्षेत्रातील सहा तालुक्यांमधील तब्बल ५६१ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर टप्प्याटप्प्याने २३ स्मार्ट सिटी उभ्या करण्यात येणार आहेत. यामुळे या पट्ट्यातून शेती हद्दपार होण्याची शक्यता आहे.रायगड जिल्ह्यामधील पनवेल व उरण तालुका भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध होता. येथील बंदरातून शेकडो वर्षांपासून भात व इतर वस्तूंचा व्यापार देश व विदेशातही होऊ लागला. भातशेती, मिठागरे व मासेमारी हाच या परिसरातील प्रमुख व्यवसाय होता; परंतु औद्योगिकीकरण व नागरीकरण वाढू लागले व या परिसरातील शेतीक्षेत्र कमी होऊ लागले. शेतीला सर्वप्रथम सुरुंग लागला तो सिडकोच्या निर्मितीनंतर शासनाने ठाणे, पनवेल व उरण तालुक्यांतील ९५ गावांमधील जमीन संपादित करून नवी मुंबई वसविण्याची मागणी केली. तब्बल १५९ चौरस किलोमीटर जमीन ताब्यात घेतली व या परिसरातील शेतकरी भूमिहीन झाला. यानंतर तळोजा औद्योगिक वसाहत, रसायनी औद्योगिक वसाहत, जेएनपीटी व त्या अनुषंगाने उरणमध्ये आलेले उद्योग यामुळे दोन्ही तालुक्यांमधील शेतीचे क्षेत्र कमी होत गेले. उरलेली शेती विमानतळ प्रकल्पामुळे संपुष्टात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शासनाने विमानतळापासून २५ किलोमीटर परिसर विमानळ प्रभावित क्षेत्र (नैना) म्हणून घोषित केला आहे.‘नैना’ परिसरामध्ये तब्बल २७० गावांचा समावेश आहे. यामध्ये पनवेल तालुक्यामधील १११, उरणमधील पाच, कर्जतमधील सहा, खालापूरमधील ५६, पेणमधील ७८ व ठाणेमधील १४ गावांचा समावेश आहे. या परिसरातील ५६१ चौरस किलोमीटर क्षेत्राचा टप्प्याटप्प्याने विकास केला जाणार आहे. पनवेलपासून थेट कर्जत, खालापूर ते पेणपर्यंत शहरांचा विकास होणार आहे. या परिसरामध्ये दहा वर्षांमध्ये ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. नागरिकांना परवडतील, अशा दरामध्ये घरे उपलब्ध होतील. प्रचंड रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे भासविले जात आहे; परंतु शहरीकरण करताना या परिसरातील शेती नष्ट होणार असल्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेती नष्ट झाल्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळण्याची शक्यता आहे. शहरीकरण वाढल्यामुळे नागरी समस्यांमध्येही वाढ होणार आहे. सिमेंटचे जंगल उभे राहणार; परंतु त्यांना पाणी व इतर सुविधा कशा उपलब्ध होणार हा प्रश्नच आहे. विकासाच्या घाईमध्ये शेती ठप्पच होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. फक्त ‘नैना’च नाही तर भविष्यात रोहा, अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यांमधील ४० गावांमध्येही नवीन शहर वसविण्याचा शासनाचा इरादा आहे.या प्रकल्पांमुळे शेतजमीन कमी झालीरायगड जिल्ह्यात सिडको, जेएनपीटी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, तळोजा औद्योगिक वसाहत, रसायनी औद्योगिक वसाहत व आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावीत क्षेत्र (नैना) यामुळे या परिसरातील शेतजमीन कमी झाली आहे व भविष्यात होणार आहे.नागरीकरणामुळे हे होणार दुष्परिणामपनवेल परिसरातील नागरीकरणामुळे या परिसरातील गाढी व कासाडी नदी प्रदूषित झाली. नद्यांना नाल्यांचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला. या परिसरातील प्रदूषण वाढले आहे. सिडकोमुळे शेतकरी भूमिहीन झाले. नागरीकरणामुळे या परिसरात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. भविष्यात पाणी हीच सर्वात गंभीर समस्या राहणार आहे.रायगड जिल्ह्यातीलशेतजमिनीचा तपशीलतालुका शेतकरी क्षेत्र (हेक्टर)पनवेल १७,९९२ ५७,९५२उरण ८,४१९ १८,६४२अलिबाग ३४,०१७ ४९,९०१पेण १९,०२३ ४९,९९८मुरुड १०,६१० २६,५२५कर्जत २०,३५३ ६५,११७खालापूर ९,५३५ ४०,६१६माणगाव ४९,३२४ ९३,६५९रोहा १९,०९३ ६३,२३९सुधागड-पाली १०,२४७ ४५,८०१महाड ४०,३८८ ८१,०४७पोलादपूर ११,१४५ ३७,२०४म्हसळा १५,०५३ ३१,१७०श्रीवर्धन १४,४०७ २६,०२१‘नैना’ परिसरातील गावांचा तपशीलतालुका गावांची संख्यापनवेल १११उरण ०५कर्जत ०६खालापूर ५६पेण ७८ठाणे १४एकूण २७०नवी मुंबई वसविण्यासाठी व ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीसाठी या परिसरातील शेतकऱ्यांची सर्व जमीन संपादित करण्यात आली. येथील शेतकरी भूमिहीन झाला. ‘नैना’ व इतर प्रकल्पांमुळे पनवेल, उरणसह रायगड जिल्ह्यातील शेतजमीनही कमी होऊ लागली आहे.- अमोल नाईक, शेतकरी

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई