शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

वाशी खाडीपुलावर अपघाताचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 11:20 PM

सायन-पनवेल महामार्गावरील वाशी खाडीपुलावर अनेक महिन्यांपासून अंधार आहे.

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील वाशी खाडीपुलावर अनेक महिन्यांपासून अंधार आहे. विद्युत दिवे बंद असल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. नागरिकांसह पोलिसांनी तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे.महामार्गावरील समस्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. वाशी ते पनवेल दरम्यानचे पथदिवे बंद असल्यामुळे सामाजिक व राजकीय संघटनांनी आंदोलने केली होती. आंदोलनानंतर जवळपास एका वर्षाने पथदिवे पुन्हा सुरू करण्यात आले आहेत; परंतु मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी खाडीपुलावरील अंधार अद्याप दूर झालेला नाही. अनेक महिन्यांपासून येथील सर्व पथदिवे बंदच आहेत. यामुळे रात्री अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मोटारसायकलचे अनेक किरकोळ अपघात झाले आहेत.या विषयी वाहतूक पोलिसांनी अनेक पत्र बांधकाम विभागाला दिली आहेत; परंतु सर्व पत्रांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या मार्गावरून रोज दोन ते तीन लाख प्रवासी जात असतात. प्रमुख मार्गावरील असणारा अंधार पाहून प्रवासीही नाराजी व्यक्त करू लागले आहेत. रात्री अंधारामुळे किरकोळ अपघात होऊन वाहतूककोंडी निर्माण होते. वाहनांच्या मोठ्या रांगा टोलनाक्यापर्यंत लागत असून, अशीच स्थिती राहिली तर गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.वाशी खाडीपुलाचे बांधकाम केल्यानंतर टोलनाका सुरू केला आहे. मुंबईत जाणाºया व येणाºया प्रत्येक वाहनाकडून टोल वसुली केली जात आहे. टोलनाक्यापासून काही मीटर अंतरावर अंधार आहे. यामुळे वाहनधारक नाराजी व्यक्त करू लागले आहेत.गंभीर अपघात झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. खाडीपुलावरील अंधार लवकर दूर करावा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशाराही प्रवासी व वाहनधारकांनी दिला आहे.>पुलाची सुरक्षाही धोक्यातवाहतूक सुरळीत राहण्यासाठी खाडीपुलावरील दिवे सुरू असणे आवश्यक आहे. याहीपेक्षा पुलाच्या सुरक्षेसाठीही येथे रात्री पथदिवे सुरू असणे आवश्यक आहे. पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रमाणही वाढत आहे. या सर्व गोष्टी पाहता येथील पथदिवे तत्काळ सुरू करणे आवश्यक आहे.>पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्षवाहतूक पोलिसांनी खाडीपुलावरील अंधाराविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक पत्र दिले आहेत. अंधार असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. याशिवाय किरकोळ अपघातामुळे वाहतूककोंडी होऊन कर्मचाºयांवर ताण निर्माण होत आहे; परंतु या पत्रांकडेही दुर्लक्ष केले जात आहे.