शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

नवी मुंबई महापालिकेतील आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:25 AM

नालेसफाई अर्धवटच। आराखडा पुस्तिकाही नाही। धोकादायक ठिकाणी फलकही नाहीत

नामदेव मोरे नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये यावर्षी आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे. ४० ते ५० मि.मी. पाऊस पडला तरी शहरात पाणी साचू लागले आहे. जुलै महिना संपत आल्यानंतरही अद्याप आपत्ती आरखड्याच्या पुस्तकांची छपाई झालेली नाही. दरड कोसळणाऱ्या व इतर अपघातजन्य ठिकाणी सूचना फलकही लावण्यात आले नसल्यामुळे शहरवासीयांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

२६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीमध्ये मुंबईसह राज्यभर मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली होती. यानंतर शासनाने सर्वच महानगरपालिकांना आपत्ती व्यवस्थापन आराखडा बनविणे बंधनकारक केले आहे. तब्बल १३ वर्षे नवी मुंबई महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन उत्तमप्रकारे केले होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय संस्थांची बैठक बोलावून आराखडा तयार केला जात होता. शहर आपत्ती व्यवस्थापनाची माहिती देणारी दोन पुस्तके तयार केली जात होती. यामधील पहिल्या पुस्तकामध्ये महापालिकेची संपूर्ण माहिती. आपत्ती उद्भवणारी ठिकाणे व उपाययोजनांविषयी तपशील देण्यात येतो. आराखडा २ मध्ये महानगरपालिकेचे सर्व विभाग, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, सिडको, रेल्वे, महावितरणसह सर्व शासकीय कार्यालयांमधील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क नंबर, मोबाइल नंबर देण्यात येतात. आपत्ती उद्भवल्यास नागरिकांच्या राहण्याची सोय कुठे केली जाणार याचा तपशीलही त्यामध्ये देण्यात येत असून, मदत

करणाºया संस्थांची व त्यांच्या पदाधिकाºयांची नावे त्या पुस्तकामध्ये दिली जात होती. ही पुस्तके सर्व नगरसेवक, महत्त्वाचे पदाधिकारी व महापालिकेच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध केली जात होती, यामुळे कोणतीही आपत्ती उद्भवली की संबंधित विभागाशी संपर्क साधणे शक्य होत होते.

या वर्षी जुलै महिना संपत आल्यानंतरही अद्याप आपत्ती आराखड्याच्या पुस्तकांची छपाई झालेली नाही. महानगरपालिकेने वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन मुख्यालयातील व विभागस्तरावरील आपत्तीनियंत्रण कक्षाचे संपर्क नंबर दिले आहेत; परंतु शहरातील आवश्यक त्या ठिकाणी धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आलेले नाहीत. पावसाळापूर्वी नालेसफाईची कामेही व्यवस्थित झालेली नाहीत, यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात शहरात तब्बल ३३ ठिकाणी पाणी साचले. ५० पेक्षा जास्त वृक्ष कोसळले, शॉर्टसर्किटच्या घटनाही रोज घडत आहेत. विजेचा धक्का बसून एकाला जीव गमवावा लागला आहे. बोनसरी झोपडपट्टीमधील नागरिकांनी धोक्याची सूचना दिल्यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे १५ घरांमध्ये पाणी शिरले. याच परिसरामध्ये पाच झोपड्या वाहून गेल्या. या पूर्वीचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले; परंतु अद्याप कोणावरही कडक कारवाई झालेली नाही.

पुराचे पाणी भरण्याची शक्यताप्रभाग ठिकाणेबेलापूर १वाशी, नेरुळ २तुर्भे, दिघा ३कोपरखैरणे १घणसोली २ऐरोली २

वाहतूक नियंत्रणाचा तपशीलविभाग संख्याराष्ट्रीय महामार्ग ०१महामार्गाची लांबी १५ किलोमीटरनद्या, नाल्यांवरील पूल १४एसटी व बस आगार ०९जेटी ०२रेल्वेस्टेशन ११रेल्वे पुलांची संख्या १२

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका