शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

गरीब विद्यार्थी वंचित; आरटीई प्रवेशाकडे ८३५ विद्यार्थ्यांची पाठ, दोन हजार जागांसाठी १७ हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 12:24 PM

शहरातील खासगी मोठ्या शाळांमध्ये पाल्यांना मोफत शिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी आर्थिक परिस्थिती चांगली असलेले अनेक पालक खोटा उत्पन्नाचा दाखला दाखवतात. (RTE admission)

योगेश पिंगळे -नवी मुंबई : आर्थिकदृृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या आरटीई योजनेचा लाभ घेण्यासाठी या वर्षी नवी मुंबई शहरात दोन हजार ४५ जागांसाठी १७,४९१ अर्ज प्राप्त झाले होते, परंतु प्रवेश निश्चित झालेल्या ८३५ विद्यार्थ्यांनी विविध कारणांमुळे प्रवेश घेण्याकडे पाठ फिरविली आहे.

सर्वच स्तरांतील पालक या प्रकियेत सहभागी होत असल्याने गरीब कुटुंबातील विद्यार्थी या लाभापासून वंचित राहत आहेत.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार, सर्वच शाळांमध्ये आर्थिकदृृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांसाठी प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या वर्षी लॉकडाऊनमुळे निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी विलंबाने सुरू झाली. नवी मुंबईत दोन हजार ४५ जागांसाठी १७,४९१ अर्ज प्राप्त झाले. ८३५ विद्यार्थ्यांचे प्रवेश विविध कारणांमुळे होऊ शकले नाही.

शहरातील खासगी मोठ्या शाळांमध्ये पाल्यांना मोफत शिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी आर्थिक परिस्थिती चांगली असलेले अनेक पालक खोटा उत्पन्नाचा दाखला दाखवतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ आवश्यक आहे, असे गरीब घरातील विद्यार्थी मात्र वंचित राहात आहेत.

तक्रार क्रमांक 1 -लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर, अनेक विद्यार्थी मूळगावी गेले होते. ते अद्याप परतलेले नाहीत, त्यामुळे निवड होऊनही अनेक विद्यार्थांनी प्रवेश घेतलेले नाहीत.

तक्रार क्रमांक 2 -आरटीई प्रक्रियेला विलंब झाल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार का? या भीतीने पालकांनी आपल्या पाल्यांचे इतर शाळांमध्ये प्रवेश घेतले. त्यामुळे निवड होऊनही अनेक विद्यार्थांनी प्रवेश घेतले नाहीत.

शासनाने मुदत वाढवली -आरटीईअंतर्गत प्रवेश निश्चित झालेले पालक आणि विद्यार्थी गावी असल्याने, ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या प्रक्रियेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत, तसेच या वर्षी शासनाच्या माध्यमातून मुदत वाढवली होती.- योगेश कडुसकर (उपायुक्त, शिक्षण विभाग, न.मुं.म.पा.)

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा