शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
2
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
3
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
4
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
5
पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट 
6
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
7
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...
8
महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक
9
"फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार
10
सांगलीचा सचिन बनला वर्ल्ड चॅम्पियन! शाळेत असताना डाव्या हाताला आले अपंगत्व, तरीही तो... 
11
"१० वर्ष माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचा मला फायदा होईल"; अमोल कीर्तिकरांनी सगळंच सांगितलं
12
"विराट कोहलीवर जेव्हा मी बोली लावत होतो त्यावेळी मला वाटलं होतं की..."; विजय मल्ल्याचे स्पेशल ट्विट
13
"मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार," राहुल गांधींचे टीकास्त्र
14
Closing Bell Today: शेअर बाजारात तेजी; हिंदुस्तान झिंकनं ३० दिवसांत पैसे केले दुप्पट, भेल घसरला
15
Corona Virus : भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर; 324 जणांना संसर्ग, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण
16
Indian Temple: भारतात आहे यमराजाचे दुर्मिळ मंदिर; पण तिथे जाण्यास लोक का घाबरतात? वाचा!
17
Amruta Fadnavis : "बाल न्याय मंडळाची लाज वाटते"; पुणे हिट अँड रन प्रकरणी अमृता फडणवीसांचा संताप
18
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या भगवान बुद्धांनी दाखवलेला राजमार्ग!
19
ENG vs PAK: World Cup ची तयारी पण पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; स्टार खेळाडू झाला बाहेर
20
Zerodha का करत नाही आपली जाहिरात? सीईओ Nithin Kamath यांनी केला खुलासा

चिंताजनक! देशात दर 24 तासांमध्ये 28 विद्यार्थी करताहेत आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 2:34 PM

अभ्यासाचा वाढलेला दबाव आणि तणावामुळे विद्यार्थी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बंगळुरू - गेल्या काही काळात बदलत्या शिक्षणव्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांवरील तणाव हा कमालीचा वाढला आहे. अभ्यासाचा वाढलेला दबाव आणि तणावामुळे विद्यार्थी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या 2018 मधील आकडेवारीनुसार 2018 मध्ये दर 24 तासांना 28 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तसेच गेल्या 10 वर्षांत देशामध्ये सुमारे 82 हजार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. 2018 मध्ये सर्वाधिक 10 हजार विद्यार्थ्यांनी मृत्यूला कवटाळले होते.  1 जानेवारी 2009 पासून 31 डिसेंबर 2018 पर्यंत 81 हजार 758 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी 57 टक्के विद्यार्थ्यांनी गेल्या पाच वर्षांत आपले जीवन संपवले. तर 10 हजार 159 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. 2018 मध्ये भारतात एकूण 1 लाख 30 हजार लोकांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. त्यापैकी 8 टक्के हे विद्यार्थी होते. तर आत्महत्या करणारे जवळपास 10 टक्के हे बेरोजगार होते.  2018 मध्ये आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एक चतुर्थांश विद्यार्थ्यांनी परीक्षेत नापास झाल्याने जीवन संपवले.  सध्या विद्यार्थी अंमली पदार्थांचे व्यसन, ताणतणाव, कौटुंबिक समस्या आणि नातेसंबंध यामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे  तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जीवघेणी बेकारी; देशात दर 2 तासांत 3 बेरोजगारांच्या आत्महत्या 

JNU Attack : हल्ल्याच्या निषेधार्थ विद्यार्थी उतरले रस्त्यावर 

१५७ महाविद्यालयांकडून १२ कोटींची रक्कम वसूल; उच्च शिक्षण विभागाची मोठी कारवाई दरम्यान, २०१७-१८ वर्षात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या जास्त असल्याचं एनसीआरबीच्या आकडेवारीतून उघड झालं आहे. २०१८ मध्ये १२ हजार ९३६ जणांनी बेरोजगारीला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. याच कालावधीत १० हजार ३४९ शेतकरी आणि शेतमजूरांनी मृत्यूला कवटाळलं. देशात बेरोजगारीच्या संकटानं गंभीर स्वरुप धारण केल्याचं या आकडेवारीनं अधोरेखित केलं आहे.  एनसीआरबी गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी संस्था आहे. देशात घडणारे गुन्हे, आत्महत्या, त्यांच्या मागील कारणं यांची आकडेवारी नोंदवण्याचं काम एनसीआरबी करते. २०१८ मध्ये देशातल्या आत्महत्यांचं प्रमाण ३.६ टक्क्यांनी वाढल्याचं एनसीआरबीच्या आकडेवारीतून समोर आलं आहे. २०१८ मध्ये देशभरात १ लाख ३४ हजार ५१६ आत्महत्या झाल्या. तर २०१७ मध्ये २९ हजार ८८७ आत्महत्या झाल्या होत्या. 

टॅग्स :Studentविद्यार्थीSuicideआत्महत्याEducation Sectorशिक्षण क्षेत्रIndiaभारत