शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

काँग्रेससाठी गुलामासारखे काम केले; कुमारस्वामींची खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 3:34 PM

काँग्रेसने सरकारच्या पहिल्या दिवसापासूनच लोकांशी चुकीच्या पद्धतीने वागण्यास सुरुवात केली.

बंगळुरु : कर्नाटकमध्ये जेडीएस काँग्रेसची सत्ता असताना नेहमी कुमारस्वामी मनातील सल कार्यकर्त्यांसमोर बोलत असत. एका सभेत तर ते रडले होते. आता सत्ता गेल्यानंतर काँग्रेसचे नेते कुमारस्वामींना दोष देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निगम अध्यक्षांसह सर्व आमदारांना पूर्ण स्वातंत्र्यही दिल्याचे कुमारस्वामींनी म्हटले आहे. 

गेल्या महिन्यात कर्नाटकमध्ये कुमारस्वामी सरकारचा पाडाव झाला. जवळपास 15 ते 20 दिवस हे सत्तापालटाचे नाटक सुरु होते. काँग्रेस आणि जेडीएसच्या 15 आमदारांनी राजीनामा देत मुंबई गाठली होती. याला भाजपाच्या नेत्यांची फूस होती असा आरोप काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी केला होता. हे आमदार खासगी विमानाने मुंबईत आले होते. त्यांनी पंचतारांकीत हॉटेलमध्ये राहत मुंबई पोलिसांना जीवाला धोका असल्याचे पत्र दिले होते. यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरविली होती. यानंतर काँग्रेसचे डी के शिवकुमार या नाराज आमदारांना भेटण्यासाठी मुंबईत आले होते. मात्र, त्यांना हॉटेलमध्ये जाण्यास दिले नाही. त्यांना रिकाम्या हातांनी माघारी फिरावे लागले होते. 

कुमारस्वामी आणि त्यांचा भाऊ यांच्या कामावर नाराजी व्यक्त करत या आमदारांनी बंड केले होते. यामुळे व्यथित झालेल्या कुमारस्वामी यांनी सोमवारी एका सभेत भावना व्यक्त केल्या. आपण काँग्रेससाठी गेली 14 वर्षे गुलामासारखे काम केल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसला बहुमत न मिळाल्याने वरिष्ठ पातळीवरील नेते माझ्यासोबत इमानदारीने जेडीएससोबत हात मिळून पाहत होते. मात्र, स्थानिक पातळीवरील नेत्यांना हे नको होते, असे कुमारस्वामींनी सांगितले. 

काँग्रेसने सरकारच्या पहिल्या दिवसापासूनच लोकांशी चुकीच्या पद्धतीने वागण्यास सुरुवात केली. जेडीएसच्या तुलनेत काँग्रेसच्या आमदारांच्या मतदारसंघांसाठी जास्त निधी दिला. काही आमदार पूर्वसूचना न देता भेटण्यासाठी येत होते. त्यांना कधी नकार दिला नाही. त्यांच्या मतदारसंघातील प्रत्येक समस्या सोडविली. मी 14 महिन्यांत जेवढे काम केले तेवढे गेल्या काँग्रेस सरकारनेही केले नाही. या काळात काँग्रेसच्या आमदार क्षेत्रासाठी मी 19 हजार कोटी रुपये निधी दिल्याचे कुमारस्वामींनी सांगितले. 

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnatak Politicsकर्नाटक राजकारण