शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

...अन् एका मेणबत्तीने होत्याचं नव्हतं झालं; आजी-नातवाचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 11:28 IST

Fire News : मेणबत्तीमुळे लागलेल्या आगीत आजी आणि नातवाचा होरपळून मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात देशात मन हेलावून टाकणाऱ्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना राजस्थानच्या अलवरमध्ये देखील घडली आहे. एका मेणबत्तीने होत्याचं नव्हतं झालं आहे. मेणबत्तीमुळे लागलेल्या आगीत आजी आणि नातवाचा होरपळून मृत्यू झाला आहे. राजस्थानातील अलवर जिल्ह्यातील टपूकडा ठाणे क्षेत्रात असलेल्या बुबकाहेडा या गावात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेणबत्तीमुळे लागलेल्या आगीत एका महिलेचा आणि तिच्या नातवाचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या वेळी लाईट गेल्यामुळे घरामध्ये उजेडासाठी मेणबत्ती पेटवण्यात आली होती.  ही दुर्घटना घडली तेव्हा आजी आणि नातू झोपलेले होते. खोलीत ठेवलेल्या कापसाने पेट घेतल्याने ही आग लागली. तसेच इंधनाचे देखील काही कॅन हे खोलीत ठेवलेले होते. त्यामुळे आगीचा भडका उडाला. 

आग लागल्याचं लक्षात येताच आजूबाजूच्या लोकांनी अथक प्रयत्नांनंतर आजी-नातवाला बाहेर काढले. तातडीने या दोघांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र दोघांचीही स्थिती अतिशय गंभीर असल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यास सांगितलं. मात्र दरम्यान दोघांचाही मत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

मरियम असं 60 वर्षीय महिलेचं नाव असून अयान असं नातवाचं नाव होतं. अयान अवघ्या तीन वर्षांचा होता. रात्रीच्या वेळेच मरियम आणि अयान खोलीत झोपलेले असताना अचानक आग लागली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक चौकशी करत आहेत. मेणबत्तीमुळे आग लागली. त्यानंतर घरातील समानाने देखील पेट घेतला. आगीच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानfireआगDeathमृत्यूPoliceपोलिस