शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 14:56 IST2025-06-21T14:54:52+5:302025-06-21T14:56:14+5:30

Shashi Tharoor news: थरुर आणि काँग्रेस हायकमांड यांच्यात २०२० पासूनच मतभेद आहेत. शशी थरूर हे जी-२३ नावाच्या नेत्यांपैकी एक होते, जे संघटनेत बदल घडवून आणण्याचा पुरस्कार करत होते. या गटातील नेत्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते.

Will Shashi Tharoor join BJP? Congress will take a big decision on June 23 | शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार

शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार

पहलगाम हल्ल्यानंतर भारताची शिष्टमंडळे जगभरात पाकिस्ताचा दहशतवादाचा बुरखा फाडण्यासाठी रवाना झाली होती. या पाच शिष्टमंडळांपैकी तीन सत्ताधारी आणि दोन विरोधक या शिष्टमंडळांचे नेतृत्व करत होते. यामध्येच एक काँग्रेसचे खासदार शशी थरूर होते. त्यांनी काँग्रेसना न पटणारी विधाने केली होती. आता त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

आपल्याला फक्त त्या हल्ल्यांबद्दल माहिती मिळते जे आपण उधळून लावण्यात अयशस्वी झालो. कोणत्याही देशात ही एक सामान्य गोष्ट आहे. कोणत्याही देशाकडे विश्वासार्ह गुप्तचर यंत्रणा नाही, असे त्यांनी म्हटले होते. एकप्रकारे पहलगाम हल्ल्यावर केंद्र सरकारला थरुर यांनी परदेशात जाऊन क्लीन चिट दिली होती. यावरून काँग्रेस नाराज झाली होती. अनेक नेत्यांनी थरुर यांच्यावर टीका केली होती. तेव्हा थरूर यांनी सध्या मला यावर बोलण्यास वेळ नाही, आल्यावर पाहू, असे म्हणत प्रत्तुत्तर दिले होते. 

आता थरूर आणि इतर शिष्टमंडळ देखील भारतात आली आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदींची भेटही घेतली आहे. यावेळी देखील थरूर आणि मोदी यांच्यात चांगली मैत्री दिसली होती. या गोष्टी काँग्रेसला खटकल्या आहेत. थरूर यांनी देखील दोन दिवसांपूर्वी आपले काँग्रेसच्या नेतृत्वासोबत मतभेद असल्याचे म्हटले आहे. पोटनिवडणुकीच्या निकालानंतर चर्चा करू असे म्हटले होते. यावरून आता थरूर यांच्या काँग्रेस सोडण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

थरुर आणि काँग्रेस हायकमांड यांच्यात २०२० पासूनच मतभेद आहेत. शशी थरूर हे जी-२३ नावाच्या नेत्यांपैकी एक होते, जे संघटनेत बदल घडवून आणण्याचा पुरस्कार करत होते. या गटातील नेत्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते. आतापर्यंत गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांना पक्ष सोडावा लागला आहे. मनीष तिवारी आणि शशी थरूर सारख्या नेत्यांना देखील बाजुलाच करण्यात आले आहे. पाकिस्तान विरोधात जाणाऱ्या या शिष्टमंडळात सहभागी करण्यासाठी काँग्रेसने वेगळ्याच नेत्यांची नावे दिली होती. परंतू, मोदींनी थरूर यांच्यासह चार नेते निवडले ज्यांचे त्या यादीत नाव नव्हते. काँग्रेसला आता ही गोष्टी देखील खटकू लागली आहे. यामुळे शशी थरूर यांच्यावर कारवाई झालीच तर त्यांना भाजपा पक्षप्रवेशाची ऑफर देण्याची शक्यता आहे. 

Web Title: Will Shashi Tharoor join BJP? Congress will take a big decision on June 23

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.