शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

प्रत्येक बेरोजगाराला देणार रोजगार, नाही तर मिळणार ३ हजार; मोदींच्या गुजरातमध्ये केजरीवालांचा एल्गार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 17:09 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) आज गुजरात दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात सौराष्ट्र क्षेत्राती राजकोटमध्ये वेरावल येथे एका जनसभेला केजरीवाल संबोधित करणार आहेत.

गुजरात-

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) आज गुजरात दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात सौराष्ट्र क्षेत्राती राजकोटमध्ये वेरावल येथे एका जनसभेला केजरीवाल संबोधित करणार आहेत. गुजरातच्या जनतेसमोर केजरीवाल दुसरं मोठं आश्वासन देणार आहेत. केजरीवालांचं आजची मोठी घोषणा रोजगारासंदर्भात असणार आहे. केजरीवाल यांनी निवडणुकीचं संपूर्ण लक्ष्य रोजगाराच्या मुद्द्यावर केंद्रीत केलं आहे. केजरीवाल यांनी यावेळी गुजरातमध्ये विषारी दारुमुळे घडलेल्या दुर्गटनेचाही मुद्दा उपस्थित केला. 

"आज मला सोमनाथांच्या पवित्र धरतीवर येण्याचं भाग्य प्राप्त झालं. गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. विषारी दारु प्यायलामुळे ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो यासाठी दोन मिनिटांचं मौन व्रत आपण पाळलं. ज्यादिवशी हा प्रसंग घडला त्यादिवशी पीडितांना भेटण्यासाठी मी रुग्णालयात गेलो होतो. ते अत्यंत गरीब आहेत आणि मला कळालं की अजूनही राज्याचे मुख्यमंत्री काही त्यांना भेटायला पोहोचलेले नाहीत", असं केजरीवाल म्हणाले. 

भाजपाच्या एका नेत्यानं यावर टिप्पणी करताना केजरीवालांच्या या कृतीतून मतांवर कोणताही परिणाम होणार नाही असं म्हटलं. केजरीवालांनी याही विधानाचा समाचार घेतला. "प्रत्येक काम काही मत मिळवण्यासाठी केलं जात नसतं. जर दिल्लीचा मुख्यमंत्री इथं गुजरातमधील दुर्गटनेच्या पीडितांना भेटण्यासाठी येऊ शकतो. पण गुजराजचे मुख्यमंत्री का येऊ शकले नाहीत?, असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला. तसंच यावेळी लोकांनी संबंधित परिसात खुलेआम दारुविक्री होत असल्याची तक्रार देखील केली. इतकंच नव्हे, तर दारुची होम डिलिव्हरी होत असल्याचाही दावा केला. 

५ वर्षात प्रत्येक बेरोजगाराला मिळणार रोजगार"आज मी तुम्हाला रोजगाराची हमी देतो. प्रत्येक बेरोजगाराला ५ वर्षात रोजगार मिळेल. तुम्ही म्हणाल की हे कसं होऊ शकतं? मी दिल्लीतून आलो आहे आणि दिल्लीत 12 लाख मुलांना रोजगार दिला आहे. सध्या माझ्या मंत्र्यांसोबत बसून येत्या ५ वर्षांत दिल्लीत २० लाख रोजगार निर्माण करण्याचं वचन दिलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जोवर रोजगार मिळत नाही जोवर बेरोजगारांना दरमहा ३ हजार रुपये बेरोजगारी भत्ता आम्ही देऊ. तिसरं म्हणजे 10 लाख सरकारी नोकऱ्या निर्माण केल्या जातील. त्याचबरोबर पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा आणून माफियांना शिक्षा होईल. सहकार क्षेत्रात नेत्यांच्या शिफारशीशिवाय नोकऱ्या देऊ. तसेच, मी माझ्या बंधू-भगिनींना आवाहन करेन की, फक्त काही महिने बाकी आहेत, कोणीही आत्महत्या करू नये", असंही केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपGujaratगुजरात