शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
3
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
4
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
5
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
6
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
7
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
8
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
9
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
10
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
11
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
12
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
13
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
14
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
15
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
16
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
17
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
18
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
19
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
20
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 18:58 IST

Arvind Kejriwal News: दिल्लीटे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली.

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेी केजरीवालांना ठीक लोकसभा निवडणुकीपूर्वी अटक करण्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी(दि.30) अंमलबजावणी संचालनालयाला (ED) प्रश्न विचारले. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांना अटक करण्याच्या वेळेबाबत उत्तर देण्यास सांगितले. 

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने “आयुष्य आणि स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचे आहे आणि आपण ते नाकारू शकत नाही," यावर जोर दिला. तसेच, खंडपीठाने राजू यांना इतर अनेक प्रश्न विचारले असून, या प्रकरणाच्या पुढील तारखेला या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले आहे. या खटल्याची पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

सिंघवी काय म्हणाले?ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टात अरविंद केजरीवाल यांची बाजू मांडली. दरम्यान, काल झालेल्या सुनावणीत सिंघवी यांनी युक्तिवाद केला की, आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर ईडीने केजरीवाल यांना अटक केली. एकतर त्यांच्याकडे कोणता पुरावा, याची माहिती नाही. ज्याच्या आधारे केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे, ती विधाने 7 ते 8 महिने जुनी आहेत. या प्रकरणात केजरीवाल दोषी असल्याचे ईडीला वाटत होते, तर त्यांना अटक करायला इतका वेळ का लावला? सप्टेंबर 2022 मध्ये हे प्रकरण उघडकीस आले, त्यानंतर कोणतीही कारवाई झाली नाही, आता अचानक अटक करण्यात आली. ते कठोर गुन्हेगार किंवा दहशतवादी नाहीत, जे विमानाने देश सोडून पळून जातील.

केजरीवाल 9 ED समन्सला का हजर झाले नाही : SCत्यावर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी विचारले की, ईडीने केजरीवालांना 9 वेळा नोटीस पाठवली, प्रत्येक वेळी त्यांनी चौकशीसाठी येण्यास नकार का दिला? यावर सिंघवी म्हणाले, सीबीआयने फोन केला तेव्हा ते गेले. केजरीवालांनी ईडीच्या नोटिसीलाही सविस्तर उत्तर दिले. पण समन्स बजावल्यावर तुम्ही यायलाच हवं, असं ईडी करू शकत नाही. ईडी कार्यालयात न जाणे हा त्यांचा अधिकार आहे. याप्रकरणी स्वतंत्र खटला सुरू आहे. हा अटकेचा आधार किंवा कारण असू शकत नाही. 

केजरीवाल 21 मार्चपासून तुरुंगात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या दारू धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 21 मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली होती. ते 1 एप्रिलपासून तिहार तुरुंगात बंद असून 7 मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालSupreme Courtसर्वोच्च न्यायालयEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय