शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

भाजपाने सत्ता काळात का केला नाही विकास?

By admin | Published: November 24, 2014 2:08 AM

१४ पैकी ११ वर्षे भाजपाची सत्ता असूनही झारखंड राज्य मागास कशामुळे आहे, असा सवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला.

गुमला/डाल्टनगंज (झारखंड) : १४ पैकी ११ वर्षे भाजपाची सत्ता असूनही झारखंड राज्य मागास कशामुळे आहे, असा सवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला. नक्षलवादी समस्या सोडवायची असेल, तर विकास व्हायला हवा आणि खऱ्या विकासासाठी देशातील नैसर्गिक संसाधने लोकांच्या हातात राहायला हवीत़ काँग्रेसने आदिवासी आणि गरिबांना त्यांचा हा अधिकार देण्यासाठी कायम पावले उचलतील, असे सोनिया गांधी रविवारी म्हणाल्या़डाल्टनगंज आणि गुमला येथील प्रचार सभेत त्या बोलत होत्या़ नक्षल समस्या केवळ कायदा आणि सुव्यवस्थेशी निगडित नाही़ राज्यघटनेच्या चौकटीत राहून विकासातून या समस्येला प्रत्युत्तर दिले जाऊ शकते आणि देशातील नैसर्गिक साधनसंपत्ती सरकारजवळ नव्हे तर लोकांजवळच राहायला हवी़ त्याचमुळे काँगे्रसने आदिवासी, गरीब, दलित, मागासवर्ग आणि अल्पसंख्याकांना जमीन अधिग्रहण कायद्यांतर्गत अधिकार दिले होते़ मात्र, केंद्रातील नव्या भाजपा सरकारने आता या कायद्यात दुरुस्ती करण्याचा घाट घातला आहे़ यास काँग्रेसचा विरोध आहे़झारखंडमधील समस्या आजही कायम असल्याचे सांगत त्यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला़ त्या म्हणाल्या की, पंतप्रधानांनी लोकांना सांगायला हवे की, राज्यात १४ वर्षांपैकी ११ वर्षे भाजपाची सत्ता असतानाही समस्या जैसे थे का राहिल्यात? संपुआ सरकार केंद्रात असताना झारखंडमध्ये वीज, रस्ते, पिण्याचे पाणी व आरोग्यसुविधा अशा अनेक योजनांसाठी कोट्यवधी रुपये देण्यात आले होते़ मात्र येथील भाजपाशासित सरकारने या निधीचा कुठलाही वापर केला नाही़ भाजपाने १४ वर्षाच्या सत्ता काळात राज्यामध्ये साधी रोजगार निर्मितीही केली नाही. झारखंडमध्ये ४० लाख बीपीएल परिवार आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. (वृत्तसंस्था)