शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने सत्ता काळात का केला नाही विकास?

By admin | Updated: November 24, 2014 02:08 IST

१४ पैकी ११ वर्षे भाजपाची सत्ता असूनही झारखंड राज्य मागास कशामुळे आहे, असा सवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला.

गुमला/डाल्टनगंज (झारखंड) : १४ पैकी ११ वर्षे भाजपाची सत्ता असूनही झारखंड राज्य मागास कशामुळे आहे, असा सवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला. नक्षलवादी समस्या सोडवायची असेल, तर विकास व्हायला हवा आणि खऱ्या विकासासाठी देशातील नैसर्गिक संसाधने लोकांच्या हातात राहायला हवीत़ काँग्रेसने आदिवासी आणि गरिबांना त्यांचा हा अधिकार देण्यासाठी कायम पावले उचलतील, असे सोनिया गांधी रविवारी म्हणाल्या़डाल्टनगंज आणि गुमला येथील प्रचार सभेत त्या बोलत होत्या़ नक्षल समस्या केवळ कायदा आणि सुव्यवस्थेशी निगडित नाही़ राज्यघटनेच्या चौकटीत राहून विकासातून या समस्येला प्रत्युत्तर दिले जाऊ शकते आणि देशातील नैसर्गिक साधनसंपत्ती सरकारजवळ नव्हे तर लोकांजवळच राहायला हवी़ त्याचमुळे काँगे्रसने आदिवासी, गरीब, दलित, मागासवर्ग आणि अल्पसंख्याकांना जमीन अधिग्रहण कायद्यांतर्गत अधिकार दिले होते़ मात्र, केंद्रातील नव्या भाजपा सरकारने आता या कायद्यात दुरुस्ती करण्याचा घाट घातला आहे़ यास काँग्रेसचा विरोध आहे़झारखंडमधील समस्या आजही कायम असल्याचे सांगत त्यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला़ त्या म्हणाल्या की, पंतप्रधानांनी लोकांना सांगायला हवे की, राज्यात १४ वर्षांपैकी ११ वर्षे भाजपाची सत्ता असतानाही समस्या जैसे थे का राहिल्यात? संपुआ सरकार केंद्रात असताना झारखंडमध्ये वीज, रस्ते, पिण्याचे पाणी व आरोग्यसुविधा अशा अनेक योजनांसाठी कोट्यवधी रुपये देण्यात आले होते़ मात्र येथील भाजपाशासित सरकारने या निधीचा कुठलाही वापर केला नाही़ भाजपाने १४ वर्षाच्या सत्ता काळात राज्यामध्ये साधी रोजगार निर्मितीही केली नाही. झारखंडमध्ये ४० लाख बीपीएल परिवार आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. (वृत्तसंस्था)