शहरं
Join us  
Trending Stories
1
पाऊस थांबला, कव्हर्स हटले! KKR vs MI मॅच सुरू होण्याची वेळ ठरली, पण षटकं कमी झाली
2
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
3
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
4
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
5
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
6
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
7
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
8
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
9
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
10
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
11
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
12
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
13
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
16
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
17
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
18
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
19
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
20
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)

कुठे गेले कोट्यवधी रुपये? झटक्यात रिकामी झाली अनेक खाती, बँकेत जाताच लोकांना बसला धक्का  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 4:10 PM

सर्वसामान्य लोक आपल्या मेहनतीची कमाई सुरक्षित राहावी म्हणून बँकेत ठेवत असतात. मात्र गरजेवेळी हे पैसे काढण्यासाठी बँकेत गेल्यावर तुमच्या ...

सर्वसामान्य लोक आपल्या मेहनतीची कमाई सुरक्षित राहावी म्हणून बँकेत ठेवत असतात. मात्र गरजेवेळी हे पैसे काढण्यासाठी बँकेत गेल्यावर तुमच्या खात्यात पैसेच नाहीत, असं उत्तर मिळाल्यावर अशा गरीब गरजूंना बसणाऱ्या धक्क्याचं शब्दात वर्णन करता येणार नाही. काहीशी अशीच घटना बिहारमधील सीतामढी येथे घडली आहे.  

उत्तर बिहार ग्रामीण बँकेच्या बैरगनिया शाखेमध्ये जेव्हा लोक पैसे काढण्यासाठी पोहोचले, तेव्हा त्यांना त्यांची बँक खाती रिकामी असल्याचं कळालं. याबाबत समजल्यावर इतर लोकही आपला बॅलन्स तपासण्यासाठी बँकेत धाव घेऊ लागले. मात्र सगळ्यांनाच तुमच्या खात्यात पैसे नाही आहेत, असं उत्तर मिळालं. हे उत्तर ऐकून सर्वसामान्य ठेवीदारांच्या पायाखालची वाळूच सरकली.  

ही बातमी आजूबाजूच्या भागात वाऱ्यासारखी पसरली. बँकेत लोकांची गर्दी झाली. तणाव, गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. एका खातेधारकाने सांगितलं की, त्याच्या घरात लग्न आहे. त्यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून पैसे काढण्यासाठी बँकेत ये जा करत आहे. मात्र दररोज कॅशियरकडून सबबी दिल्या जात आहेत. कधी मशीन खराब असल्याचं सांगितलं जातंय, कधी लिंक फेल असल्याचं सांगतात. मात्र जेव्हा मी पासबूक अपडेट करण्यासाठी गेलो तेव्हा खात्यामध्ये ९ लाख रुपयांऐवजी केवळ ४३ हजार रुपयेच असल्याचे समोर आले.

आणखी एका खातेदाराने सांगितले की, त्याच्या खात्यामधून १५ लाख रुपये गायब आहेत. असेच अनेक खातेदार आहेत, ज्यांच्या खात्यांमधून त्यांच्या परवानशीविना पैसे काढण्यात आले आहेत. आता हे सर्व कॅशियर आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून  केल्याचा आरोप खातेदार करत आहेत.

मिळत असलेल्या माहितीनुसार या शाखेच्या वेगवेगळ्या खात्यांमधून सुमारे ५ कोटी रुपये गायब झाले आहेत. जेव्हा तणाव वाढला तेव्हा विभागीय व्यवस्थापक प्रभात कुमार बैरगनिया यांनी शाखेमध्ये धाव घेतली आणि लोकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. त्यांनी तपासानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. सध्या बँकेत पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच लोकांना त्यांचे पैसे परत मिळतील, असे आश्वासन देण्यात आले आहे.  

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँकfraudधोकेबाजीBiharबिहार