शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता 
2
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
3
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
4
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
5
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
6
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
7
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
8
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
9
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
10
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
11
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
12
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
13
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
14
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
15
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
16
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
17
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
18
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
19
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट

कुमारस्वामींना भोवतेय वडिलांची भूतकाळातील 'ती' राजकीय खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 16:31 IST

वेळी काँग्रेसचे नेते राजभवनात उपस्थित असल्याने वाघेला यांचे समर्थक एका रुग्णवाहिकेतून राजभवनात आले होते.

नवी दिल्ली: येडियुरप्पा यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कर्नाटकमध्ये पडद्यामागच्या हालचालींनी वेग घेतला आहे. यानिमित्ताने राजकीय जाणकारांकडून इतिहासातील एक प्रसंग सातत्याने सांगितला जात आहे. हा प्रसंग ऐकल्यास काव्यात्मक न्याय (पोएटिक जस्टिस) काय असतो, याचा पूरेपूर प्रत्यय येऊ शकतो. 14 मार्च 1995 रोजी म्हणजे 22 वर्षांपूर्वी केशूभाई पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यावेळी काँग्रेसने भाजपा नेते शंकरसिंह वाघेला यांना फोडलं होतं. त्यावेळी गुजरातच्या राजकारणात नरेंद्र मोदी, केशुभाई आणि संजय जोशी यांचा दबदबा होता. हे तिघेजण आपली कोणतीही गोष्ट ऐकून घेत नसल्याचा आरोप करत वाघेला आपल्या 42 समर्थक आमदारांना घेऊन खजुराहोला निघून गेले. त्यावेळी सरकारला पाठिंबा देण्यासाठी वाघेला यांनी काही अटी समोर ठेवल्या. संजय जोशी आणि नरेंद्र मोदींना राज्याबाहेर पाठवून द्यावे. तसेच मुख्यमंत्री बदलावा, असे वाघेला यांनी म्हटले होते. भाजपानेही तेव्हाची परिस्थिती पाहून वाघेला यांच्या अटी मान्य केल्या. त्यानुसार केशूभाई पटेल जाऊन सुरेश मेहता मुख्यमंत्री झाले. तर नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय सचिव म्हणून दिल्लीत रवानगी झाली. त्यानंतर 1996 च्या निवडणुकांमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे गोध्रा लोकसभा मतदारसंघात वाघेला यांचा पराभव झाला. यावरून संतापलेल्या वाघेला यांनी तेव्हा थेट राज्य सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. आता कर्नाटकचे राज्यपाल असणारे वजूभाई वाला त्यावेळी गुजरात भाजपाचे अध्यक्ष होते. तर एचडी देवेगौडा हे देशाचे पंतप्रधान होते.वाघेला यांच्या अविश्वास ठरावानंतर गुजरातचे तत्कालीन राज्यपाल कृष्णपाल सिंह यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असा अहवाल केंद्राला पाठवला. या अहवालाची दखल घेत केंद्रानेही लगेचच गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली. या निर्णयाला प्रदेशाध्यक्ष वजूभाई वाला आणि अन्य भाजपा नेत्यांनी जोरदार विरोध केला. या सर्वांनी राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा यांच्याकडे धाव घेतली. मात्र, राष्ट्रपतींनी त्यांना पुन्हा राज्यपालांकडेच जायला सांगितले. काँग्रेस नेते दालनाबाहेर असताना राज्यपाल कृष्णपाल सिंह यांनी वाघेला यांना फोन करून तुम्ही लवकरात लवकर काँग्रेसचा पाठिंबा असल्याची चिठ्ठी घेऊन या, असे सांगितले. अन्यथा मला सुरेश मेहता यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण द्यावे लागेल, असे राज्यपालांनी वाघेलांना सांगितले. त्यानंतर वाघेला यांनी वेगवान हालचाली करत आपल्याला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे पत्र राजभवनापर्यंत पोहोचवले. त्यावेळी काँग्रेसचे नेते राजभवनात उपस्थित असल्याने वाघेला यांचे समर्थक एका रुग्णवाहिकेतून राजभवनात आले होते. त्यांनी वाघेलांना समर्थन असल्याची चिठ्ठी राज्यपालांना दिली व त्याच रुग्णवाहिकेतून बाहेर निघून गेले. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी सत्तास्थापनेची संधी द्यावी, अशी मागणी राज्यपालांकडे केली. परंतु, त्यावेळी कृष्णपाल सिंह यांनी उपस्थित काँग्रेस नेत्यांना अचानक माझ्याकडे सत्तास्थापनेसाठी शंकरसिंह वाघेला यांची चिठ्ठी अगोदर आल्याचे सांगितले. त्यांच्याकडे बहुमतही आहे व त्यांनी आमदरांच्या समर्थनाचे पत्र सर्वप्रथम दाखल केल्याने आपण वाघेला यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करत असल्याचा निर्णय राज्यपाल कृष्णपाल सिंह यांनी जाहीर केला. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांना निराश होऊन परतावे लागले होते. अखेर 23 ऑक्टोबर 1996 रोजी भाजपाची सत्ता आली. त्यामुळे वजूभाई वाला यांची मेहनत फुकट गेली. परंतु, आज तेच वजूभाई वाला कर्नाटकचे राज्यपाल आहेत आणि त्यांच्याच हाती कर्नाटकची सूत्रे आहेत. त्यामुळे 22 वर्षांपूर्वी बहुमत असूनही भाजपाला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. तशीच वेळ आज काँग्रेसवर आली आहे.  

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपाcongressकाँग्रेस