शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

विरोधकांकडे कोणत्या मुद्द्यांचे शस्त्र? बीआरएस सरकारविरोधात भाजप-काँग्रेसचा आक्रमक प्रचार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 06:22 IST

बीआरएसचा विकासाच्या मॉडेलवर भर

समीर परांजपे, हैदराबाद : तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या फुटलेल्या प्रश्नपत्रिका, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या व भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) आमदार के. कविता यांच्यावर दिल्ली मद्य घोटाळ्यासंदर्भात झालेले आरोप अशा अनेक विषयांवर आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधक बीआरएसवर हल्लाबोल करणार आहेत. तर, केंद्रातील भाजप सरकारने तेलंगणाच्या विकासात खो घातला, आम्हाला आवश्यक तितका निधी केंद्राने दिला नाही असा भारत राष्ट्र समितीचा आरोप आहे. तर, तेलंगणात काँग्रेस भाजपची सी टीम म्हणून काम करत असल्याचा आरोप बीआरएसने केला आहे.

‘बीआरएस बी टीम नव्हे, तर काँग्रेस भाजपची सी टीम’

तेलंगणाचे मंत्री के.टी. रामाराव यांनी टीका केली की, बीआरएस ही भाजपची बी टीम नसून, काँग्रेस ही भाजपची सी म्हणजे ‘चोर’ टीम आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या वेळेस काँग्रेसचे महत्त्वाचे नेते त्या राज्यात फारसे प्रचाराला गेले नाहीत. यामागचे कारण काय आहे?

काँग्रेसला वस्तुनिष्ठ माहिती नाही : बीआरएस

तेलंगणात जलसिंचन प्रकल्पामध्ये १ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला होता. पण, या राज्यात जलसिंचन प्रकल्प उभारणीचा खर्च ८० हजार कोटी रुपयांचा झाला असताना त्यापेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार कसा होईल, असा सवाल बीआरएसने केला आहे. काँग्रेसला तेलंगणाबद्दल काहीही वस्तुनिष्ठ माहिती नाही हे त्यांनी केलेल्या आरोपांतून दिसते, असे बीआरएसने म्हटले आहे.

‘तेलंगणा मॉडेल’वर बीआरएसचा भर

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात ‘तेलंगणा मॉडेल’वर भर देणार आहे. आमच्या सरकारने तेलंगणाचा उत्तम विकास केला, असा दावा या पक्षाच्या प्रचारात केला जाईल.

भाजप-काॅंग्रेसने काय आरोप केले?    

तेलंगणामध्ये बेकारीचे प्रमाण मोठे असून, बीआरएसने युवकांची फसवणूक केली आहे, असा आरोप भाजप व काँग्रेस सातत्याने करत आहेत. तेलंगणातील जमिनींच्या नोंदणीसाठी राज्य सरकारने धरणी ॲप सुरू केले. मात्र, ॲपमधील त्रुटींमुळे जमिनीच्या नोंदणीमध्ये अनेक गैरव्यवहार झाल्याचे आरोप विरोधकांनी केले आहेत. सरकारच्या विरोधातील प्रचारात धरणी ॲपचा मुद्दा प्रकर्षाने मांडला जाईल.

भाजपच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते

भाजप व काँग्रेसला तेलंगणामध्ये काहीही स्थान नाही. राज्यात गेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपच्या उमेदवारांनी १०५ मतदारसंघांमध्ये डिपॉझिट गमावले होते. केंद्रातील भाजप सरकारने तेलंगणाला नेहमी सापत्न वागणूक दिली आहे. भाजपची तेलंगणात फारशी ताकद नाही. केंद्रातील सरकारच्या बळावर भाजप बीआरएस सरकारला दडपू शकत नाही, असेही बीआरएसने म्हटले आहे.

 

टॅग्स :TelanganaतेलंगणाBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीBJPभाजपाcongressकाँग्रेस