शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

विरोधकांकडे कोणत्या मुद्द्यांचे शस्त्र? बीआरएस सरकारविरोधात भाजप-काँग्रेसचा आक्रमक प्रचार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 06:22 IST

बीआरएसचा विकासाच्या मॉडेलवर भर

समीर परांजपे, हैदराबाद : तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या फुटलेल्या प्रश्नपत्रिका, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या व भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) आमदार के. कविता यांच्यावर दिल्ली मद्य घोटाळ्यासंदर्भात झालेले आरोप अशा अनेक विषयांवर आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधक बीआरएसवर हल्लाबोल करणार आहेत. तर, केंद्रातील भाजप सरकारने तेलंगणाच्या विकासात खो घातला, आम्हाला आवश्यक तितका निधी केंद्राने दिला नाही असा भारत राष्ट्र समितीचा आरोप आहे. तर, तेलंगणात काँग्रेस भाजपची सी टीम म्हणून काम करत असल्याचा आरोप बीआरएसने केला आहे.

‘बीआरएस बी टीम नव्हे, तर काँग्रेस भाजपची सी टीम’

तेलंगणाचे मंत्री के.टी. रामाराव यांनी टीका केली की, बीआरएस ही भाजपची बी टीम नसून, काँग्रेस ही भाजपची सी म्हणजे ‘चोर’ टीम आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या वेळेस काँग्रेसचे महत्त्वाचे नेते त्या राज्यात फारसे प्रचाराला गेले नाहीत. यामागचे कारण काय आहे?

काँग्रेसला वस्तुनिष्ठ माहिती नाही : बीआरएस

तेलंगणात जलसिंचन प्रकल्पामध्ये १ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला होता. पण, या राज्यात जलसिंचन प्रकल्प उभारणीचा खर्च ८० हजार कोटी रुपयांचा झाला असताना त्यापेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार कसा होईल, असा सवाल बीआरएसने केला आहे. काँग्रेसला तेलंगणाबद्दल काहीही वस्तुनिष्ठ माहिती नाही हे त्यांनी केलेल्या आरोपांतून दिसते, असे बीआरएसने म्हटले आहे.

‘तेलंगणा मॉडेल’वर बीआरएसचा भर

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात ‘तेलंगणा मॉडेल’वर भर देणार आहे. आमच्या सरकारने तेलंगणाचा उत्तम विकास केला, असा दावा या पक्षाच्या प्रचारात केला जाईल.

भाजप-काॅंग्रेसने काय आरोप केले?    

तेलंगणामध्ये बेकारीचे प्रमाण मोठे असून, बीआरएसने युवकांची फसवणूक केली आहे, असा आरोप भाजप व काँग्रेस सातत्याने करत आहेत. तेलंगणातील जमिनींच्या नोंदणीसाठी राज्य सरकारने धरणी ॲप सुरू केले. मात्र, ॲपमधील त्रुटींमुळे जमिनीच्या नोंदणीमध्ये अनेक गैरव्यवहार झाल्याचे आरोप विरोधकांनी केले आहेत. सरकारच्या विरोधातील प्रचारात धरणी ॲपचा मुद्दा प्रकर्षाने मांडला जाईल.

भाजपच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते

भाजप व काँग्रेसला तेलंगणामध्ये काहीही स्थान नाही. राज्यात गेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपच्या उमेदवारांनी १०५ मतदारसंघांमध्ये डिपॉझिट गमावले होते. केंद्रातील भाजप सरकारने तेलंगणाला नेहमी सापत्न वागणूक दिली आहे. भाजपची तेलंगणात फारशी ताकद नाही. केंद्रातील सरकारच्या बळावर भाजप बीआरएस सरकारला दडपू शकत नाही, असेही बीआरएसने म्हटले आहे.

 

टॅग्स :TelanganaतेलंगणाBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीBJPभाजपाcongressकाँग्रेस