शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांकडे कोणत्या मुद्द्यांचे शस्त्र? बीआरएस सरकारविरोधात भाजप-काँग्रेसचा आक्रमक प्रचार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 06:22 IST

बीआरएसचा विकासाच्या मॉडेलवर भर

समीर परांजपे, हैदराबाद : तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या फुटलेल्या प्रश्नपत्रिका, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या व भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) आमदार के. कविता यांच्यावर दिल्ली मद्य घोटाळ्यासंदर्भात झालेले आरोप अशा अनेक विषयांवर आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधक बीआरएसवर हल्लाबोल करणार आहेत. तर, केंद्रातील भाजप सरकारने तेलंगणाच्या विकासात खो घातला, आम्हाला आवश्यक तितका निधी केंद्राने दिला नाही असा भारत राष्ट्र समितीचा आरोप आहे. तर, तेलंगणात काँग्रेस भाजपची सी टीम म्हणून काम करत असल्याचा आरोप बीआरएसने केला आहे.

‘बीआरएस बी टीम नव्हे, तर काँग्रेस भाजपची सी टीम’

तेलंगणाचे मंत्री के.टी. रामाराव यांनी टीका केली की, बीआरएस ही भाजपची बी टीम नसून, काँग्रेस ही भाजपची सी म्हणजे ‘चोर’ टीम आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या वेळेस काँग्रेसचे महत्त्वाचे नेते त्या राज्यात फारसे प्रचाराला गेले नाहीत. यामागचे कारण काय आहे?

काँग्रेसला वस्तुनिष्ठ माहिती नाही : बीआरएस

तेलंगणात जलसिंचन प्रकल्पामध्ये १ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला होता. पण, या राज्यात जलसिंचन प्रकल्प उभारणीचा खर्च ८० हजार कोटी रुपयांचा झाला असताना त्यापेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार कसा होईल, असा सवाल बीआरएसने केला आहे. काँग्रेसला तेलंगणाबद्दल काहीही वस्तुनिष्ठ माहिती नाही हे त्यांनी केलेल्या आरोपांतून दिसते, असे बीआरएसने म्हटले आहे.

‘तेलंगणा मॉडेल’वर बीआरएसचा भर

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात ‘तेलंगणा मॉडेल’वर भर देणार आहे. आमच्या सरकारने तेलंगणाचा उत्तम विकास केला, असा दावा या पक्षाच्या प्रचारात केला जाईल.

भाजप-काॅंग्रेसने काय आरोप केले?    

तेलंगणामध्ये बेकारीचे प्रमाण मोठे असून, बीआरएसने युवकांची फसवणूक केली आहे, असा आरोप भाजप व काँग्रेस सातत्याने करत आहेत. तेलंगणातील जमिनींच्या नोंदणीसाठी राज्य सरकारने धरणी ॲप सुरू केले. मात्र, ॲपमधील त्रुटींमुळे जमिनीच्या नोंदणीमध्ये अनेक गैरव्यवहार झाल्याचे आरोप विरोधकांनी केले आहेत. सरकारच्या विरोधातील प्रचारात धरणी ॲपचा मुद्दा प्रकर्षाने मांडला जाईल.

भाजपच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते

भाजप व काँग्रेसला तेलंगणामध्ये काहीही स्थान नाही. राज्यात गेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपच्या उमेदवारांनी १०५ मतदारसंघांमध्ये डिपॉझिट गमावले होते. केंद्रातील भाजप सरकारने तेलंगणाला नेहमी सापत्न वागणूक दिली आहे. भाजपची तेलंगणात फारशी ताकद नाही. केंद्रातील सरकारच्या बळावर भाजप बीआरएस सरकारला दडपू शकत नाही, असेही बीआरएसने म्हटले आहे.

 

टॅग्स :TelanganaतेलंगणाBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीBJPभाजपाcongressकाँग्रेस