शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

West Bengal Election 2021: एका पायावर पश्चिम बंगाल जिंकेन आणि नंतर दोन पायांवर दिल्लीही; ममता बॅनर्जींची डरकाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 14:27 IST

West Bengal Election 2021: हुगली येथे झालेल्या प्रचारसभेत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

ठळक मुद्देममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोलनिवडणूक आयोगावरही साधला निशाणाभाजप पाण्यासारखा पैसा वापरत आहेत - बॅनर्जी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची (west bengal assembly election 2021) रणधुमाळी जोरात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये आठ पैकी दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून, प्रचारसभांना आणखी वेग आला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या पायाला दुखापत झाली असली, तरी त्या प्रचारसभांना आवर्जुन हजेरी लावत असल्याचे दिसत आहे. हुगली येथे झालेल्या प्रचारसभेत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. (mamata banerjee criticised over bjp)

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर लगेचच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी टीका केली होती. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान घेण्याची गरजच नव्हती, असा पुनरुच्चार ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला.

CoronaVirus Update: देशभरातील 'या' १० राज्यांत ९१ टक्के कोरोनाबाधित; सर्वाधिक मृत्यूदर

आता पश्चिम बंगाल आणि नंतर दिल्ली

नंदीग्राम येथे ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली होती. यासाठी त्यांनी भाजपला जबाबदार धरले होते. मात्र, हुगली येथे बोलताना याचाच आधार घेत, आता एका पायावर पश्चिम बंगाल जिंकेन आणि पुढे नंतर दोन्ही पायांवर दिल्लीही जिंकेन, असा दावा केला आहे. बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणुका घेण्यामागे भाजपवाल्यांचे कारस्थान आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी यावेळी बोलताना केला. 

उत्तर प्रदेशात कोरोना रुग्ण सापडल्यास २० घरे सील; योगी सरकारची नवी नियमावली

भाजपने स्थानिक चेहरा दिला नाही

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक होत असून, भाजपने कोणत्याही स्थानिक चेहऱ्याला संधी दिलेली नाही. भाजपकडे एकही स्थानिक उमेदवार नाही. तृणमूल काँग्रेस आणि माकपमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर केला जात आहे. या निवडणुकीसाठी भाजप पाण्यासारखा पैसा वापरत आहेत, असा दावा करत मात्र, अशा पद्धतीने सोनार बांगला करता येणार नाही, असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला आहे. दरम्यान, आठ टप्प्यातील मतदानानंतर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण