शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सर्वांत मोठा लुटारू पक्ष; 'विकासा'वरुन ममता बॅनर्जींचा थेट पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 18:05 IST

West Bengal Assembly Election 2021: भाजप (BJP) आणि तृणमूल काँग्रेस (TMC) यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहे.

ठळक मुद्देममता बॅनर्जी यांचे भाजपवर गंभीर आरोपबंगाली नागरिकांना शांतता हवी असल्याचे प्रतिपादनभाजपच्या टीकेला ममता बॅनर्जी यांचे प्रत्युत्तर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकींच्या (West Bengal Assembly Election 2021) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आणखी तापताना दिसत आहे. भाजप (BJP) आणि तृणमूल काँग्रेस (TMC) यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहे. ममता बॅनर्जी यांनीही शनिवारी एका सभेला संबोधित करताना भाजपवर पलटवार केला आहे. जगात भाजप सर्वांत मोठा लुटारू पक्ष असल्याचा घणाघात ममता बॅनर्जी यांनी केला आहे. (west bengal assembly election 2021 mamata banerjee alleged bjp biggest extortionist in the world)

ममता बॅनर्जी यांनी हल्दिया येथील रॅलीला संबोधित केले. भाजप सर्वांत मोठा लुटारू पक्ष असून, नोटबंदीपासून ते बँकबंदीपर्यंत देशातील सामान्य नागरिकांना केवळ लुटण्याचे काम भाजपने केले, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे. 

रात्री ५० मिनिटं व्हॉट्सअ‍ॅप डाऊन होतं, बंगालमध्ये ५० वर्षे विकास डाऊन झालाय; मोदींची टीका

बंगालींना दंगामुक्त राज्य हवेय

पश्चिम बंगालची सत्ता भाजपला मिळता कामा नये. दंगलीचे षडयंत्र रचणे, हत्या करणे, दलित महिलांचे शोषण करणे अशा प्रकरणांमध्ये भाजपचे नाव वारंवार येत असते. बंगाली नागरिकांना दंगामुक्त राज्य हवे आहे. बंगालमध्ये शांतता नांदावी, असे वाटत असल्यास भाजपला मत देऊ नका, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे. तसेच नोटबंदी, पीएम केअर फंड यांबाबत पारदर्शकता आणून काही गोष्टी स्पष्ट होणे आवश्यक आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

शुभेंदू अधिकारींवर टीकास्त्र

काही बंडखोरांनी तृणमूल काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आता मला बरे वाटत आहे. आम्ही वाचलो, असा टोला ममता बॅनर्जी यांनी शुभेंदू अधिकारी यांचे नाव न घेता लगावला. बंगालमध्ये विकास झाला नाही, अशी टीका भाजपवाले करत आहेत. मग दिल्लीत तुम्ही काय केले, असा प्रतिप्रश्न ममता बॅनर्जी यांनी यावेळी बोलताना केला. पश्चिम बंगालमध्ये २७ मार्चपासून आठ टप्प्यात विधानसभा निवडणुकीला सुरुवात होणार आहे. 

दरम्यान, रात्री व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम ५० ते ५५ मिनिटांसाठी डाऊन झालं होतं. अनेक जण यामुळे चिंतेत होते, सुमारे तासभर त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. बंगालमध्ये विकास, लोकांची स्वप्न आणि सरकारवरील विश्वास हे सगळं गेल्या ५० ते ५५ वर्षांपासून डाऊन आहे, अशी टीका पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी खडगपूर येथील सभेला संबोधित करताना केली होती. त्यावर ममता बॅनर्जी यांनी पलटवार केला आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण