शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

८00 इंजिनीअरिंग कॉलेजेस बंद पडण्याच्या मार्गावर, एआयसीटीई अध्यक्षांनीच दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:54 IST

देशभरातली सुमारे ८00 अभियांत्रिकी बंद करण्याची इच्छा आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (एआयसीटीई) व्यक्त केली आहे. त्यात महाराष्ट्रातील ५९ महाविद्यालयांचा समावेश आहे.

बेंगळुरू : देशभरातली सुमारे ८00 अभियांत्रिकी बंद करण्याची इच्छा आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (एआयसीटीई) व्यक्त केली आहे. त्यात महाराष्ट्रातील ५९ महाविद्यालयांचा समावेश आहे. या संस्थांमधील विद्यार्थी प्रवेशांची संख्या दरवर्षी घटत असून तिथल्या जागाही पुरेशा प्रमाणात भरल्या जात नाहीत, असे आढळून आले आहे.एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल दत्तात्रय सहस्त्रबुद्धे यांनी देशभरातील सुमारे ८00 महाविद्यायले बंद करण्याची गरज व्यक्त केली आहे. दरवर्षी सुमारे १५0 अभियांत्रिकी महाविद्यालये एआयसीटीईच्या कडक नियमांमुळे स्वत:हून बंद पडत आहेत. ज्या महाविद्यालयांमध्ये आवश्यक त्या पायाभूत सुविधा नसतात आणिसलग पाच वर्षे ज्या महाविद्यालयांतील ३0 टक्क्यांहून अधिक जागाभरल्या जात नाहीत, ती बंद करायला हवीत, असा एआयसीटीईचा नियमच आहे.बेंगळूरूमध्ये एका कार्यक्रमात अनिल सहस्त्रबुद्धे यांनी ही माहिती दिली आहे. एआयसीटीईच्या वेबसाइटनुसार २0१४-१५ ते २0१७-१८ या काळात देशातील सुमारे ४१0 अभियांत्रिकी महाविद्यालयांना बंद करण्याची संमती देण्यात आली.त्यात कर्नाटकातील २0 आहेत. सन २0१६-१७ मध्ये सर्वाधिकअभियांत्रिकी महाविद्यालये बंद करण्यात आली. (वृत्तसंस्था)दर्जा नसलेल्याचा परिणाम...कॉलेज बंद पडणा-यांत तेलंगणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हरयाणा, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांतील अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या अधिक आहे. काहींनी टप्प्याटप्प्याने महाविद्यालये बंद करण्याची परवानगी एआयसीटीईकडे मागितली आहे.ज्या संस्थाचालकांना अभियांत्रिकी महाविद्यालये चालवता येत नाही, त्यांना ती टप्प्याटप्प्याने बंद करण्याची परवानगी मागतात किंवा कॉलेजचे रूपांतर पॉलीटेक्निक किंवा विज्ञान वा कला महाविद्यालयात करतात. टप्प्याटप्प्याने बंद करणे म्हणजे प्रथम वर्षात प्रवेश देणे बंद करणे परंतु प्रवेश घेतलेल्या आधीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षांचे शिक्षण घेण्याची सोय सुरू ठेवणेमहाविद्यालयांचा दर्जा, तेथील शिक्षणाचा नोकरीसाठी होणारा उपयोग ही महत्त्वाची आव्हाने आहेत. प्राध्यापकांचे कौशल्य हाही चिंतेचा विषय आहे. पुरेसा अनुभव नसलेले प्राध्यापक अनेक ठिकाणी शिकवतात. थेट उद्योगांमध्ये काम करण्यास पात्र ठरू शकतील, असे अभियंते घडवणे हे एआयसीटीईचे उद्दिष्ट असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.बंद होणारी महाविद्यालयेतेलंगणा 65महाराष्ट्र 59उत्तर प्रदेश47तामिळनाडू31हरयाणा31राजस्थान 30आंध्र प्रदेश29गुजरात29कर्नाटक 21मध्य प्रदेश 21पंजाब19

टॅग्स :Studentविद्यार्थी