शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

८00 इंजिनीअरिंग कॉलेजेस बंद पडण्याच्या मार्गावर, एआयसीटीई अध्यक्षांनीच दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:54 IST

देशभरातली सुमारे ८00 अभियांत्रिकी बंद करण्याची इच्छा आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (एआयसीटीई) व्यक्त केली आहे. त्यात महाराष्ट्रातील ५९ महाविद्यालयांचा समावेश आहे.

बेंगळुरू : देशभरातली सुमारे ८00 अभियांत्रिकी बंद करण्याची इच्छा आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (एआयसीटीई) व्यक्त केली आहे. त्यात महाराष्ट्रातील ५९ महाविद्यालयांचा समावेश आहे. या संस्थांमधील विद्यार्थी प्रवेशांची संख्या दरवर्षी घटत असून तिथल्या जागाही पुरेशा प्रमाणात भरल्या जात नाहीत, असे आढळून आले आहे.एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल दत्तात्रय सहस्त्रबुद्धे यांनी देशभरातील सुमारे ८00 महाविद्यायले बंद करण्याची गरज व्यक्त केली आहे. दरवर्षी सुमारे १५0 अभियांत्रिकी महाविद्यालये एआयसीटीईच्या कडक नियमांमुळे स्वत:हून बंद पडत आहेत. ज्या महाविद्यालयांमध्ये आवश्यक त्या पायाभूत सुविधा नसतात आणिसलग पाच वर्षे ज्या महाविद्यालयांतील ३0 टक्क्यांहून अधिक जागाभरल्या जात नाहीत, ती बंद करायला हवीत, असा एआयसीटीईचा नियमच आहे.बेंगळूरूमध्ये एका कार्यक्रमात अनिल सहस्त्रबुद्धे यांनी ही माहिती दिली आहे. एआयसीटीईच्या वेबसाइटनुसार २0१४-१५ ते २0१७-१८ या काळात देशातील सुमारे ४१0 अभियांत्रिकी महाविद्यालयांना बंद करण्याची संमती देण्यात आली.त्यात कर्नाटकातील २0 आहेत. सन २0१६-१७ मध्ये सर्वाधिकअभियांत्रिकी महाविद्यालये बंद करण्यात आली. (वृत्तसंस्था)दर्जा नसलेल्याचा परिणाम...कॉलेज बंद पडणा-यांत तेलंगणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हरयाणा, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांतील अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या अधिक आहे. काहींनी टप्प्याटप्प्याने महाविद्यालये बंद करण्याची परवानगी एआयसीटीईकडे मागितली आहे.ज्या संस्थाचालकांना अभियांत्रिकी महाविद्यालये चालवता येत नाही, त्यांना ती टप्प्याटप्प्याने बंद करण्याची परवानगी मागतात किंवा कॉलेजचे रूपांतर पॉलीटेक्निक किंवा विज्ञान वा कला महाविद्यालयात करतात. टप्प्याटप्प्याने बंद करणे म्हणजे प्रथम वर्षात प्रवेश देणे बंद करणे परंतु प्रवेश घेतलेल्या आधीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षांचे शिक्षण घेण्याची सोय सुरू ठेवणेमहाविद्यालयांचा दर्जा, तेथील शिक्षणाचा नोकरीसाठी होणारा उपयोग ही महत्त्वाची आव्हाने आहेत. प्राध्यापकांचे कौशल्य हाही चिंतेचा विषय आहे. पुरेसा अनुभव नसलेले प्राध्यापक अनेक ठिकाणी शिकवतात. थेट उद्योगांमध्ये काम करण्यास पात्र ठरू शकतील, असे अभियंते घडवणे हे एआयसीटीईचे उद्दिष्ट असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.बंद होणारी महाविद्यालयेतेलंगणा 65महाराष्ट्र 59उत्तर प्रदेश47तामिळनाडू31हरयाणा31राजस्थान 30आंध्र प्रदेश29गुजरात29कर्नाटक 21मध्य प्रदेश 21पंजाब19

टॅग्स :Studentविद्यार्थी