शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

महाराष्ट्रात २२ हजार गावांमध्ये पाणीटंचाई, प्रतिव्यक्ती ४० लिटरपेक्षाही कमी पाणी उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 07:27 IST

Water scarcity In Maharashtra News : प्रत्येक घरी पिण्याचे स्वच्छ पाणी पोहोचविण्यासाठी स्थापन झालेल्या जलशक्ती मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार देशात जवळपास २० टक्के लोकसंख्येला रोज किमान ४० लिटर पाणी उपलब्ध नाही.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : महाराष्ट्रात २२ हजारांपेक्षा जास्त ग्रामीण भागात राहणारे लोक पाणीटंचाईला तोंड देत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना असूनही या गावांत राहणाऱ्यांना आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी किमान ४० लिटर पाणीदेखील रोजच्या रोज उपलब्ध होत नाही.प्रत्येक घरी पिण्याचे स्वच्छ पाणी पोहोचविण्यासाठी स्थापन झालेल्या जलशक्ती मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार देशात जवळपास २० टक्के लोकसंख्येला रोज किमान ४० लिटर पाणी  उपलब्ध नाही. सरकारचा दावा मात्र जवळपास ७८ टक्के लोकसंख्येला दैनंदिन गरजांसाठी रोज ४० लिटर किंवा त्यापेक्षा जास्त पाणी उपलब्ध आहे. केंद्र सरकार वर्ष २०२४ पर्यंत सगळ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकारांसोबत काम करीत आहे. यासाठी जल जीवन मिशन सुरू केले गेले आहे.मिशनअंतर्गत विषम प्राकृतिक परिस्थिती, मरुस्तलीय तथा प्रभावित भागांत पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ३० टक्के जास्त प्राधान्य दिले जात आहे. अधिकारी म्हणाला की, पाणीटंचाई कमी करण्यासाठी जल संरक्षणाच्या अनेक योजना राबविल्या गेल्या आहेत.  

मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार देशभर तीन लाखांपेक्षा जास्त ग्रामीण वसाहतींत पाण्याची उपलब्धता रोज दर माणसी किमान ४० लिटरपेक्षाही कमी आहे. त्यात १८.२७ कोटी लोक राहतात. 

राजस्थानचे २.४१ कोटी लोकसंख्या असलेली ५६ हजार ३०२, पश्चिम बंगालची २.७४ कोटी लोकसंख्येची ३६ हजार ७११, कर्नाटकची १.७३ कोटी लोकसंख्येची ३३ हजार ३४५ खेडी व जवळपास १.८७ कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रातील २२ हजार ९७ गावांचा समावेश आहे. 

पाणी वाचवण्यासाठी कमीत कमी पाण्यात शेतीसाठी नवे तंत्रज्ञान वापरले जात आहे. कृषी मंत्रालयावर ड्रॉप मोर क्रॉपच्या लक्ष्यासोबत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरू केली आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईMaharashtraमहाराष्ट्र