शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

यूपीएच्या काळात सियाचिन आलं होतं संकटात?; तत्कालीन लष्करप्रमुखांनी सांगितली सत्यकथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 18:13 IST

२००६ मध्ये मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात देशासाठी सामरिकदृष्या महत्त्वाची असलेले सियाचिन ग्लेशियर संकटात सापडले होते, हा भाग काँग्रेस पाकिस्ताना सुपूर्द करणार होता, असा गंभीर आरोप, भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केल्याने खळबळ उडालेली आहे.

ठळक मुद्देजगातील सर्वात उंचावरील रणभूमी असलेल्या सियाचिनमधून लष्कर हटवून त्याला शांतीपर्वत घोषित करण्याची यूपीएची योजना होती माझा या योजनेला तीव्र विरोध होता, असे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल जेजे सिंग यांनी सांगितलेसियाचिनचा भाग काँग्रेस पाकिस्तानला सुपूर्द करणार होता, असा गंभीर आरोप, भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केल्याने खळबळ उडालेली आहे.

नवी दिल्ली - भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात निर्माण झालेल्या तणावामुळे सध्या देशात अस्वस्थतेचं वातावरण आहे. त्यातच चिनी घुसखोरीवरून राजधानी दिल्लीत आरोप प्रत्यारोपांनाही उत आला असून, गलवानमधील संघर्षावरून मोदी सरकारची कोंडी करणाऱ्या काँग्रेसला भाजपाकडून जुन्या घटनांचे दाखले देऊन प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यातच २००६ मध्ये मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात देशासाठी सामरिकदृष्या महत्त्वाची असलेले सियाचिन ग्लेशियर संकटात सापडले होते, हा भाग काँग्रेस पाकिस्तानला सुपूर्द करणार होता, असा गंभीर आरोप, भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केल्याने खळबळ उडालेली आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत तत्कालीन लष्करप्रमुख जनरल जे. जे. सिंग यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

जगातील सर्वात उंचावरील रणभूमी असलेल्या सियाचिनमधून लष्कर हटवून त्याला शांतीपर्वत घोषित करण्याची यूपीएची योजना होती. मात्र माझा या योजनेला तीव्र विरोध होता, असे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल जेजे सिंग यांनी सांगितले. सर्वप्रथम सन १९८९ मध्ये सियाचिनला शांतीपर्वत घोषित करण्याची योजना आली होती, असेही त्यांनी सांगितले.

जनरल सिंग म्हणाले की, सियाचिनमधून लष्कर हटवण्याची चाचपणी १९८९ मध्येच सुरू झाली होती. त्यानंतर २००६ मध्ये असा प्रस्ताव समोर करून माझ्याकडे विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी मी लष्करप्रमुख होतो. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग त्यावेळी सियाचीनच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा हा पर्वत लष्कराच्या ताब्यात असणे गरजेचे असल्याची कल्पना मी त्यांना दिली होती. तसेच असे पाऊल उचलायचे असेल तर पाकिस्ताननेही त्यांचा लष्करी ताबा असलेल्या ठिकाणांचा खुलासा करावा, असे मी सांगितले मात्र पाकिस्तानने तसे करण्यास नकार दिला होता. त्यानंतर हा प्रस्ताव गुंडाळला गेला. 

दरम्यान, ही माहिती समोर आल्यानंतर भाजपाने काँग्रेसला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. लष्कराने विरोध केला नसता तर सियाचिन पाकिस्तानच्या ताब्यात गेला असता, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. तसेच  नेहरू-गांधी-वाड्रा कुटुंबाला त्यातून काय फायदा झाला असता, असा गंभीर सवाल भाजपाने विचारला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

 

टॅग्स :SiachenसियाचिनIndiaभारतPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानcongressकाँग्रेसBJPभाजपा