शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

यूपीएच्या काळात सियाचिन आलं होतं संकटात?; तत्कालीन लष्करप्रमुखांनी सांगितली सत्यकथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 18:13 IST

२००६ मध्ये मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात देशासाठी सामरिकदृष्या महत्त्वाची असलेले सियाचिन ग्लेशियर संकटात सापडले होते, हा भाग काँग्रेस पाकिस्ताना सुपूर्द करणार होता, असा गंभीर आरोप, भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केल्याने खळबळ उडालेली आहे.

ठळक मुद्देजगातील सर्वात उंचावरील रणभूमी असलेल्या सियाचिनमधून लष्कर हटवून त्याला शांतीपर्वत घोषित करण्याची यूपीएची योजना होती माझा या योजनेला तीव्र विरोध होता, असे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल जेजे सिंग यांनी सांगितलेसियाचिनचा भाग काँग्रेस पाकिस्तानला सुपूर्द करणार होता, असा गंभीर आरोप, भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केल्याने खळबळ उडालेली आहे.

नवी दिल्ली - भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात निर्माण झालेल्या तणावामुळे सध्या देशात अस्वस्थतेचं वातावरण आहे. त्यातच चिनी घुसखोरीवरून राजधानी दिल्लीत आरोप प्रत्यारोपांनाही उत आला असून, गलवानमधील संघर्षावरून मोदी सरकारची कोंडी करणाऱ्या काँग्रेसला भाजपाकडून जुन्या घटनांचे दाखले देऊन प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यातच २००६ मध्ये मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात देशासाठी सामरिकदृष्या महत्त्वाची असलेले सियाचिन ग्लेशियर संकटात सापडले होते, हा भाग काँग्रेस पाकिस्तानला सुपूर्द करणार होता, असा गंभीर आरोप, भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केल्याने खळबळ उडालेली आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत तत्कालीन लष्करप्रमुख जनरल जे. जे. सिंग यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

जगातील सर्वात उंचावरील रणभूमी असलेल्या सियाचिनमधून लष्कर हटवून त्याला शांतीपर्वत घोषित करण्याची यूपीएची योजना होती. मात्र माझा या योजनेला तीव्र विरोध होता, असे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल जेजे सिंग यांनी सांगितले. सर्वप्रथम सन १९८९ मध्ये सियाचिनला शांतीपर्वत घोषित करण्याची योजना आली होती, असेही त्यांनी सांगितले.

जनरल सिंग म्हणाले की, सियाचिनमधून लष्कर हटवण्याची चाचपणी १९८९ मध्येच सुरू झाली होती. त्यानंतर २००६ मध्ये असा प्रस्ताव समोर करून माझ्याकडे विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी मी लष्करप्रमुख होतो. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग त्यावेळी सियाचीनच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा हा पर्वत लष्कराच्या ताब्यात असणे गरजेचे असल्याची कल्पना मी त्यांना दिली होती. तसेच असे पाऊल उचलायचे असेल तर पाकिस्ताननेही त्यांचा लष्करी ताबा असलेल्या ठिकाणांचा खुलासा करावा, असे मी सांगितले मात्र पाकिस्तानने तसे करण्यास नकार दिला होता. त्यानंतर हा प्रस्ताव गुंडाळला गेला. 

दरम्यान, ही माहिती समोर आल्यानंतर भाजपाने काँग्रेसला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. लष्कराने विरोध केला नसता तर सियाचिन पाकिस्तानच्या ताब्यात गेला असता, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. तसेच  नेहरू-गांधी-वाड्रा कुटुंबाला त्यातून काय फायदा झाला असता, असा गंभीर सवाल भाजपाने विचारला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

 

टॅग्स :SiachenसियाचिनIndiaभारतPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानcongressकाँग्रेसBJPभाजपा