शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

यूपीएच्या काळात सियाचिन आलं होतं संकटात?; तत्कालीन लष्करप्रमुखांनी सांगितली सत्यकथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 18:13 IST

२००६ मध्ये मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात देशासाठी सामरिकदृष्या महत्त्वाची असलेले सियाचिन ग्लेशियर संकटात सापडले होते, हा भाग काँग्रेस पाकिस्ताना सुपूर्द करणार होता, असा गंभीर आरोप, भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केल्याने खळबळ उडालेली आहे.

ठळक मुद्देजगातील सर्वात उंचावरील रणभूमी असलेल्या सियाचिनमधून लष्कर हटवून त्याला शांतीपर्वत घोषित करण्याची यूपीएची योजना होती माझा या योजनेला तीव्र विरोध होता, असे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल जेजे सिंग यांनी सांगितलेसियाचिनचा भाग काँग्रेस पाकिस्तानला सुपूर्द करणार होता, असा गंभीर आरोप, भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केल्याने खळबळ उडालेली आहे.

नवी दिल्ली - भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात निर्माण झालेल्या तणावामुळे सध्या देशात अस्वस्थतेचं वातावरण आहे. त्यातच चिनी घुसखोरीवरून राजधानी दिल्लीत आरोप प्रत्यारोपांनाही उत आला असून, गलवानमधील संघर्षावरून मोदी सरकारची कोंडी करणाऱ्या काँग्रेसला भाजपाकडून जुन्या घटनांचे दाखले देऊन प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यातच २००६ मध्ये मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात देशासाठी सामरिकदृष्या महत्त्वाची असलेले सियाचिन ग्लेशियर संकटात सापडले होते, हा भाग काँग्रेस पाकिस्तानला सुपूर्द करणार होता, असा गंभीर आरोप, भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केल्याने खळबळ उडालेली आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत तत्कालीन लष्करप्रमुख जनरल जे. जे. सिंग यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

जगातील सर्वात उंचावरील रणभूमी असलेल्या सियाचिनमधून लष्कर हटवून त्याला शांतीपर्वत घोषित करण्याची यूपीएची योजना होती. मात्र माझा या योजनेला तीव्र विरोध होता, असे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल जेजे सिंग यांनी सांगितले. सर्वप्रथम सन १९८९ मध्ये सियाचिनला शांतीपर्वत घोषित करण्याची योजना आली होती, असेही त्यांनी सांगितले.

जनरल सिंग म्हणाले की, सियाचिनमधून लष्कर हटवण्याची चाचपणी १९८९ मध्येच सुरू झाली होती. त्यानंतर २००६ मध्ये असा प्रस्ताव समोर करून माझ्याकडे विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी मी लष्करप्रमुख होतो. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग त्यावेळी सियाचीनच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा हा पर्वत लष्कराच्या ताब्यात असणे गरजेचे असल्याची कल्पना मी त्यांना दिली होती. तसेच असे पाऊल उचलायचे असेल तर पाकिस्ताननेही त्यांचा लष्करी ताबा असलेल्या ठिकाणांचा खुलासा करावा, असे मी सांगितले मात्र पाकिस्तानने तसे करण्यास नकार दिला होता. त्यानंतर हा प्रस्ताव गुंडाळला गेला. 

दरम्यान, ही माहिती समोर आल्यानंतर भाजपाने काँग्रेसला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. लष्कराने विरोध केला नसता तर सियाचिन पाकिस्तानच्या ताब्यात गेला असता, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. तसेच  नेहरू-गांधी-वाड्रा कुटुंबाला त्यातून काय फायदा झाला असता, असा गंभीर सवाल भाजपाने विचारला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

 

टॅग्स :SiachenसियाचिनIndiaभारतPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानcongressकाँग्रेसBJPभाजपा