शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

यूपीएच्या काळात सियाचिन आलं होतं संकटात?; तत्कालीन लष्करप्रमुखांनी सांगितली सत्यकथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 18:13 IST

२००६ मध्ये मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात देशासाठी सामरिकदृष्या महत्त्वाची असलेले सियाचिन ग्लेशियर संकटात सापडले होते, हा भाग काँग्रेस पाकिस्ताना सुपूर्द करणार होता, असा गंभीर आरोप, भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केल्याने खळबळ उडालेली आहे.

ठळक मुद्देजगातील सर्वात उंचावरील रणभूमी असलेल्या सियाचिनमधून लष्कर हटवून त्याला शांतीपर्वत घोषित करण्याची यूपीएची योजना होती माझा या योजनेला तीव्र विरोध होता, असे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल जेजे सिंग यांनी सांगितलेसियाचिनचा भाग काँग्रेस पाकिस्तानला सुपूर्द करणार होता, असा गंभीर आरोप, भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केल्याने खळबळ उडालेली आहे.

नवी दिल्ली - भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात निर्माण झालेल्या तणावामुळे सध्या देशात अस्वस्थतेचं वातावरण आहे. त्यातच चिनी घुसखोरीवरून राजधानी दिल्लीत आरोप प्रत्यारोपांनाही उत आला असून, गलवानमधील संघर्षावरून मोदी सरकारची कोंडी करणाऱ्या काँग्रेसला भाजपाकडून जुन्या घटनांचे दाखले देऊन प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यातच २००६ मध्ये मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात देशासाठी सामरिकदृष्या महत्त्वाची असलेले सियाचिन ग्लेशियर संकटात सापडले होते, हा भाग काँग्रेस पाकिस्तानला सुपूर्द करणार होता, असा गंभीर आरोप, भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केल्याने खळबळ उडालेली आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत तत्कालीन लष्करप्रमुख जनरल जे. जे. सिंग यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

जगातील सर्वात उंचावरील रणभूमी असलेल्या सियाचिनमधून लष्कर हटवून त्याला शांतीपर्वत घोषित करण्याची यूपीएची योजना होती. मात्र माझा या योजनेला तीव्र विरोध होता, असे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल जेजे सिंग यांनी सांगितले. सर्वप्रथम सन १९८९ मध्ये सियाचिनला शांतीपर्वत घोषित करण्याची योजना आली होती, असेही त्यांनी सांगितले.

जनरल सिंग म्हणाले की, सियाचिनमधून लष्कर हटवण्याची चाचपणी १९८९ मध्येच सुरू झाली होती. त्यानंतर २००६ मध्ये असा प्रस्ताव समोर करून माझ्याकडे विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी मी लष्करप्रमुख होतो. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग त्यावेळी सियाचीनच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा हा पर्वत लष्कराच्या ताब्यात असणे गरजेचे असल्याची कल्पना मी त्यांना दिली होती. तसेच असे पाऊल उचलायचे असेल तर पाकिस्ताननेही त्यांचा लष्करी ताबा असलेल्या ठिकाणांचा खुलासा करावा, असे मी सांगितले मात्र पाकिस्तानने तसे करण्यास नकार दिला होता. त्यानंतर हा प्रस्ताव गुंडाळला गेला. 

दरम्यान, ही माहिती समोर आल्यानंतर भाजपाने काँग्रेसला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. लष्कराने विरोध केला नसता तर सियाचिन पाकिस्तानच्या ताब्यात गेला असता, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. तसेच  नेहरू-गांधी-वाड्रा कुटुंबाला त्यातून काय फायदा झाला असता, असा गंभीर सवाल भाजपाने विचारला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

 

टॅग्स :SiachenसियाचिनIndiaभारतPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानcongressकाँग्रेसBJPभाजपा