शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 08:23 IST

हा भाग आता बनतोय देशाच्या प्रगतीचे इंजिन, मिझोरामची अॅक्ट ईस्ट धोरणात महत्त्वाची भूमिका

एझॉल : पूर्वी मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताने खूप त्रास सहन केला. मात्र आता केंद्रातील भाजप सरकारच्या प्रयत्नांमुळे हा भाग देशाच्या विकासाचे इंजिन बनत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांचा मिझोरामचा दुसरा दौरा आहे. त्यांनी या राज्यातील ९,००० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन केले.

लेंगपुई विमानतळावरून व्हर्चुअल माध्यमातून जाहीर सभेत भाषण केले. जोरदार पावसामुळे ते सभास्थानी म्हणजे लमुआल मैदा येथे पोहोचू शकले नाहीत. मोदींनी ऐझॉल आणि दिल्ली यांना जोडणाऱ्या पहिल्या राजधानी एक्स्प्रेसचे उद्घाटन केले. ते म्हणाले की, काही राजकीय पक्षांनी खूप काळ मतपेढीचे राजकारण केले. त्यांच्या या वृत्तीमुळे संपूर्ण ईशान्य भारत त्रासला होता. पण आमच्या सरकारचा दृष्टिकोन वेगळा आहे. मागील ११ वर्षापासून आम्ही ईशान्य भारताच्या विकासासाठी काम करत आहोत, आणि हा भाग भारताच्या विकासाचे इंजिन बनत आहे.

'देर आए पर दुरुस्त नहीं आए' : काँग्रेस

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मणिपूर दौऱ्यावर काँग्रेसने शनिवारी तीव्र शब्दांत टीका केली. हिंसाचाराला ८६४ दिवस उलटून गेल्यानंतर केवळ काही तासांसाठी राज्यात जाणे हा 'आत्मप्रशंसेचा दिखावा' असून पिडीत जनतेचा घोर अपमान असा काँग्रेसने आरोप केला.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केलेली महत्त्वाची विधाने

१ जीएसटी सुधारणांमुळे अनेक वस्तूंवर कर कमी झाला असून, त्यामुळे जीवनमान सोपे होणार आहे.

स्वयंपूर्णता, उत्पादन वाढ आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी 'मेड इन इंडिया' शस्त्रास्त्रांचे योगदान महत्त्वाचे आहे.

आर्थिक वाढ : २०२५-२६च्या पहिल्या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेने ७.८% 3 वाढ नोंदविली आहे, जी जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थेपैकी सर्वाधिक आहे.

४ एझॉल बायपास रोड, थेंझॉल-सियालसुक रोड, खानकॉन-रोंगुरा रोड यांसारख्या अनेक रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले आहे.

इम्फाळ : मणिपूरच्या डोंगराळ भागातील

व खोऱ्यातील लोकांमध्ये विश्वासाचा मजबूत पूल उभारणे अत्यावश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. इम्फाळमधील कांगला किल्ला संकुलात आयोजिलेल्या सभेत ते म्हणाले की, मणिपूरमध्ये लोकांची मने जोडली जावीत, तिथे विकास व्हावा यासाठी केंद्र सरकार कार्यरत आहे. येथे झालेली हिंसा निंदनीय, दुर्दैवी आहे. अशा गोष्टींमुळे आपल्या भावी पिढ्यांवरही अन्याय होणार आहे.

भारतरत्न पुरस्कार विजेतेभूपेन हजारिका यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारिका यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आसामची राजधानी गुवाहाटी येथे शनिवारी आदरांजली वाहिली. तसेच भूपेन हजारिका यांच्यावर जारी करण्यात आलेल्या १०० रुपयांच्या विशेष नाण्याचे अनावरण केले.

मणिपूरमधील इम्फाळमध्ये झालेल्या वांशिक हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या लोकांपैकी काही जणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या लोकांना भेटल्यानंतर मणिपूरमध्ये नवी आशा, विश्वासाची पहाट उगवत आहे याची मला जाणीव झाली असे ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी