शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

विरप्पा मोईलींचे मोठे वक्तव्य; काँग्रेसमध्ये 'सर्जरी'ची आवश्यकता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 12:56 PM

राहुल यांनी पक्षाचे उत्तम पद्धतीने नेतृत्व केले. काँग्रेसला त्याचा लाभ घेता आला नाही. काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल अशी स्थिती राहुल यांनी निर्माण केली होती. त्यांचं नेतृत्व निवडणुकीच्या वेळी आणि निवडणुकीपूर्वी चांगले होते तर आता का नाही, असा सवालची मोईली यांनी उपस्थित केला.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अनेक राज्यातील काँग्रेस नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. त्यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री विरप्पा मोईली यांनी काँग्रेस पक्षाला मोठ्या सर्जरीची गरज व्यक्त केली आहे.

मोईली म्हणाले की, काँग्रेसला १३५ वर्षांचा इतिहास आहे. अनेकदा लोकांनी काँग्रेसचे अस्तित्व संपल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्येकवेळी ते चुकीचे ठरले आहेत. इंग्रजांनी देखील काँग्रेस संपल्याचा दावा केला होता. परंतु, त्यानाच भारत सोडून पळून जावं लागलं आहे. १९७७ मध्ये इंदिरा गांधी यांच्या पराभवानंतर काँग्रेस संपली असं अनेकजण म्हणत होते. तरी देखील आम्ही पुन्हा एकदा सत्तेत परतलो. लोक इतिहास विसरून काँग्रेस संपल्याचा दावा करतात. निश्चितच काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. परंतु, काँग्रेस पुनरागमन नक्की करणार, असा विश्वास देखील मोइली यांनी व्यक्त केला.

राहुल यांच्या नेतृत्वावर उपस्थित केलेल्या प्रश्नावर मोईली यांनी प्रतिक्रिया दिली. राहुल यांनी पक्षाचे उत्तम पद्धतीने नेतृत्व केले. काँग्रेसला त्याचा लाभ घेता आला नाही. काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल अशी स्थिती राहुल यांनी निर्माण केली होती. त्यांचं नेतृत्व निवडणुकीच्या वेळी आणि निवडणुकीपूर्वी चांगले होते तर आता का नाही, असा सवालची मोईली यांनी उपस्थित केला.

दरम्यान पराभवाचे उत्तर देण्याची राहुल यांची जबाबदारी नसून काँग्रेसच्या इतर नेत्यांची आहे. ज्या राज्यांत आम्ही पराभूत झालो, तेथील प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांची जबाबदारी निश्चित व्हावी. इतर नेत्यांनी देखील नैतिक जबाबदारी घ्यावी, असं मोईली यांनी म्हटले. तसेच दारुण पराभव आणि अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठी सर्जरी करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.