शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

विनोद तावडे बिहारमध्ये पोहोचले! आज रात्रीच भाजपा नितीशकुमारांना समर्थन देणार; दोन उपमुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 12:30 IST

Bihar Political Crisis: नितीश कुमारांनी भाजपासोबत निवडणूक लढविली होती. परंतू, काही काळातच त्यांनी भाजपासोबत बिनसल्याने लालूंच्या राजदसोबत सत्ता स्थापन केली होती.

इंडिया आघाडीला जन्म देणाऱ्या नितीशकुमारांनीच भाजपाच्या पारड्यात उडी मारल्याने विरोधकांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून याची चर्चा होती, ती आता खरी होत आहे. नितीशकुमार पुन्हा एकदा भाजपाच्या ओसरीला जाऊन बसणार आहेत. आज रात्रीपर्यंत नितीश कुमारांच्या सरकारला भाजपाचे समर्थन पत्र दिले जाणार आहे. उद्या नितीशकुमार भाजपाच्या साथीने सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. 

नितीश कुमारांनी भाजपासोबत निवडणूक लढविली होती. परंतू, काही काळातच त्यांनी भाजपासोबत बिनसल्याने लालूंच्या राजदसोबत सत्ता स्थापन केली होती. मागील सरकारमध्ये देखील नितीश कुमार आणि राजद यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. परंतु, लालुंच्या पुत्रांवर टीका करत नितीशकुमार यांनी भाजपाचा हात धरला होता. आता पुन्हा एकदा नितीश यांनी भाजपाचा आसरा घेतला आहे. महत्वाचे म्हणजे मोदींविरोधात इंडिया आघाडी स्थापन करण्यास नितीशकुमार यांनीच पुढाकार घेतला होता. 

दरम्यान, भाजपा आमदारांच्या सहीचे पत्र नितीशकुमारांना दिले जाणार आहे. आधीच्या फॉर्म्युल्यानुसारच मंत्रिपदे वाटली जाणार आहेत. सरकार बनविण्याचा फॉर्म्युला २०२० चाच राहणार आहे. यामध्ये भाजपाकडे विधानसभा अध्यक्ष आणि दोन उपमुख्यमंत्री पदे राहणार आहेत. तर मुख्यमंत्री पद स्वत: नितीशकुमार यांच्याकडे राहणार आहे, असे सुत्रांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.

भाजपची दिल्लीत खलबते...

बिहार भाजप नेत्यांची दिल्लीत केंद्रीय नेतृत्वासोबत झालेली बैठक पूर्णपणे बिहारमधील राजकीय घडामोडींवर केंद्रित होती, असे सांगण्यात येत आहे. या बैठकीत केंद्र आणि राज्यातील भाजप नेत्यांमध्ये जेडीयूशी हातमिळवणी करण्याबाबत फायद्या-तोट्याची चर्चा झाली. दोन उपमुख्यमंत्रीपदासाठी रेणू देवी या आघाडीच्या दावेदार आहेत, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावावर पक्ष अजूनही विचार करत आहे.

विनोद तावडे पाटण्यात...

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज बक्सरला पोहोचले तेव्हा त्यांच्यासोबत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अश्विनी चौबेही दिसले आहेत. दरम्यान, भाजप नेते राधामोहन सिंह बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेण्यासाठी राजभवनात पोहोचले आहेत. भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे देखील पाटण्याला पोहोचले आहेत. त्यांनी राहुल गांधींच्या न्याय यात्रेवर टीका केली आहे. ही यात्रा इंडिया आघाडीला तोडणारी ठरणार आहे, असे ते म्हणाले आहेत. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारBJPभाजपाVinod Tawdeविनोद तावडे