'देश त्यांचा संघर्ष कधीही विसरू शकत नाही', PM मोदींची वीर सावरकरांना जयंतीनिमित्त आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 11:35 IST2025-05-28T11:34:28+5:302025-05-28T11:35:46+5:30
Vinayak Damodar Savarkar Jayanti: 'देशासाठी त्यांचे बलिदान आणि समर्पण विकसित भारताच्या निर्मितीमध्येही एक मार्गदर्शिका राहील.'

'देश त्यांचा संघर्ष कधीही विसरू शकत नाही', PM मोदींची वीर सावरकरांना जयंतीनिमित्त आदरांजली
Vinayak Damodar Savarkar Jayanti: आज(28 मे) भारताचे महान स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे. देशाला ब्रिटीशांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी स्वातंत्र्य चळवळीतील तरुणांमध्ये एक अभुतपूर्व जोश संचारला होता. दरम्यान, आज त्यांच्या जयंतीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान मोदी आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, "भारतमातेचे खरे सुपुत्र वीर सावरकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. परकीय राजवटीने दिलेल्या कठोर यातनाही मातृभूमीप्रती त्यांच्या समर्पणाला धक्का लावू शकली नाही. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या अदम्य धैर्याची आणि संघर्षाची गाथा राष्ट्र कधीही विसरू शकत नाही. देशासाठी त्यांचे बलिदान आणि समर्पण विकसित भारताच्या निर्मितीमध्येही एक मार्गदर्शिका राहील."
भारत माता के सच्चे सपूत वीर सावरकर जी को उनकी जन्म-जयंती पर आदरपूर्ण श्रद्धांजलि। विदेशी हुकूमत की कठोर से कठोर यातनाएं भी मातृभूमि के प्रति उनके समर्पण भाव को डिगा नहीं पाईं। आजादी के आंदोलन में उनके अदम्य साहस और संघर्ष की गाथा को कृतज्ञ राष्ट्र कभी भुला नहीं सकता। देश के लिए… pic.twitter.com/3OsxSN905I
— Narendra Modi (@narendramodi) May 28, 2025
या पोस्टसोबत पीएम मोदींनी सावरकरांबाबत त्यांचे विचार मांडणारा एक व्हिडिओही शेअर केला आहे.
वीर सावरकरांबद्दल थोडक्यात माहिती
सावरकरांचा जन्म 28 मे 1883 रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथे झाला. त्यांनी तरुणपणापासूनच ब्रिटीश राजवटीविरुद्ध रणशिंग फुंकले. सावरकरांनी लंडनमध्ये 'अभिनव भारत' आणि 'फ्री इंडिया सोसायटी' सारख्या संघटनांची स्थापना केली. त्यांनी भारतीय तरुणांना सशस्त्र क्रांतीसाठी प्रेरित केले. ब्रिटिशांनाही सावरकरांची इतकी भीती वाटायची की, त्यांनी सावरकरांना दोनवेळा काळ्यापाण्याची शिक्षा दिली होती. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांच्यावर अमानुष छळ करण्यात आला. तुरुंगातून बाहेर आल्यावरही सावरकरांनी ब्रिटिशांविरोधात आपला संघर्ष सुरुच ठेवला होता.